शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

पानेरी प्रदूषणमुक्तीचा ठराव ग्रामसभेत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:39 IST

पानेरी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत रासायनिक कारखाने, रहिवासी संकुले ह्यांना नियंत्रणाखाली आणून राजकीय पक्षांच्या मध्यस्तीला लगाम लावण्याचे काम ग्रामसभेच्या ठरावाच्या माध्यमातून महिमकरांनी साध्य केले आहे.

- हितेंन नाईकपालघर : पानेरी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत रासायनिक कारखाने, रहिवासी संकुले ह्यांना नियंत्रणाखाली आणून राजकीय पक्षांच्या मध्यस्तीला लगाम लावण्याचे काम ग्रामसभेच्या ठरावाच्या माध्यमातून महिमकरांनी साध्य केले आहे. ह्या ठरावामुळे ग्रामपंचायतीच्या आडून आपले इप्सित साध्य करणाऱ्या टोळक्यांना लगाम बसून पानेरीचे गतवैभव प्राप्त करण्याच्या मोहिमेला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.पानेरी नदीचे पाणी नगरपरिषद हद्दीतील सांडपाणी आणि परिसरातील औद्योगिक वसाहती मधील कारखान्यातून सोडल्या जाणाºया रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाले असून त्याविरोधात माहिमचे ग्रामस्थ अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. मात्र ह्या लढ्याची प्रशासनाकडून परिणामकारक दखल घेतली जात नसल्याने आपली पाणेरी वाचविण्या सोबत परिसरातील प्रदूषण थांबवायचे असेल तर बाहेरून कोणी येऊन आपली मदत करेल ही अपेक्षा दूर सारून सर्व ग्रामस्थानांच आपापसातील सर्वप्रकारचे भेदाभेद टाळून एकत्र येणे अत्यावश्यक असल्याचे सत्य त्यांच्या लक्षात आले आहे. यासाठी लोकशाही व्यवस्थेतील सर्वात सक्षम अशा ग्रामसभेच्या व्यासपीठाचा वापर करून प्रदूषणाविरुद्ध एकमताने निर्णय घ्यावा लागेल हे उमगल्यावर माहीम ग्रामपंचायत कार्यालयात ५ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या ग्रामसभेत ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी संकुले उभारतांना पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणची व्यवस्था तसेच शोषखड्डाची पूर्तता केल्याशिवाय ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला देऊ नये, पानेरी नदीला कायदेशीर स्थान असल्याने नदीच्या प्रवाहात कोणत्याही मार्गाने येणारे पाणी बांध घालून थांबविण्यात यावे तसेच बांध फोडणाºयावर कायदेशीर कारवाई करावी, पानेरी नदी प्रदूषित करणाºयापालघर नगरपरिषद आणि कारखान्यांसह अन्य व्यक्तिविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि कारखान्याचा नाहरकत दाखला रद्द करण्यात यावा, नदी पात्राच्या उच्चतम पूर रेषेपासून १०० मीटर्स च्या परिसरात नवीन कारखाने आणि रहिवासी संकुलाना ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्याशिवाय नाहरकत दाखला देऊ नये, कारखान्या मधील सर्व कूपनलिका बंद करून त्यांना ग्रामपंचायती कडून पाणीपुरवठा करण्यात यावा, नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सूर्या नदीचे पाणी सोडण्याबाबत ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत, गावपातळीवर जलसेवक नेमावेत असे ठराव घेण्यात आले.