शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

मेस्मा प्रकरणी गोऱ्हेंची आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:56 IST

मतदारांनी शिवसेनेला आधार द्यावा : पोटनिवडणूकीत वनगा परिवाराचे आवाहन

पालघर : भाजपा सरकारची संवेदनशीलता मृत्युपंथाला लागली आहे. त्यामुळेच भूमीपुत्रांच्या अधिकारांवर सरकार हल्ला करत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना भूमीपुत्रांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे सूतोवाच शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे यांनी पालघर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा, उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा, वर्षा वनगा तसेच डहाणू महिला तालुकासंघटक सुलभा गडग उपस्थित होत्या.अंगणवाडी सेविका या विकासाच्या पाया आहे. परंतु या सेविकांना वेळेवर पगार नाही, कमी पगार हे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार असंघिटत कामगारांना मेस्मा लावण्याची तयारी केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मेस्मा कायदा रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडले असे ही आ. गोºहे म्हणाल्या.जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगून आदिवासी विकास विभागाच्या योजनाची अंमलबजावणी नीट होत नसल्याने मी आदिवासी विकास विभागाचे मंत्री विष्णू सवरा यांना अनेक वेळा फोन केला होता. यापूर्वी बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित हे सर्व वाल्याचे वाल्मिकी झाल्याचा आरोप ही त्यांनी केला.आ. गोºहे यांनी पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन व महामार्ग सारखे स्थानिकांना उध्वस्त करणारे प्रकल्प आणले जात असतील आणि अशा प्रकल्पांना स्थनिकांचा विरोध आहे म्हणून शिवसेना सदैव स्थानिकांच्या पाठीशी उभी राहणार आहे. पालघर जिल्ह्यात मराठी जनता मोठ्या प्रमाणात राहते. त्यामुळे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जिल्ह्यात प्रचारासाठी आले तरी त्यांना कोणी ओळखत नाही. जिल्ह्यात मराठी माणसांवर भाजपचा विश्वास नाही. योगी तसेच तिवारी सारखे नेते पालघरमध्ये अमराठी लोकांची मते खेचण्याकरीता आणले जात आहेत असे त्या म्हणाल्या.भाजपने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियातील वारसांना उमेदवारी जाहीर केली असती तर शिवसेनेने कधीच दुसरा उमेदवार दिला नसता कारण यापूर्वी शिवसेनेने कायम भावना व प्रघात जपले आहेत. याची अनेक उदाहरणे आ. गोºहे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.आम्हाला तिकीट नको होते, आम्हाला गरज होती सांत्वनाचीज्यांनी आपल्या आयुष्याची ३५ वर्ष घालविली असे माझे सासरे दिवंगत चिंतामण वनगा याच्या निधना नंतर ३ महिने भाजपचा एकही मोठी व्यक्ती आम्हाला भेटायला आले नाहीत. अशी तक्रार त्यांची सून वर्षा वनगा यांनी केली. आम्हाला तिकीट नको आम्हाला गरज होती धीर आणि सांत्वनाची, मात्र असे काही घडलेच नाही असे म्हणून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शिवसेनेच्या नेत्यांनी कोणतीही अट न ठेवता मातोश्रीवर नेले व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घरातील व्यक्ती प्रमाणे वागणूक देऊन आधार दिला असे ही ते म्हणाले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018