शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

वेलंकनी यात्रेसाठी रेल्वेच्या ४ विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:08 IST

दोन यात्रा स्पेशल : २६ व २९ आॅगस्टला

वसई : दक्षिणेकडील वेलंकनी (नागपट्टणम) या ठिकाणी दिनांक २९ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर सन २०१९ पर्यंत वेलंकनी मातेचा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यासाठी संपूर्ण भारतातील ख्रिश्चन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. विशेष करून महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, वसई, विरार व भार्इंदर, उत्तन येथील ख्रिश्चन भाविक हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात. या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची गैरसोय होत असल्याने खासदार राजन विचारे यांना माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा तसेच उत्तन येथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी खासदार राजन विचारे यांची भेट घेऊन या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेमध्ये आरक्षण उपलब्ध होत नसल्याची अडचण निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्काळ रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना पत्राद्वारे चार विशेष गाड्या सोडण्याची विनंती केली त्यांनी तत्काळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन या स्पेशल ट्रेन सुरू कराव्यात, असे सांगितले.

या आदेशाची अंमलबजावणी आज मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे व दक्षिण रेल्वेने केली. त्यानुसार मध्य रेल्वे दि.२६ आॅगस्ट २०१९ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनलवरून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी स्पेशल ट्रेन सोडणार आहे. तसेच वेलंकनीवरून दि.२९ आॅगस्ट २०१९ रोजी रात्री १० वाजून ४५मिनिटांनी ती मुंबईकडे प्रस्थान करणार आहे व पश्चिम रेल्वेकडून दिनांक २७ आॅगस्ट २०१९ रोजी वांद्रे टर्मिनलवरून दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. तसेच वेलंकनीवरून परतीच्या प्रवासासाठी दि.२९ आॅगस्ट २०१९ रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी मुंबईकडे प्रस्थान करणार आहे.परतीसाठीही दोन गाड्यापरतीसाठी दि.८ आणि ९ सप्टेंबर २०१९ रोजीही दोन गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे, अशी माहिती खासदार विचारे यांना शुक्रवारी रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या चेन्नई व इग्मोर येथील प्रवाशांना वेलंकनी येथे बस व इतर वाहनांनी जाण्यासाठीचा दहा तासांचा प्रवास वाचणार आहे.