शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एस टी पी प्लान्टमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू; विरारच्या ग्लोबल सिटीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2024 15:58 IST

चौघांचेही मृतदेह मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :-विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीतील खाजगी एसटीपी प्लान्टमध्ये चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. चौघांचे मृतदेह शोधण्यात मनपाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे. घटनेच्या ठिकाणी मनपा अधिकारी, अर्नाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी पोहचले आहेत.

विरार पश्चिमकडे असलेल्या खाजगी एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यासाठी तेथील एक कर्मचारी गेला होता. तो परत न आल्याने त्याला शोधण्यासाठी दुसरा कर्मचारी गेला. तोही परत न आल्याने तिसरा कर्मचारी गेला. तिघेही परत न आल्याने चौथा त्यांना शोधण्यासाठी गेला. अशाप्रकारे चौघेही एसटीपी प्लांटमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन दलाला मिळाल्यावर अग्निशमन कर्मचारी तत्काळ दुर्घटना स्थळी पोहोचून ब्रीदिंग ऑपरेटर सेट परिधान करून पाण्यात उतरले व बुडीत मृत मजुरांना बाहेर काढले. सदर दुर्घटनेत शुभम पारकर (२८), अमोल घाटाळ (२७), निखिल घाटाळ (२४) आणि सागर तेंडुलकर (२९) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.

सदर घडलेली घटना ही दुःखद असून आतापर्यंत चारही गुदमरून मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांचे मृतदेह मिळाल्याची माहिती अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी लोकमतला माहिती दिली आहे.

टॅग्स :Virarविरार