शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

चाणक्य नगरीचे गेट अखेर उघडले

By admin | Updated: February 13, 2017 04:46 IST

वहिवाटीचा रस्ता बंद करून निर्माण झालेल्या वादावर अखेर चाणक्य नगरीतील नागरिकांनी पडदा टाकला आहे. नालासोपारा

वसई : वहिवाटीचा रस्ता बंद करून निर्माण झालेल्या वादावर अखेर चाणक्य नगरीतील नागरिकांनी पडदा टाकला आहे. नालासोपारा पश्चिमेकडील चाणक्य नगरीतील कनोज आणि बोधगया या सोसायटीच्या मधील रस्ताबंद करून या सोसायट्यांनी त्या ठिकाणी लोखंडी गेट उभारला होता. त्यामुळे समेळ पाड्याला वळसा घालून उज्जयनी सोसायटीतील लोकांना आपली वाहने हाकावी लागत होती. त्यात रुग्ण,विद्यार्थी,जेष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात परवड होत होती. जवळचा मार्ग बंद झाल्यामुळे महापालिकेचे सफाई, कामगार, गॅसवाले, पोस्टमन, कुरिअरचे, हॉटेलचे डिलीव्हरी बॉईज उज्जयनीकडे फिरकत नव्हते. त्यामुळे अनेक संकटांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत होता. हा मार्ग खुला करण्यासाठी स्थानीक नगरसेवक,पोलीस ठाणे आणि महापालिकेकडे साकडेही घालण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाकडे या सर्वांनी दुर्लक्ष केले होते. रस्ता महापालिकेला हस्तांतरीत केला होता. त्याठिकाणी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक बसवला होता. पण, रस्ता बंद केल्यानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील महिलांनी उपोषण आंदोलन सुुरु करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कनोज आणि बोधगया सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येवून हा गेट काढून टाकला. त्यामुळे उज्जयनी सोसायटीतील रहिवाशांनी या सोसायटीतील पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. हे प्रकरण सोडवण्यासाठी बोधगयाचे सेके्रटरी विजय अहिरे,कनोजचे रामचंद्र गवळी,उज्जयनीचे अरुण मुळीक, चाणक्यनगरी फेडरेशनचे नितीन पेंढारी आणि नालासोपारा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक सुहास कांबळे यांनी पुढाकार घेवून येथील रहिवाशांची समजूत काढली. त्यामुळेच हे प्रकरण निवळून वादावर पडदा पडला. (प्रतिनिधी)