शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

सुपेहमध्ये काकोडकरांची ग्रेट भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:32 IST

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुपेह हायस्कुलचा ९८ वा वर्धापन दिन गुरु वार ११ जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. या वेळी पदमविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष अशोक शहाणे

बोर्डी : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुपेह हायस्कुलचा ९८ वा वर्धापन दिन गुरु वार ११ जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. या वेळी पदमविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष अशोक शहाणे हे अतिथी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी आणि विभागीय सचिव प्रभाकर राऊत, सरपंच प्रेरणा राठोड आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. या वेळी विद्यार्थ्यांच्या पुष्परचना, चित्रकला व रांगोळी स्पर्धांच्या उद्घाटनानंतर मान्यवरांनी आचार्य भिसे व चित्रे गुरु जींच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी श्रीवर्धन, गोवर्धन, शौर्यिवर्धनी, गोवर्धन, तेजविर्धनी, राजवर्धन, यशिवर्धनी आणि ज्ञानविर्धनी या विद्यार्थ्यांच्या आठ संघांनी उपस्थितांना मानवंदना दिली आणि संचलन व कवायतींमधून मान्यवरांची मनं जिंकली.प्राचार्या आशा वर्तक यांनी शाळेचा गौरवशाली इतिहास प्रस्ताविकेतून मांडला. या वेळी अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकरांचा सपत्नीक सत्कार डॉ. गोसावी यांनी आदिवासी पेंटिंग देऊन केला.दरम्यान, क्रीडा स्पर्धांमध्ये विजेत्या वैयिक्तक व सांघिक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर स्फूर्तीसागर या स्मर्णिकेचे प्रकाशन डॉ. काकोडकरांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने विविध सुंदर कवायती सादर केल्या. तसेच सांस्कृतिक कार्यक्र माला विशेष पसंती मिळाली. या वेळी मोठ्या संख्येने पालक आणि नागरिकांनी गर्दी केली होती.शंभर वर्षात संस्थेने विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य महत्वाचे असून या संस्थेची शतकीय वाटचाल चिरतरुण असल्याचे द्योतक आहे. शिक्षणाचा दर्जा टिकविण्यासाठी शाळेतील मार्गदर्शन महत्वाचे असून आचार्य भिसे व आचार्य चित्रे गुरुजीं यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठे योगदान दिल्याचे कौतुक अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.खेळामुळे संघ व्यवस्थापन शिकलो. हाच यशस्वीततेचा गुरु मंत्र असल्याचे प्रमुख अतिथी एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष सहाणे यांनी सांगितले. आदिवासी भागातील या संस्थेचे शिक्षणाचे कार्य उल्लेखनीय असून आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि देणगीदारांमुळे प्रगती झाल्याचे डॉ. गोसावी यांनी सांगितले.