शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मेस्मा प्रकरणी गोऱ्हेंची आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:56 IST

मतदारांनी शिवसेनेला आधार द्यावा : पोटनिवडणूकीत वनगा परिवाराचे आवाहन

पालघर : भाजपा सरकारची संवेदनशीलता मृत्युपंथाला लागली आहे. त्यामुळेच भूमीपुत्रांच्या अधिकारांवर सरकार हल्ला करत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना भूमीपुत्रांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे सूतोवाच शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे यांनी पालघर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा, उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा, वर्षा वनगा तसेच डहाणू महिला तालुकासंघटक सुलभा गडग उपस्थित होत्या.अंगणवाडी सेविका या विकासाच्या पाया आहे. परंतु या सेविकांना वेळेवर पगार नाही, कमी पगार हे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार असंघिटत कामगारांना मेस्मा लावण्याची तयारी केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मेस्मा कायदा रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडले असे ही आ. गोºहे म्हणाल्या.जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगून आदिवासी विकास विभागाच्या योजनाची अंमलबजावणी नीट होत नसल्याने मी आदिवासी विकास विभागाचे मंत्री विष्णू सवरा यांना अनेक वेळा फोन केला होता. यापूर्वी बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित हे सर्व वाल्याचे वाल्मिकी झाल्याचा आरोप ही त्यांनी केला.आ. गोºहे यांनी पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन व महामार्ग सारखे स्थानिकांना उध्वस्त करणारे प्रकल्प आणले जात असतील आणि अशा प्रकल्पांना स्थनिकांचा विरोध आहे म्हणून शिवसेना सदैव स्थानिकांच्या पाठीशी उभी राहणार आहे. पालघर जिल्ह्यात मराठी जनता मोठ्या प्रमाणात राहते. त्यामुळे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जिल्ह्यात प्रचारासाठी आले तरी त्यांना कोणी ओळखत नाही. जिल्ह्यात मराठी माणसांवर भाजपचा विश्वास नाही. योगी तसेच तिवारी सारखे नेते पालघरमध्ये अमराठी लोकांची मते खेचण्याकरीता आणले जात आहेत असे त्या म्हणाल्या.भाजपने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियातील वारसांना उमेदवारी जाहीर केली असती तर शिवसेनेने कधीच दुसरा उमेदवार दिला नसता कारण यापूर्वी शिवसेनेने कायम भावना व प्रघात जपले आहेत. याची अनेक उदाहरणे आ. गोºहे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.आम्हाला तिकीट नको होते, आम्हाला गरज होती सांत्वनाचीज्यांनी आपल्या आयुष्याची ३५ वर्ष घालविली असे माझे सासरे दिवंगत चिंतामण वनगा याच्या निधना नंतर ३ महिने भाजपचा एकही मोठी व्यक्ती आम्हाला भेटायला आले नाहीत. अशी तक्रार त्यांची सून वर्षा वनगा यांनी केली. आम्हाला तिकीट नको आम्हाला गरज होती धीर आणि सांत्वनाची, मात्र असे काही घडलेच नाही असे म्हणून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शिवसेनेच्या नेत्यांनी कोणतीही अट न ठेवता मातोश्रीवर नेले व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घरातील व्यक्ती प्रमाणे वागणूक देऊन आधार दिला असे ही ते म्हणाले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018