शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचा १३ ला मोर्चा

By admin | Updated: July 8, 2016 03:35 IST

पालघर जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर बुधवार दि. १३ जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात

बोईसर : पालघर जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर बुधवार दि. १३ जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार असून त्याच दिवसापासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने दिला आहे. म. रा. कर्म. संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार जिल्हापरिषद व पंचायत समित्या, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींच्या सभा घेत नसल्याने शासन, पंचायत व ग्रामपंचायत स्तरावरील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पालघर जिल्हयातील ५० टक्के पेक्षाही जास्त ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांना किमान वेतन ही दिले जात नाही.जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या शर्तीवर व जितकी त्रैमासिक रजा दिलेली आहे तेवढी रजा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली असतांनाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून त्यांना रजा मिळत नाही. जर त्यांनी रजा घेतली तर त्यांचा पगार कपात केला जातो. हे अतिशय अन्यायकारक आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून होणारी दहा टक्के भरतीची यादी तयार करतांनाही अनियमितता आहेत तर अनेक ग्रामपंचातीमध्ये कर्मचारी वर्गाचे सेवा पुस्तक भरून ते अद्ययावत केलेले नसून त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेचाही भरणा केलेला नाही. जर या धडक मोर्चापूर्वी समाधानकारक तोडगा निघाला नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याने पाणी पुरवठा, साफसफाई, स्वच्छता, दिवाबत्ती तसेच देखभाल दुरूस्ती इत्यादी कामांवर विपरीत परिणाम होणार आहे. याबाबत प्रशासनाची प्रतिक्रिया कोणती आहे हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. (वार्ताहर)जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा व तालूका स्तरावर बैठका घेत नसल्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांच्या समस्या कोणाकडे मांडायच्या व त्यांची अंमलबजावणी कोणी करायची? एकंदरीत आमच्या कर्मचाऱ्यांची समस्यांची दखल संबंधीत विभागाने घेतली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या गंभीर प्रश्नासंदर्भात उदासीन धोरण असल्याने नाईलाजास्तव जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित राहून १३ जूलै रोजी धडक मोर्चा काढणार असून बेमूदत काम बंद आदोलनही सुरू करण्यात येणार आहे.- संतोष पां. मराठे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना.