शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

नोटाबंदीविरोधात पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे

By admin | Updated: January 10, 2017 05:38 IST

नोटबंदी जाहीर केल्या नंतरचे ५० दिवस उलटूनही बँकांत जमा असलेली आपली पुंजी मिळत नसल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे

पालघर : नोटबंदी जाहीर केल्या नंतरचे ५० दिवस उलटूनही बँकांत जमा असलेली आपली पुंजी मिळत नसल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे. आश्वासनांची खैरात करणाऱ्या या मोदी सरकारला महागाई कमी करण्यात अपयश आल्याने त्या आगीत होरपळलेल्या शेकडो महिलांनी जिल्हा महिला काँग्रेसने आयोजित थाळीनाद आंदोलनात सहभागी होऊन मोदी शासना विरोधातील आपला रोष व्यक्त केला.पालघर जिल्हातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील महिलांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली सर्व पुंजी बँकांत जमा केली होती. ५० दिवस कळ सोसा, आपली अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होईल या त्यांनी केलेल्या आवाहनावर सर्वांनी विश्वास ठेवला होता. मात्र ५० दिवसापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरही कोलमडून गेलेले महिलांचे आर्थिक बजेट सावरले गेले नाही. बँका आणि एटीएमच्या समोरील रांगा कमी होत नसल्याने हातात पैसे नाही आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई याचा समतोल राखणे महिलांना असह्य झाले होते. देश-विदेशातील काळे धन बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मोदी सरकारने सांगितले असताना यांच्या पक्षातील अनेकांकडे कोट्यवधी रुपये सापडले आहेत. सर्वसामान्यांना आज बँकेतून ५ हजार रु पये मिळत नसताना त्यांच्या सरकार मधील एका मंत्र्यांच्या मुलांच्या लग्नात मात्र कोट्यवधी रु पयांची उधळण कशी केली जाते? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेशच्या सुदर्शना कौशिक यांनी उपस्थित केला. त्यामुळे केंद्रसरकारच्या अपयशा चा मोठा फटका ग्रामीण भागातील गरीब महिलांना मोठ्या प्रमाणात बसू लागला असून त्यांच्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी आज ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने जमल्या होत्या. (प्रतिनिधी)ग्रामीण आंदोलनात महिलांची संख्या जास्तच्महिला काँग्रेसच्या प्रभारी कौशिक,जिल्हाध्यक्षा राजश्री अहरे, तालुकाध्यक्षा मनीषा सावे,नगरसेविका उज्वला काळे,शमीम शेख, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित,जिल्हाध्यक्ष मनीष गणोरे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख,माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, निलेश राऊत इ. च्या वतीने थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. च्या मोर्च्याला पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो आदिवासी महिलांनी उपस्थिति दर्शवली . ‘ मोदी सरकार हाय हाय’ गली गली में शोर हे मोदी सरकार चोर है’ अशा घोषणा देत पालघर हुतात्मा चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय असा थाळी नाद आंदोलन करण्यात आले.