शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

विक्रमगडच्या मोगऱ्याला मुंबईत चांगला भाव

By admin | Updated: September 2, 2016 03:33 IST

यंदा बहर कमी असल्याने येथील सर्व मोगरा मुंबईच्या बाजारात जात असून त्याचा भाव ४०० ते ५०० रुपये किलो आहे. रविवार पासून तो उत्पादन कमी व मागणी जास्त यामुळे

- राहुल वाडेकर,  विक्रमगडयंदा बहर कमी असल्याने येथील सर्व मोगरा मुंबईच्या बाजारात जात असून त्याचा भाव ४०० ते ५०० रुपये किलो आहे. रविवार पासून तो उत्पादन कमी व मागणी जास्त यामुळे ८०० ते १००० किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथे या तालुक्यातील मोगरा सध्या मोठ्या प्रमाणावर जात आहे. खांडव अंतर्गत गावपाडयातील १०० ते १५० शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये मोगरा लागवड मोठया प्रमाणावर केली असून हंगाम जरी कमी असला तरी रोज एका एकरमध्ये अर्धा ते एक किलो मोगरा कळी काढली जाते आहे़ मात्र येथे स्थानिक बाजरपेठ नसल्याने व योग्य भावमिळत नसल्याने हा माल सध्या मुंबईच्या बाजारात जातो आहे. बहर कमी असल्याने तसेच भाद्रपद असल्याने या फुलांची मागणी वाढली आहे़ त्यामुळे उन्हाळयांत ८० ते ९० रुपये किलो विकला जाणारा मोगरा ४०० ते ५०० रुपये किलोने विकला जातो आहे. गौरीगणपतीच्या काळात हाच मोगरा ७००, ८०० व १००० किलो रुपये पर्यत जाण्याची शक्यता असल्याचे येथील शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगीतले़येथील शेतकरी प्रामुख्याने पावसाळ्यात भातलागवड तर उन्हाळी कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची अशा प्रकारची पिके घेतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून विक्रमगड तालुक्यात फुलशेती मोठया प्रमाणात करू लागले आहेत. यावर्षी तालुक्यात हंगामा नुसार नविन लागवडीत ३६० हून अधिक हेक्टर वर भाजीपाला लागवड करण्यांत आलेली आहे. त्याच बरोबर फुलांची ही लागवड शेतकऱ्यांनी केली आहे़ गेल्यावर्षीही अंदाजीत ३० हेक्टरवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी फुलशेती केली होती व यंदा हा लागवडीचा आकडा वाढता आहे़.तालुक्यातील विविध भागातील मोगरा बहर कमी जास्त होत असतो़ थंडी व पावसाळी हंगामामध्ये उत्पादनात घट होते तेच उन्हाळी हंगामामध्ये बहरत असते़ त्यामुळे उत्पादनानुसार उन्हाळयात कवडीमोल भावाने विकावी लागते तर पावसाळी व हिवाळी हंगामध्ये मोगरा कळीला चांगला भाव मिळत असतो़साधारण सिझनमध्ये एक एकर जमीनीमध्ये लागवड केलेली मोगराकळी तोडण्याकरीता पाच ते सहा लोक पहाटे ५ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यत खपतात. ते जवळजवळ ८ ते १० किलो मोगरा कळीची तोड करतात़ सर्व गावातील शेतकरी मिळून दलालाला मोगरा विक्री करतात़