शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आराखडे मान्यतेसाठी १५ आॅगस्टला ग्रामसभा

By admin | Updated: July 29, 2016 02:49 IST

पालघर जिल्ह्यात आमचा गाव-आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायतनिहाय तयार करावयाच्या विकास आराखड्याना येत्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत मान्यता मिळणार असून जिल्हा

- हितेन नाईक/निखिल मेस्त्री,  पालघर/नंडोरे

पालघर जिल्ह्यात आमचा गाव-आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायतनिहाय तयार करावयाच्या विकास आराखड्याना येत्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत मान्यता मिळणार असून जिल्हा,तालुका तसेच ग्रामपंचायत पातळीवरील यंत्रणा त्यादृष्टीने कामाला लागलेली आहे.१४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या प्रमाणात निधी प्राप्त झालेला आहे. २०१५-२०१६ या वर्षात पालघर जिल्ह्याला या अंतर्गत कोट्यवधीचा निधी उपलब्ध झालेला आहे. मागील वर्षात अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या खात्यात पेसांतर्गत ३७ कोटीचा निधी जमा झालेला आहे. याचबरोबरीने ग्रामपंचायतींना मिळणार स्वनिधी,ग्रा. प.नी केलेल्या चांगल्या कामिगरीबद्दल शासनाकडून प्राप्त होणारी बक्षिसे, ग्रामीण रोजगार हमी योजना निधी तसेच ग्रा. पं.ना विविध स्तरातून मिळणार सी एस आर फंड अशा एकत्रीत निधींचा विनियोग कसा करावा याचा विचार ग्रामविकास आराखड्यात असणार असून गेल्या तीन महिन्यांपासून हे ग्राम विकास आराखडे बनवण्याचे काम वेगात सुरु आहे तसेच या आराखड्यावर ग्रामपंचायतस्तरापासून जिल्हास्तरीय समितीचे संपूर्ण नियंत्रण राहणार आहे.हा आराखडा प्रारूप वार्षिक व पंचवार्षिक असा असणार आहे. चार वर्षाचा बृहद आराखडा तयार करून यानंतर यात प्राधान्यक्र माने समाविष्ट असलेल्या कामांचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. ही प्रकिया संपूर्ण जिल्ह्यात सुरु झालेली असून येत्या आॅगस्ट मध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेत या आराखडयास मान्यता देऊन तालुकास्तरीय पंचायत समिती गणकडे तांत्रिक छाननीसाठी हा ग्राम विकास आराखडा पाठविण्यात येईल.पंचायत समिती गण हा विकास आराखडा तयार करण्यासाठी विचारात घेण्यात आला असून तांत्रिक छाननी नंतर हा आराखडा जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येईल व ती त्याचे परीक्षण करून निधी व नियोजनाची तालुकानिहाय एकत्रीत संक्षिप्त टिपणी करून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब करेल.हा आराखडा तयार करताना सरपंच सह उपसरपंच, सदस्यगण तसेच गावातील प्रत्येक सज्ञान व्यक्तीला नियोजनासाठी समाविष्ट केल्यामुळे ग्रामसभा सिक्र यही होणार आहेत तसेच गावपातळीवरील कामे ग्रामस्थांनी ठरावल्याप्रमाणेच होणार आहेत.