शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पालघरात सरकारचे डोहाळजेवण

By admin | Updated: April 24, 2017 23:50 IST

जिल्ह्यातील कुपोषण, आरोग्याशी निगडीत अनेक योजना गाव पातळीवर राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्यांना शासन अल्प

हितेन नाईक / पालघरजिल्ह्यातील कुपोषण, आरोग्याशी निगडीत अनेक योजना गाव पातळीवर राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्यांना शासन अल्प मानधनावर कंत्राटी पद्धतीने राबवित असून बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारही निकृष्ट दर्जाचा पुरविण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आज श्रमजीवी संघटनेच्यावतीने सरकारच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम जिल्हापरिषद पालघर समोर आयोजित करण्यात आला होता.पालघर जिल्हा निर्मितीला तीन वर्षे झाली तरी जिल्ह्यात कुपोषण, रोजगार, आरोग्याशी निगिडत अनेक प्रश्न आ वासून उभे असून ते सोडविण्यासाठी व शासनाच्या अनेक योजना, उपक्रम गावपातळीवर राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे अल्प मानधनही वेळेवर दिले जात नाही. मागील अनेक वर्षा पासून निषेध मोर्चे, आंदोलने करूनही त्यांच्या प्रश्नाकडे शासन गांभीर्याने पहात नाही. त्यातच अंगणवाड्या मधून ७ महिने ते ३ वर्षाच्या बालकांच्या पोषणासाठी पुरविण्यात येणाऱ्या सीलबंद टीएचआर पूरक आहार हा अत्यंत निकृष्ट आहे. त्याचा कुठलाही फायदा कुपोषितांना होत नाही. अनेक वर्षा पासून त्याला लाभार्थ्यांसह अंगणवाडी सेविकांचा प्रचंड विरोध असतांना केवळ ठेकेदारांकडून मिळणाऱ्या टक्केवारी मुळे तो बालकांच्या माथी मारला जात आहे. त्याच्या निषेधार्थ व अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्यांच्या मूलभूत मागण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, उपाध्यक्ष विजय जाधव, सचिव प्रमोद पवार, अनिता धांगडा, स्मिता घाटाळ यांच्यासह शेकडो महिलांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेऊन सरकारचे निषेधात्मक डोहाळ जेवण केले ह्यावेळी अंगणवाड्यात पुरविला जाणारा टीएच आर पोषक आहार बंद करण्यात यावा, पोषण आहाराची रक्कम ग्राहक मूल्य निर्देशकांशी जोडून व आगाऊ द्यावी, आहाराची थकबाकी लवकर मिळावी, अमृत आहाराची रक्कम लवकर व आगाऊ मिळावी, अंगणवाड्याचे रजिस्टर्स मार्च महिन्यात मिळावेत, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, त्यांचे मानधन नियमित व महिन्याच्या १० तारखेला मिळावे, १० वर्ष सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, ड्रेसकोड साठी १ हजाराची रक्कम वर्षातून दोनदा मिळावी, या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद कार्यालयाला पोलीस छावणीचे रूप स्वरूप आले होते. पोलीस व कार्यकर्त्यामध्ये धक्काबुक्की सुरु झाली यादरम्यान निधी चौधरी या गाडीतच बसल्या होत्या त्यानंतर हा प्रक्षोभ वाढू नये या साठी त्या गाडीतून उतरल्या व पुन्हा कार्यर्त्यांसमवेत चर्चेस बसल्या. त्यामुळे वातावरण बरेचसे निवळले साडेचार तास हा घटनाक्रम सुरु होता. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठया प्रमाणात झाली होती. ती बऱ्याच वेळाने मोकळी झाली.