शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जुन्या पेंन्शनचे भवितव्य १६ आॅक्टोंबरला; वित्त विभागासोबत होणाऱ्या बैठकीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 05:48 IST

जुन्या पेंन्शनच्या मागणीसाठी व राज्यातील मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना केंद्र व इतर राज्याच्या धर्तीवर जुनी कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू करावी यासाठी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचा-यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २ व ३ आॅक्टोंबरला पेंन्शन आत्मक्लेश आंदोलन केले.

- सुरेश काटेतलासरी : जुन्या पेंन्शनच्या मागणीसाठी व राज्यातील मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना केंद्र व इतर राज्याच्या धर्तीवर जुनी कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू करावी यासाठी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचा-यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २ व ३ आॅक्टोंबरला पेंन्शन आत्मक्लेश आंदोलन केले. या पेंन्शन आत्मक्लेश आंदोलनात जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते.महाराष्ट राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटनेने शिवनेरी ते मंत्रालय अशी पेंन्शन दिंडी आयोजित केली होती पण ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कर्मचाºयांना आझाद मैदानावर पेंन्शन आत्मक्लेश आंदोलन करावे लागले. या आंदोलनात विक्र म काळे, बाळाराम पाटील नागो गाणार, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, कपिल पाटील या शिक्षक आमदारांनी प्रत्यक्ष आत्मक्लेश आंदोलनात सहभाग घेतला व कर्मचाºयांना जुनी पेंन्शन योजना लागू करण्यासाठी सभागृहात लढण्याची ग्वाही दिली.विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, नागो गाणार यांच्यासह अनेक आमदारांनी जोपर्यंत या कर्मचाºयांना पेंन्शन लागू होत नाही तोपर्यंत आम्ही पेंन्शन घेणार नसल्याचे जाहीर केले. शशिकांत शिंदे, नारायण पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, मनिषा कोयंदे या आमदारांसह सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनीही या आंदोलनाला भेट देऊन आपण कर्मचाºयांच्या बाजूने खंबीरपणे उभे असुन, जुन्या पेंन्शनचा विषय पिहल्याच दिवशी सभागृहात नक्की मांडू असे आश्वस्त केले.३ आॅक्टोंबरला जुनी पेंन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला जुन्या पेंन्शनच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी १६ आॅक्टोंबर रोजी वित्त विभागासोबत बैठकीचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाला सर्वच शिक्षक संघटनांनी सिक्र य पाठिंबा दिला होता.या आंदोलाचे वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनात जुनी पेंन्शन योजना लागू असणारेही हजारो कर्मचारी आपल्या सहकारी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी सहभागी झाले होते.जुनी पेंन्शन हक्क संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय बंधू यांनी १ नोव्हेंबर २००५ पुर्वीचा कर्मचारी व नंतरचा नवीन कर्मचारी यांच्यातील पेंन्शनचा फरक प्रत्यक्ष जुन्या व नवीन कर्मचार्यांना विचारत व्यासपीठावरून जाहीर करताच जुन्या पेंन्शनची मागणी किती योग्य आहे याची जाणीव उपस्थितांना आणखी तिव्रतेने झाली आणी संपुर्ण आझाद मैदान पेंन्शन, पेंन्शन या आवाजाने दुमदुमून गेले.राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी १६ आॅक्टोंबरला वित्त विभागासोबत बैठक झाल्यानंतर त्यातून जे काही निर्णय होतील त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल असे स्पष्ट केले. आता सर्व कर्मचार्यांचे लक्ष १६ आॅक्टोंबरला वित्त विभागासोबत होणार्या बैठकीकडे लागले आहे.हे आंदोलन यशस्वीपणे पार पडावे यासाठी राज्य मिडीया प्रमुख प्राजक्त झावरे-पाटिल, राज्य उपाध्यक्ष शैलेश पाटील, राज्य समन्वयक संभाजी पोळ, दत्ता मदने, पालघर जिल्हाध्यक्ष नितिन तिडोळे, महिला जिल्हा अध्यक्ष उत्तरा जाधव, जिल्हा सचिव महेश शेकडे, उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, प्रवक्ते दत्ता ढाकणे-बाविकर, कार्याध्यक्ष लक्ष्मण ननवरे, सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष, सचिव यांनी प्रयत्न केले.१६ आॅक्टोंबरच्या बैठकीत चांगला निर्णय होण्याची आशा कर्मचारी व्यक्त करत आहेत. या बैठकीमुळे कर्मचाºयांच्या जुनी पेंन्शन विषयीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पेंन्शन आत्मक्लेश आंदोलनाला अनेकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व सिक्र य सहभागाबद्दल जुनी पेंन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक बर्गे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.१६ आॅक्टोंबरच्या च्या बैठकीत राज्यातील दुर्दैवी ३८४ मयत कर्मचार्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेंन्शन योजना लागू करून या मयत कर्मचार्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा व कर्मचार्यांना जुनी पेंन्शन योजना लागू व्हावी ही अपेक्षा कर्मचारी बाळगून आहेत.- निलेश देशमुख, कार्याध्यक्ष,जुनी पेंन्शन हक्क संघटना

टॅग्स :Vasai Virarवसई विरार