शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पालघरात सरकारचे डोहाळजेवण

By admin | Updated: April 24, 2017 23:50 IST

जिल्ह्यातील कुपोषण, आरोग्याशी निगडीत अनेक योजना गाव पातळीवर राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्यांना शासन अल्प

हितेन नाईक / पालघरजिल्ह्यातील कुपोषण, आरोग्याशी निगडीत अनेक योजना गाव पातळीवर राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्यांना शासन अल्प मानधनावर कंत्राटी पद्धतीने राबवित असून बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारही निकृष्ट दर्जाचा पुरविण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आज श्रमजीवी संघटनेच्यावतीने सरकारच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम जिल्हापरिषद पालघर समोर आयोजित करण्यात आला होता.पालघर जिल्हा निर्मितीला तीन वर्षे झाली तरी जिल्ह्यात कुपोषण, रोजगार, आरोग्याशी निगिडत अनेक प्रश्न आ वासून उभे असून ते सोडविण्यासाठी व शासनाच्या अनेक योजना, उपक्रम गावपातळीवर राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे अल्प मानधनही वेळेवर दिले जात नाही. मागील अनेक वर्षा पासून निषेध मोर्चे, आंदोलने करूनही त्यांच्या प्रश्नाकडे शासन गांभीर्याने पहात नाही. त्यातच अंगणवाड्या मधून ७ महिने ते ३ वर्षाच्या बालकांच्या पोषणासाठी पुरविण्यात येणाऱ्या सीलबंद टीएचआर पूरक आहार हा अत्यंत निकृष्ट आहे. त्याचा कुठलाही फायदा कुपोषितांना होत नाही. अनेक वर्षा पासून त्याला लाभार्थ्यांसह अंगणवाडी सेविकांचा प्रचंड विरोध असतांना केवळ ठेकेदारांकडून मिळणाऱ्या टक्केवारी मुळे तो बालकांच्या माथी मारला जात आहे. त्याच्या निषेधार्थ व अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्यांच्या मूलभूत मागण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, उपाध्यक्ष विजय जाधव, सचिव प्रमोद पवार, अनिता धांगडा, स्मिता घाटाळ यांच्यासह शेकडो महिलांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेऊन सरकारचे निषेधात्मक डोहाळ जेवण केले ह्यावेळी अंगणवाड्यात पुरविला जाणारा टीएच आर पोषक आहार बंद करण्यात यावा, पोषण आहाराची रक्कम ग्राहक मूल्य निर्देशकांशी जोडून व आगाऊ द्यावी, आहाराची थकबाकी लवकर मिळावी, अमृत आहाराची रक्कम लवकर व आगाऊ मिळावी, अंगणवाड्याचे रजिस्टर्स मार्च महिन्यात मिळावेत, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, त्यांचे मानधन नियमित व महिन्याच्या १० तारखेला मिळावे, १० वर्ष सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, ड्रेसकोड साठी १ हजाराची रक्कम वर्षातून दोनदा मिळावी, या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद कार्यालयाला पोलीस छावणीचे रूप स्वरूप आले होते. पोलीस व कार्यकर्त्यामध्ये धक्काबुक्की सुरु झाली यादरम्यान निधी चौधरी या गाडीतच बसल्या होत्या त्यानंतर हा प्रक्षोभ वाढू नये या साठी त्या गाडीतून उतरल्या व पुन्हा कार्यर्त्यांसमवेत चर्चेस बसल्या. त्यामुळे वातावरण बरेचसे निवळले साडेचार तास हा घटनाक्रम सुरु होता. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठया प्रमाणात झाली होती. ती बऱ्याच वेळाने मोकळी झाली.