शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पानेरी प्रदूषणमुक्तीचा ठराव ग्रामसभेत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:39 IST

पानेरी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत रासायनिक कारखाने, रहिवासी संकुले ह्यांना नियंत्रणाखाली आणून राजकीय पक्षांच्या मध्यस्तीला लगाम लावण्याचे काम ग्रामसभेच्या ठरावाच्या माध्यमातून महिमकरांनी साध्य केले आहे.

- हितेंन नाईकपालघर : पानेरी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत रासायनिक कारखाने, रहिवासी संकुले ह्यांना नियंत्रणाखाली आणून राजकीय पक्षांच्या मध्यस्तीला लगाम लावण्याचे काम ग्रामसभेच्या ठरावाच्या माध्यमातून महिमकरांनी साध्य केले आहे. ह्या ठरावामुळे ग्रामपंचायतीच्या आडून आपले इप्सित साध्य करणाऱ्या टोळक्यांना लगाम बसून पानेरीचे गतवैभव प्राप्त करण्याच्या मोहिमेला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.पानेरी नदीचे पाणी नगरपरिषद हद्दीतील सांडपाणी आणि परिसरातील औद्योगिक वसाहती मधील कारखान्यातून सोडल्या जाणाºया रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाले असून त्याविरोधात माहिमचे ग्रामस्थ अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. मात्र ह्या लढ्याची प्रशासनाकडून परिणामकारक दखल घेतली जात नसल्याने आपली पाणेरी वाचविण्या सोबत परिसरातील प्रदूषण थांबवायचे असेल तर बाहेरून कोणी येऊन आपली मदत करेल ही अपेक्षा दूर सारून सर्व ग्रामस्थानांच आपापसातील सर्वप्रकारचे भेदाभेद टाळून एकत्र येणे अत्यावश्यक असल्याचे सत्य त्यांच्या लक्षात आले आहे. यासाठी लोकशाही व्यवस्थेतील सर्वात सक्षम अशा ग्रामसभेच्या व्यासपीठाचा वापर करून प्रदूषणाविरुद्ध एकमताने निर्णय घ्यावा लागेल हे उमगल्यावर माहीम ग्रामपंचायत कार्यालयात ५ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या ग्रामसभेत ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी संकुले उभारतांना पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणची व्यवस्था तसेच शोषखड्डाची पूर्तता केल्याशिवाय ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला देऊ नये, पानेरी नदीला कायदेशीर स्थान असल्याने नदीच्या प्रवाहात कोणत्याही मार्गाने येणारे पाणी बांध घालून थांबविण्यात यावे तसेच बांध फोडणाºयावर कायदेशीर कारवाई करावी, पानेरी नदी प्रदूषित करणाºयापालघर नगरपरिषद आणि कारखान्यांसह अन्य व्यक्तिविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि कारखान्याचा नाहरकत दाखला रद्द करण्यात यावा, नदी पात्राच्या उच्चतम पूर रेषेपासून १०० मीटर्स च्या परिसरात नवीन कारखाने आणि रहिवासी संकुलाना ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्याशिवाय नाहरकत दाखला देऊ नये, कारखान्या मधील सर्व कूपनलिका बंद करून त्यांना ग्रामपंचायती कडून पाणीपुरवठा करण्यात यावा, नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सूर्या नदीचे पाणी सोडण्याबाबत ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत, गावपातळीवर जलसेवक नेमावेत असे ठराव घेण्यात आले.