शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वसई महापालिकेचे गार्डन, तलाव सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 01:32 IST

तीन कोटी रुपये पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सोयी-सुविधांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांची मागणी सुरू आहे. मनपा हद्दीतील अनेक विकासकामे अर्धवट आहेत किंवा अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्यामुळेच अर्धवट राहिली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मनपाने दुर्लक्ष केल्यामुळेच गार्डन आणि तलावाच्या सुशोभीकरणासाठीचे करोडो रुपये पाण्यात गेले आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपये मनपाने खर्च केल्यानंतरही मनपाचे गार्डन, तलाव सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे स्थानिक नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.वसई-विरार महानगरपालिकेचे नालासोपारा पूर्वेकडील आचोळे तलावाचे सुशोभीकरण, गार्डनमधील मुलांसाठी लावण्यात आलेले झोके, व्यायाम करण्याचे साहित्य यांच्या दुरुस्तीसाठी ३० जानेवारी २०१९ला २ कोटी ७० लाख ४१ हजार ४३१ रुपयांचे बजेट पास केले होते. या कामासाठी ठेकेदाराला २३० दिवसांचा अवधी देण्यात आला होता. ठेकेदाराने काम करण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांनी तलावाची भिंत दोन ठिकाणी पडली. त्यामुळे काम थांबवावे लागले. दोन वर्षे उलटूनही तलावाचे काम  सुरू झालेले नाही. तलावाची आणि गार्डनची स्थिती नाजूक झाली असून तुटलेले साहित्य धोकादायक झाले आहे. याबाबत मनपाने लवकरच कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले, तर दुर्घटना घडत नाही तोपर्यंत पालिका सुधारणार नाही, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.लॉकडाऊन काळात मनपा क्षेत्रातील तलाव आणि गार्डन सुशोभीकरणाचे काम थांबले होते. गार्डनमध्ये लवकरात लवकर नवीन व्यायामाचे साहित्य आणि लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य लावणार आहे.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महानगरपालिकासाहित्य तुटलेले गार्डननालासोपारातील सनशाइन गार्डन, आचोळे तलाव, मोरेंगाव तलाव, महेश पार्क, धानिवबाग, वृन्दावन गार्डन, छेडानगर, विरार येथील नाना-नानी पार्क, मनवेलपाडा, बोळींज, वसईतील पापडी, गोखिवरे, वालीव, सातीवली येथील साहित्य तुटलेले आहे.कोट्यवधी रुपये खर्चूनही गार्डनची स्थिती नाजूक आहे. आचोळे तलाव येथील खेळण्याचे व व्यायामाचे साहित्य तुटलेले आहे. लहान मुलांची घसरगुंडी, झोके तुटलेले आहेत. मनपाकडून ठेकेदारांना बजेट पास करून करोडो रुपये दिले जातात, पण अधिकारी याकडे कानाडोळा का करतात?    - विवेक पवार, स्थानिक