शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा अन् राज ठाकरेंमुळे झालेल्या पराभवाने अस्वस्थ, राज्यपाल राम नाईक यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 02:47 IST

अभिनेता गोविंदाने केलेला पराभव आणि राज ठाकरेंनी परप्रांतियाला विरोध करण्याचे कारण देत माझ्या समोर मराठी उमेदवार उभा केल्याने झालेला पराभव. हे अस्वस्थ करून गेले, अशी कबुली उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना दिली.

- शशी करपेवसई : अभिनेता गोविंदाने केलेला पराभव आणि राज ठाकरेंनी परप्रांतियाला विरोध करण्याचे कारण देत माझ्या समोर मराठी उमेदवार उभा केल्याने झालेला पराभव. हे अस्वस्थ करून गेले, अशी कबुली उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना दिली.स्व. सुरेश जोशी स्मृती मंच आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेच्या संयुक्त विद्यमाने राम नाईक यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नांना राम नाईक यांनी दिलखुलास उत्तरे दिली. रामभाऊंनी वडिलांचे संस्कार, संघाने लावलेली व्यायामाची आवड आणि आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची सवय यामुळे आरोग्य आणि अ़नेक अडचणींचा सामना आयुष्यात करता आल्याचे सांगितले.जनसंपर्क, संघर्ष आणि सेवा ही आपल्या आयुष्याची त्रिसूत्री असून त्यामुळेच आपणाला आतापर्यंत भरभरून यश मिळत गेले. आपण कॅन्सरसारख्या विकारावर आत्मबल, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि जनतेच्या शुभेच्छा यामुळेच मात करून मृत्यूच्या दारातून परत आल्याची भावना त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली.कुष्ठरोग्यांना दिलेले अनुदान, अर्नाळा किल्ल्यातील मच्छिमारांना केलेला वीज पुरवठा, मनोरी गोराईला केलेला पाणी पुरवठा यांमुळे सर्वाधिक समाधान लाभल्याचे त्यांनी सांगितले.उत्तरप्रदेशात महाराष्ट्र दिसतो का? या प्रश्नावर त्यांनी कानपूर, अलाहाबाद, आग्रा, वाराणसी या शहरांमध्ये सोने गाळणारे कारागिर हे सांगली, साताºयातील आहेत. उत्तर प्रदेशाच्या राजभवनात महाराष्ट्र दिन साजरा करण्याची प्रथा आपण सुरु केली आहे. शिवनेरी ते शिवजयंती असा मोटार सायकलने प्रवास करून आलेल्या मावळ््यांनी लखनऊ भगवेमय केले. त्यामुळे निश्चित उत्तर प्रदेशातही महाराष्ट्र दिसून आला, असे त्यांनी सांगितले.उत्तर प्रदेशात वीज, कायदा आणि सुव्यवस्था, उद्योगधंदे, व्यापार, नोकºया या समस्या आहेत. काम नसल्यामुळे लोक मुंबईतील झोपड्यांमध्ये दाटीवाटीने रहात आहेत. मात्र, त्यांच्या रोजगारासाठी उत्तर प्रदेशात गुंतवणूकदारांची बैठक घेण्यात आली. त्यात १ हजार ८५ गुंतवणूकदारांनी ४.२८ लाख कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे ४० लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.मुलाखतीपूर्वी भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक यांनी रामभाऊंनी उत्तर प्रदेशचा उत्तम प्रदेश केला असे गौरवोद्गार काढले. जातीपातीच्या पलिकडे माणसाचा शोध घेणारे रामभाऊंचे व्यक्तीमत्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोमसापचे वसई शाखाध्यक्ष अनिल रोकडे यांनी स्वागत केले. हरेश्वर नाईक यांनी त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी तर आभार शेखर धुरी यांनी मानले. या दिलखुलास मुलाखतीमुळे अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.

टॅग्स :Ram Naikराम नाईकVasai Virarवसई विरार