शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीविरोधात पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे

By admin | Updated: January 10, 2017 05:38 IST

नोटबंदी जाहीर केल्या नंतरचे ५० दिवस उलटूनही बँकांत जमा असलेली आपली पुंजी मिळत नसल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे

पालघर : नोटबंदी जाहीर केल्या नंतरचे ५० दिवस उलटूनही बँकांत जमा असलेली आपली पुंजी मिळत नसल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे. आश्वासनांची खैरात करणाऱ्या या मोदी सरकारला महागाई कमी करण्यात अपयश आल्याने त्या आगीत होरपळलेल्या शेकडो महिलांनी जिल्हा महिला काँग्रेसने आयोजित थाळीनाद आंदोलनात सहभागी होऊन मोदी शासना विरोधातील आपला रोष व्यक्त केला.पालघर जिल्हातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील महिलांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली सर्व पुंजी बँकांत जमा केली होती. ५० दिवस कळ सोसा, आपली अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होईल या त्यांनी केलेल्या आवाहनावर सर्वांनी विश्वास ठेवला होता. मात्र ५० दिवसापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरही कोलमडून गेलेले महिलांचे आर्थिक बजेट सावरले गेले नाही. बँका आणि एटीएमच्या समोरील रांगा कमी होत नसल्याने हातात पैसे नाही आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई याचा समतोल राखणे महिलांना असह्य झाले होते. देश-विदेशातील काळे धन बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मोदी सरकारने सांगितले असताना यांच्या पक्षातील अनेकांकडे कोट्यवधी रुपये सापडले आहेत. सर्वसामान्यांना आज बँकेतून ५ हजार रु पये मिळत नसताना त्यांच्या सरकार मधील एका मंत्र्यांच्या मुलांच्या लग्नात मात्र कोट्यवधी रु पयांची उधळण कशी केली जाते? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेशच्या सुदर्शना कौशिक यांनी उपस्थित केला. त्यामुळे केंद्रसरकारच्या अपयशा चा मोठा फटका ग्रामीण भागातील गरीब महिलांना मोठ्या प्रमाणात बसू लागला असून त्यांच्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी आज ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने जमल्या होत्या. (प्रतिनिधी)ग्रामीण आंदोलनात महिलांची संख्या जास्तच्महिला काँग्रेसच्या प्रभारी कौशिक,जिल्हाध्यक्षा राजश्री अहरे, तालुकाध्यक्षा मनीषा सावे,नगरसेविका उज्वला काळे,शमीम शेख, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित,जिल्हाध्यक्ष मनीष गणोरे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख,माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, निलेश राऊत इ. च्या वतीने थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. च्या मोर्च्याला पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो आदिवासी महिलांनी उपस्थिति दर्शवली . ‘ मोदी सरकार हाय हाय’ गली गली में शोर हे मोदी सरकार चोर है’ अशा घोषणा देत पालघर हुतात्मा चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय असा थाळी नाद आंदोलन करण्यात आले.