शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आहाराची बिले रखडली, नऊ महिने झाले दमडाही दिला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:49 IST

जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलना साठी शासन कटिबद्ध असल्याचा आव आणणाºया सरकारनेच, अंगणवाडीतील हजारो मुलांना पोषण आहार पुरविणाºया महिला बचतगटांच्या आहार

हितेंन नाईक पालघर : जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलना साठी शासन कटिबद्ध असल्याचा आव आणणाºया सरकारनेच, अंगणवाडीतील हजारो मुलांना पोषण आहार पुरविणाºया महिला बचतगटांच्या आहार सामग्रीची बिले गेले नऊ महिने थकविली आहेत. त्यामुळे कुपोषण वाढीच्या चिंतेने ग्रस्त झालेल्या शेकडो महिलांनी कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवारी) जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला.या जिल्ह्यातील एकूण ३ हजार १८३ अंगणवाड्या मधील ६ वर्षा खालील मुलांना पूरक आहार पुरविण्याची जबाबदारी महिला बचत गटांकडे सोपविण्यात आली असून त्या आहारात खिचडी, उसळ, लापशी व लाडू आदी चा समावेश असतो. या पोषण आहाराच्या सामग्रीची बिले एकात्मिक बालविकास यंत्रणेने दरमहा अदा करावी अशी अपेक्षा असते. मात्र मागील नऊ महिन्यापासून या बिलांची रक्कम त्यांना अदा करण्यात आलेली नाही.या बिलांची रक्कम आज ना उद्या मिळेल ह्या आशेवर महिलांनी स्वत: कडील पैसे ही खर्च केलेत. तसेच ह्या बालकांचा आहार थांबू नये ह्यासाठी दुकानदारांकडून ही उधारी-उसनवारी करून धान्य, डाळी आणून बालकांचा आहार सुरू ठेवला. मात्र उधारीचा डोंगर वाढू लागल्याने दुकांदारांनीही आता उधारीवर माल देणे बंद केले.परिणामी ह्या पोषण आहाराचे वेळापत्रक बिघडू लागले आणि बालकांना दिवसातून दोन ऐवजी एकाच वेळी आहार मिळू लागला.केंद्राचा निधी आला नसल्याने आणि राज्यानेही स्वत:चा वाटा न दिल्याने ही अवस्था ओढावली आहे. केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पात महिला व बालविकासाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतही मोठी घट केली जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून अंगणवाड्यांचा पोषण आहार पुरविण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद नसण्याची शक्यता ह्यावेळी मोर्चा दरम्यान व्यक्त करण्यात आली. शासन महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या बाता मारीत असून सरस सारखे उपक्रम राबवून त्यांच्या सक्षमीकरणाचा नुसता डांगोरा पिटला जात आहे तर दुसरीकडे त्यांची बिले मंजूर न करता त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे काम केले जात आहे. त्यातच प्रति बालका मागे आदिवासी भागात (नवसंजीवनी क्षेत्र) नाममात्र दरवाढ करून शासन त्या दृष्टीने वाटचाल तर करीत नाही ना असाही प्रश्न ह्यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आज पालघर रेल्वे स्थानकातून कष्टकरी संघटनेचे प्रमुख ब्रायन लोबो, मधू धोडी, पौर्णिमा मेहेर, आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांचा मोर्चा जिल्हापरिषदेवर धडकला. पोलिसांनी तो जिल्हा परिषदेसमोर अडविल्या नंतर ‘आवाज कुणाचा कष्टकरी बायांचा’, सीईओ साहेबाना विचारतात बाया, हमारा पैसे किसने खाया’ अशा घोषणांनी सारा आसमंत महिलांनी दणाणून सोडला.या होत्या मागण्याअंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाºया बचत गटांची थकीत बिले तात्काळ अदा करण्यात यावीत.मध्यान्ह भोजन योजनेतील स्वयंपाक्यांचे थकीत मानधन व इतर बिले तात्काळ अदा करण्यात यावीत.ही बिले किंवा त्यातील काही रक्कम जिल्हा परीषद अथवा नियोजन विभाग यांच्या कडील सध्याच्या अखर्चीक रक्कमेतून भागविण्यात यावीत.बचतगटांशी संबंधित आर्थिक व्यवहारात पारदर्शकतेचा अवलंब करण्यात यावा.