शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

‘मुलींचा जन्मदर चांगला, पण शाळाबाह्य मुलींचे प्रमाण जास्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:57 IST

ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली रोजगारानिमित्त बाहेर पडताना लग्न करीत असल्याने जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढीस लागल्याची खंत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पालघर : जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असल्याचे समाधान असले तरी शाळाबाह्य मुलींचे वाढते प्रमाण पाहता जिल्ह्यात ‘बेटी बचावपेक्षा बेटी पढाव’ची जास्त आवश्यकता असल्याने महिलांनी पुढे येण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, संदीप पवार, संदीप कळंबे, जिल्हा विधी अधिकारी ॲड. मनीषा पाटील आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली रोजगारानिमित्त बाहेर पडताना लग्न करीत असल्याने जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढीस लागल्याची खंत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सीएसआर फंडातून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगून ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या हातात दिल्यास कारभारात नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच मुलगा झाल्यावर पेढा आणि मुलगी झाल्यावर बर्फी वाटणे हा समज दूर करून एक मुलगीच आई-वडिलांना चांगल्या पद्धतीने सांभाळ करू शकते, असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित जिल्हा विधी अधिकारी मनीषा पाटील यांनी, जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांनी एका दिवसासाठी एकत्र येण्याऐवजी वर्षाचे ३६५ दिवस एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत समाज काय म्हणेल, याकडे लक्ष देण्याऐवजी निर्णय घ्या आणि पुढे या, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थिनींना एका दिवसाचे अधिकारीपद

जव्हार : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या अंतर्गत वस्तिगृहात शाळकरी मुली व कॉलेज कुमारींना महिला दिनाचे औचित्य साधून श्रेणी-२ च्या पाच अधिकाऱ्यांची जबाबदारी देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना एका दिवसाचे मानधनही देण्यात येणार आहे. प्रकल्प कार्यालयात साहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रेणी-२ साठी शासकीय मुलींचे वसतिगृह येथील दोन विद्यार्थिनींना साहाय्यक प्रकल्प अधिकारी, तर एक नियोजन अधिकारी, एक कार्यालयीन अधीक्षक, तर एक लेखा अधिकारी अशा पाच विद्यार्थिनींना एका दिवसाकरिता कार्यालयीन आदेश देऊन एक वेगळी संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तूही देण्यात आली. दरम्यान, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सामाजिक दृष्टीने कशा प्रकारे काम करीत असते, या कार्यालयाकडून आदिवासींचे जीवन उंचावण्यासाठी कशा प्रकारे योजना राबविण्यात येतात हे या मुलींना शिकविण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार