शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

मेस्मा प्रकरणी गोऱ्हेंची आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:56 IST

मतदारांनी शिवसेनेला आधार द्यावा : पोटनिवडणूकीत वनगा परिवाराचे आवाहन

पालघर : भाजपा सरकारची संवेदनशीलता मृत्युपंथाला लागली आहे. त्यामुळेच भूमीपुत्रांच्या अधिकारांवर सरकार हल्ला करत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना भूमीपुत्रांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे सूतोवाच शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे यांनी पालघर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा, उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा, वर्षा वनगा तसेच डहाणू महिला तालुकासंघटक सुलभा गडग उपस्थित होत्या.अंगणवाडी सेविका या विकासाच्या पाया आहे. परंतु या सेविकांना वेळेवर पगार नाही, कमी पगार हे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार असंघिटत कामगारांना मेस्मा लावण्याची तयारी केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मेस्मा कायदा रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडले असे ही आ. गोºहे म्हणाल्या.जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगून आदिवासी विकास विभागाच्या योजनाची अंमलबजावणी नीट होत नसल्याने मी आदिवासी विकास विभागाचे मंत्री विष्णू सवरा यांना अनेक वेळा फोन केला होता. यापूर्वी बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित हे सर्व वाल्याचे वाल्मिकी झाल्याचा आरोप ही त्यांनी केला.आ. गोºहे यांनी पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन व महामार्ग सारखे स्थानिकांना उध्वस्त करणारे प्रकल्प आणले जात असतील आणि अशा प्रकल्पांना स्थनिकांचा विरोध आहे म्हणून शिवसेना सदैव स्थानिकांच्या पाठीशी उभी राहणार आहे. पालघर जिल्ह्यात मराठी जनता मोठ्या प्रमाणात राहते. त्यामुळे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जिल्ह्यात प्रचारासाठी आले तरी त्यांना कोणी ओळखत नाही. जिल्ह्यात मराठी माणसांवर भाजपचा विश्वास नाही. योगी तसेच तिवारी सारखे नेते पालघरमध्ये अमराठी लोकांची मते खेचण्याकरीता आणले जात आहेत असे त्या म्हणाल्या.भाजपने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियातील वारसांना उमेदवारी जाहीर केली असती तर शिवसेनेने कधीच दुसरा उमेदवार दिला नसता कारण यापूर्वी शिवसेनेने कायम भावना व प्रघात जपले आहेत. याची अनेक उदाहरणे आ. गोºहे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.आम्हाला तिकीट नको होते, आम्हाला गरज होती सांत्वनाचीज्यांनी आपल्या आयुष्याची ३५ वर्ष घालविली असे माझे सासरे दिवंगत चिंतामण वनगा याच्या निधना नंतर ३ महिने भाजपचा एकही मोठी व्यक्ती आम्हाला भेटायला आले नाहीत. अशी तक्रार त्यांची सून वर्षा वनगा यांनी केली. आम्हाला तिकीट नको आम्हाला गरज होती धीर आणि सांत्वनाची, मात्र असे काही घडलेच नाही असे म्हणून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शिवसेनेच्या नेत्यांनी कोणतीही अट न ठेवता मातोश्रीवर नेले व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घरातील व्यक्ती प्रमाणे वागणूक देऊन आधार दिला असे ही ते म्हणाले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018