शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

ग्रा.पं. कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत

By admin | Updated: July 28, 2015 23:32 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत तालुकास्तरावरील पंचायत समित्या उदासीन असल्यामुळे अनेक कर्मचारी विविध फायद्यापासून वंचित आहेत

वसई : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत तालुकास्तरावरील पंचायत समित्या उदासीन असल्यामुळे अनेक कर्मचारी विविध फायद्यापासून वंचित आहेत. शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सभा घेण्याचे बंधन असताना गटविकास अधिकारी अशा सभा घेत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. गेली अनेक वर्षे संघटना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर शासनस्तरावर तसेच न्यायालयीन लढे देत आहेत.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, उपदान निधी, शासकीय सेवेत सामावून घेणे इ. सुविधा देण्यासंदर्भात राज्यशासन कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटनेने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अनेक प्रकरणात शासनाला माघार घ्यावी लागली असून काही प्रश्न आजही प्रलंबित आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्य शासनाने काही वर्षापूर्वी परिपत्रक काढून सर्व पंचायत समित्यांना कर्मचाऱ्यांच्या बैठका लावण्याचे आदेश जारी केले होते. या परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन होत नाही. तर अनेक गटविकास अधिकारी या बैठका घेण्यास टाळाटाळ करीत असतात. (प्रतिनिधी)