शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

विश्वासात घ्या, योग्य मोबदला द्या

By admin | Updated: July 30, 2015 22:51 IST

केंद्र सरकारच्या वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोरसाठी ठाणे व पालघर जिल्ह्या त मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वसईतील स्थानिक भूमीपुत्रांच्या जमीनी

वसई : केंद्र सरकारच्या वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोरसाठी ठाणे व पालघर जिल्ह्या त मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वसईतील स्थानिक भूमीपुत्रांच्या जमीनी मोठ्या प्रमाणात रेल्वेकडून संपादीत होणार आहेत. हे प्रकरण आता न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक भूमीपुत्रांनी एकत्र येऊन यासंदर्भातील आपले म्हणणे कोकण आयुक्त कार्यालयाला सादर केले आहे.२००९ पासून या प्रकल्पासाठी जमिनी संपादन करण्याचा प्रयत्न विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. परंतु या कामी स्थानिक भूमीपुत्रांचा विरोध मोठ्या प्रमाणात होत असल्याने हे काम अतिशय मंदगतीने सुरू आहे. या प्रकल्पामुळे हजारो भूमीपुत्र विस्थापित होणार असून त्यांच्या सुपीक जमीनी या प्रकल्पात जात आहेत. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आहे. मध्यंतरीच्या काळात भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमीनीचा मोबदला त्वरीत स्वीकारा अन्यथा आम्ही जमिनी ताब्यात घेऊ अशा नोटीसा बजावल्यामुळे ग्रामीण भागात नाराजीचे वातावरण निर्माण झाले. नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये संबंधीत अधिकाऱ्यांनी बाधीत शेतकरी मोबदला घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यानंतर न्यायालयाने बाधीत शेतकऱ्यांची नवतरूण मित्रमंडळ या संघटनेला कोकण आयुक्तांसमोर आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. त्यानुसार या संघटनेने नुकतेच आपले म्हणणे लेखी स्वरूपात कोकण आयुक्तांना सादर केले आहे. (प्रतिनिधी)या प्रकल्पामुळे हजारो भूमीपुत्र विस्थापित होणार आहेत तसेच देण्यात येणारा मोबदलाही पुरेसा नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यापूर्वी स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन कार्यवाही करणे गरजेचे होते परंतु भूसंपादन अधिकाऱ्यांनी सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवत सर्वेक्षण केले व नोटीसा बजावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विकास प्रकल्पांसाठी स्थानिकांना विस्थापित करायचे, याबाबत स्थानिकांत नााजी आहे.