शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

निधी मंजूर तरी बंधारे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 03:15 IST

ज्या समुद्राच्या लाटांना भेदीत मच्छिमारानी आपला मासेमारी व्यवसाय टिकवून ठेवला आहे.त्याच लाटा आज मच्छिमाराचा कर्दनकाळ ठरू पाहत आहेत.

हितेन नाईक पालघर : ज्या समुद्राच्या लाटांना भेदीत मच्छिमारानी आपला मासेमारी व्यवसाय टिकवून ठेवला आहे.त्याच लाटा आज मच्छिमाराचा कर्दनकाळ ठरू पाहत आहेत. महाकाय लाटांनी किनारपट्टीवरील मच्छिमार कुटुंबियांची घरे उध्वस्त करून त्यांच्या उरात धडकी भरवली आहे. विशेष म्हणजे या किनारपट्टीवर संरक्षक बंधारे बांधण्यासाठी निधी मंजूर असूनही पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली भूमिपुत्रांचा बळी जाण्याची वेळ आली आहे. ही स्थिती बदलणार कधी हा भूमिपुत्रांचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.समुद्रात आणि किनारपट्टीवर विकासाच्या नावाखाली उभ्या रहात असलेल्या अनेक विकास कामाचे विपरीत परिणाम आज सातपाटी सारख्या अनेक गावांना भोगावे लागत असून संपूर्ण किनारपट्टीवरील गावांचे अस्तित्व धोक्यात आले आहेत.सातपाटी किनाऱ्यानजीकच्या घरांवर लाटा धडकू लागल्या नंतर २०१२ मध्ये गावाच्या पश्चिमेस ह्या लाटा थोपवून ठेवण्यासाठी १५० मीटर्स चा धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला. १६ वर्षाच्या कालावधीत तुफानी वादळवारा आणि महाकाय लाटांच्या तडाख्याने ह्या बंधाºयातील दगड बाहेर फेकले गेल्याने बंधाºयाला भगदाडे पडून त्यांची दुरावस्था झाली. नवीन बंधारा बांधून मिळावा ही कित्येक वर्षांपासूनची मागणी केंद्र व राज्य शासनाकडे करण्यात आली. ह्या संदर्भात कोस्टल झोन प्लॅन शासनाकडे सादर झाल्या नंतर जिल्ह्यातील सातपाटी (४२५ मीटर्स), नवापूर (१५० मीटर्स), एडवण (१२५ मीटर्स), तारापूर (१३८ मीटर्स) आणि घिवली ह्या गावाच्या किनारपट्टी संरक्षक बंधाºयांना विशेष प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांकडून मंजुरीही देण्यात आली होती. २३ मार्च २०१७ च्या महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या मुंबई येथील बैठकीत या धूप प्रतिबंधक बंधाºयाचे सर्व प्रस्ताव तपासण्यात आले होते.हरित लवादाच्या ह्या भूमिकेचा मोठा फटका सध्या सातपाटी गावासह नवापूर, दांडी, येथील गावांना बसत आहे. १३ जुलै पासून सातपाटी गाव दहशतीच्या छाये खाली जगत असून ६ मीटर च्या वर लाटा उसळून त्या किनाºयावरील घरांवर आदळत आहेत. शिवदास पागधरे ह्यांच्या घराची मागील भिंत कोसळली असून घरात लाटा येऊ लागल्याने त्यांनी नातेवाईकाच्या घराचा आसरा घेतला आहे. दुसरी कडे उमेश विठोबा पाटील ह्यांच्या पडवितील २० पत्रे फुटले असून आपल्या नौकेतील इंजिनामध्ये भरण्यासाठी आणलेले ३०० लिटर डिझेल पाण्यात वाहून गेले आहे.गावातील सुमारे २०० ते २५० घरे बाधित झाली असून आपली घरे वाचविण्यासाठी घरातील प्रत्येक सदस्य मातीच्या गोणी, लाकडी प्लायवूड, आदी जे हातात मिळेल त्या वस्तूंचा आडोसा निर्माण करून लाटा थोपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ह्या लाटा सोबत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडत असल्याने मच्छीमारांच्या अडचणीत वाढ होत आहे. दोन दिवसांपासून सातपाटी गाव झोपले नसून काहींच्या घरातील चुलीही पेटलेल्या नाहीत.पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील, सरपंच अरविंद पाटील, उपसरपंच वैभव पाटील, सदस्य आदी लोक मदतीसाठी हजर रहात आहेत. सेनेचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण ह्यांनी दिलेल्या दोन पोकलेन च्या आधारे बंधाºयांची भगदाड बुजविण्या ची कामे केली जात आहेत. एवढी भयावह परिस्थिती उद्भवली असताना जिल्हा प्रशासनाचा एकही अधिकारी, एनडीआरएफ ची टीम गावाकडे ढुंकून पाहत नसल्याने मच्छिमार जितू तामोरे यांनी रोष व्यक्त केला.>याचिकेमुळे भूमिपुत्र ठरणार सागराचे बळी?हे बंधारे किनाºयालगत उभारण्यात येणार असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होण्याचा बागुलबुवा काही पर्यावरणवाद्यांनी उभा करून हरित लवादात याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे लवादाने राज्यातील पर्यावरण विभागाला सीआरझेड शी संबंधित सर्व परवानग्या रोखून ठेवण्याचे आदेश दिले.त्यामुळे सर्व बंधाºयाना मिळालेली परवानगी आणि त्यासाठीचा निधी सध्या पडून आहे.