शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

वसई पालिकेवर कंत्राटींचा मोर्चा

By admin | Updated: February 2, 2016 01:48 IST

१ फेब्रुवारीपासून कामावरून कमी केल्याने कंत्राटी कामगारांनी सोमवारी सकाळी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. मात्र, आयुक्तांनी निर्णयात कोणताही फेरबदल होणार नाही

वसई : १ फेब्रुवारीपासून कामावरून कमी केल्याने कंत्राटी कामगारांनी सोमवारी सकाळी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. मात्र, आयुक्तांनी निर्णयात कोणताही फेरबदल होणार नाही, असे सांगितले. रोजीरोटीचा आधार टिकून राहावा म्हणून जीवाचा आटापिटा करणाऱ्या कामगारांची यामुळे निराशा झाली.वसई-विरार महापालिकेतील २ हजार ८४४ कंत्राटी कामगारांना सोमवारपासून कायमची रजा देण्यात आली आहे. याप्रकरणी आयुक्तांनी कामगारांच्या ठेकेदारांना तीन महिन्यांपूर्वी आगाऊ नोटीसही बजावली होती. कामगार गेल्या काही दिवसांपासून नोकरी वाचावी, याकरिता अनेक ठिकाणी विनवण्या करीत फिरत होते. पण, कामगारांना नेता नसल्याने त्यांची आज अखेर नोकरी गेली. सोमवारी काही कामगारांनी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. मोर्चेकऱ्यांनी प्रारंभी विरार पोलीस निरीक्षक सुनील माने यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर, दुपारी आयुक्त सतीश लोखंडे यांची भेट घेतली. पण, लोखंडे यांनी निर्णयात कोणताही फेरबदल होणार नाही, असे सांगितल्याने कामगारांची निराशा झाली. (प्रतिनिधी) साफसफाई विभागातूनही सफायासाफसफाई विभागासाठी यंदा बजेटमध्ये १०३ कोटी रुपयांची तरतूद आहे. यामधील अधिकतर खर्च सफाईवर होतो. त्यासाठी ठेका पद्धतीवर मजूर मागविले जातात. याही ठेक्यात ठराविक राजकारणी आणि अधिकाऱ्यांचे वर्चस्व आहे. ठेकेदार मजूरांची पिळवणुक करीत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. आता आयुक्त लोखंडे हे साफसफाई विभागाचीही सफाई करणार आहेत. आवश्यकतेनुसारच मजूर आणि मजूरांना किमान वेतन आणि इतर सोयीसुविधा देणे बंधनकारक करून रचना बदलणार आहेत. त्यामुळे याविभागातील ठेकेदारांचीही सफाई होणार आहे. आकृतीबंधानुसार कर्मचारी संख्या असणे बंधनकारक असल्याने कंत्राटी कामगार कमी करावे लागले. भांडार विभागाऐवजी प्रत्येक विभागवार खरेदी केली जाणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. तसेच विधी सल्लागारांकडून कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बांधकाम परवानगीचे प्रस्ताव तयार केले जाणार आहेत.- सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका