शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एस टी पी प्लान्टमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू; विरारच्या ग्लोबल सिटीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2024 15:58 IST

चौघांचेही मृतदेह मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :-विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीतील खाजगी एसटीपी प्लान्टमध्ये चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. चौघांचे मृतदेह शोधण्यात मनपाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे. घटनेच्या ठिकाणी मनपा अधिकारी, अर्नाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी पोहचले आहेत.

विरार पश्चिमकडे असलेल्या खाजगी एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यासाठी तेथील एक कर्मचारी गेला होता. तो परत न आल्याने त्याला शोधण्यासाठी दुसरा कर्मचारी गेला. तोही परत न आल्याने तिसरा कर्मचारी गेला. तिघेही परत न आल्याने चौथा त्यांना शोधण्यासाठी गेला. अशाप्रकारे चौघेही एसटीपी प्लांटमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन दलाला मिळाल्यावर अग्निशमन कर्मचारी तत्काळ दुर्घटना स्थळी पोहोचून ब्रीदिंग ऑपरेटर सेट परिधान करून पाण्यात उतरले व बुडीत मृत मजुरांना बाहेर काढले. सदर दुर्घटनेत शुभम पारकर (२८), अमोल घाटाळ (२७), निखिल घाटाळ (२४) आणि सागर तेंडुलकर (२९) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.

सदर घडलेली घटना ही दुःखद असून आतापर्यंत चारही गुदमरून मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांचे मृतदेह मिळाल्याची माहिती अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी लोकमतला माहिती दिली आहे.

टॅग्स :Virarविरार