शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

चार महिने उलटूनही रस्ता अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:31 IST

नागरिक त्रस्त : सुरक्षेच्या उपाययोजनांकडेही पालिकेचे दुर्लक्ष

अंबरनाथ : पूर्व भागातील साई सेक्शन भागात काँक्रिटीकरणासाठी रस्ता बंद करून ठेवण्यात आला आहे. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे या भागातील नागरिकांना त्या कामाचा त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी स्थानिकांच्या तक्रारी वाढत असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. रस्त्याचे काम अर्धवट असून तेथे सुरक्षेची उपाययोजनाही केलेली नाही.

अंबरनाथ पूर्व भागातील कानसई या रहिवासी परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली होती. एकीकडे रस्त्यांची दुर्दशा असताना येथे भुयारी गटारांचे कामही करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात हे रस्ते चालण्यायोग्यही राहिलेले नाहीत. नगरपालिकेने साई सेक्शन परिसरातील काही रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम चार महिन्यांपासून सुरू केले आहे. या रस्त्यांच्या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या भागातील रस्त्यांचे नियोजनही गुंतागुंतीचे असून एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ते दूर आहेत. ज्या रस्त्यांचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे, त्या कामांबाबत नगरपालिकेच्या अभियंत्यांसह ठेकेदाराने कुठलेही नियोजन केलेले नाही.

या भागात काही रस्त्यांचे काम अर्धवट अवस्थेत आहे, तर काहींचे काम एका बाजूने पूर्ण झाले आहे. दोन भागांतील रस्ते एकमेकांना अद्याप जोडण्यात आलेले नाहीत. एका ठिकाणी चार रस्ते येणाºया भागात रस्त्यांची जोडणी करण्यात ठेकेदाराला विसर पडला आहे. तसेच एकीकडे रस्ता पूर्ण झाला असल्याचे दिसत असले, तरी दुसºया टोकाला रस्ता अपूर्णावस्थेत आहे. तसेच या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी नगरपालिका आणि रस्त्याचे काम करणाºया ठेकेदाराने काम सुरू असल्याचा फलक आणि सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री येथे वाहन घेऊ न येणाºया वाहनचालकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

या भागात अनेक हॉस्पिटल असल्याने येथे येणाºया रुग्णांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. तसेच काम सुरू असलेले रस्ते अरुंद असल्याने अर्धवट रस्ता गाठल्यानंतर मागे फिरताना वाहनचालकांची चांगलीच अडचण होत आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करत सिमेंटचे रस्ते तयार करताना या कामात नियोजनाचा अभाव असून ठेकेदारावर नगरपालिका अभियंत्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अर्धवट आणि रखडलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांची अडचण होत असून नगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.रस्तेकामांची पाहणी करण्याचे आदेशरस्त्यांचे आणि कामाचे नियोजन नसल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे. तर, यासंदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार यांनी रस्त्याच्या कामांबाबत अधिकाऱ्यांना पाहणी करून योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad safetyरस्ते सुरक्षा