शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबाला सात वर्षांची शिक्षा, दारु सोडवण्याच्या नावाखाली उकळले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:31 IST

वाडा : तालुक्यातील तुसे येथे दारूमुक्ती केंद्र चालवणारा भोंदूबाबा आणि त्याच्या अन्य दोन भावांसह तिघांना ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

वाडा : तालुक्यातील तुसे येथे दारूमुक्ती केंद्र चालवणारा भोंदूबाबा आणि त्याच्या अन्य दोन भावांसह तिघांना ठाणे सत्र न्यायालयाने नरबळी तसेच अमानुष, अघोरी प्रथा आणि जादूटोणा कायद्यान्वये सात वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नरबळी तसेच जादूटोणा कायद्यान्वये शिक्षा होण्याचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहे.तालुक्यातील तुसे गावातील कांतीलाल पुरूषोत्तम देशमुख हा भोंदूबाबा तुसे गावातच दारु मुक्ति केंद्र चालवत असे. या केंद्राच्या माध्यमातून अनेक व्यसनाधीन लोकांकडून त्याने कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली होती. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील देवीदास उत्तम पानसरे हे या भोंदूबाबाकडे दारु सोडविण्यासाठी २०१० पासून येत होते. त्यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या घरातील महिलांना या भोंदूबाबाने त्याच्या दारूमुक्ती केंद्रातील महादेवाच्या पिंडीजवळ बसवून ठेवले. आणि आपण जो उपाय सांगतो, तो बाहेर कोणालाही सांगितल्यास तुमचा संसार मोडेल. आणि घरातील व्यक्तींचा अपघाती मृत्यू होईल, अशी भीती त्या बायकांना घातली.नवरा दारु प्यायल्यास त्याच्या शरीरावर गुपचूप बिबव्याच्या पेटत्या दिव्यातील तेल पाडून ते लावायला सांगितले. त्यानंतर शरीरावर फोड आल्यास दुसरीकडे उपचारासाठी न जाता आपल्याच केंद्रात आणण्याचा सल्ला दिला. या अघोरी प्रकारानंतर या भोंदूबाबाने अनेकदा गोळ्या खायला दिल्या. आणि २८ हजार ६०० रुपयांसह दर फेरीला हजारो रुपये उकळले. वारंवार, या भोंदूबाबाकडे जाऊनही आपली दारू सुटत नसल्याने आपण फसवले गेलो, याची जाणीव होऊन पानसरे यांनी आॅगस्ट २०१५ मध्ये त्याच्याविरोधात तक्रार केली.आरोपींना ठोठावली शिक्षाठाणे सत्र न्यायालयात सुनावणी होऊन बुधवार, १४ आॅगस्ट रोजी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी आरोपींना सात वर्ष कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी केला.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे