शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीचे पडघम, भाजपाच्या व्यूहरचनेवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:11 IST

पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अ‍ॅड चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनाने पालघर लोकसभेची सारी समिकरणेच बदलली असून अवघ्या काही महीन्यांसाठी का होईना येथे पोटनिवडणुक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

- हुसेन मेमनजव्हार  - पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अ‍ॅड चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनाने पालघर लोकसभेची सारी समिकरणेच बदलली असून अवघ्या काही महीन्यांसाठी का होईना येथे पोटनिवडणुक होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे उघडपणे नसले तरी सर्वच पक्षांच्या अंतर्गत हालचालीना वेग आला असून भाजपा नेमकी कुणाला उमेदवारी देणार यावरूनच सर्व पक्षांच्या भूमिका ठरणार असल्याचे वृत्त आहे.२०१४ च्या पालघर लोकसभेच्या निवडणूकीत दिवंगत वणगा यांनी २ लाख ३९ हजार मतांनी विरोधकाना धुळ चारली होती. हा कार्यकाल संपायला १५ महीन्याचा कालावधी उरला असताना त्यांच्या निधनाने रीक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विशेषत: ही निवडणूक कॉंग्रेसने गांभिर्याने घेतली असून इतर पक्षांचे मात्र खल सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेची भूमिका भाजपचा उमेदवार कोण असेल यावर ठरणार असल्याचे कळते आहे. कारण जर वणगांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास सेना निवडणूक लढवणार नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच जिल्ह्यातील राजकारणात अल्पावधीमध्ये प्रभावी राजकीय पक्ष ठरलेला बहुजन विकास आघाडीची भूमिका सुद्धा कलटणी देणारी ठरणार आहे.मुळात गोंदीया येथील खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली लोकसभेची जागा आणि पालघर लोकसभा पोटनिवडणूक एकाच वेळी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ही निवडणूक भाजप आणि कॉंग्रेससाठी अतिशय महत्वाची ठरणारी आहे. अगदी कमी कालावधीसाठी जरी ही पोटनिवडणुक होणार असली तरी पालघर हा भाजपाचाच बालेकिल्ला असून मोदी लाट देशात कायम आहे. हे भाजपाला या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून द्यायचे आहे तर भाजपाची लाट ओसरत असून ही जागा आपल्या पदरात ओढून देशात कॉंग्रेसचे पुनरागमन होत आहे हे या निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसला दाखविण्याची संधी असणार आहे.तसेच या पोटनिवडणुकीच्या निकालाचा मोठा परीणाम राज्यातील आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीवरही होणार आहे. यामुळे भाजपावर मोठा दबाव आहे.काँग्रेस निवडणुका सिरीयसली घेणारकाँग्रेसने ही निवडणूक सिरीयसली घेतली असून नुकतेच राजस्थान मधील पोटनिवडणुकीच्या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. याशिवाय भाजप विरोधी पक्षही एकवटलेले आहेत आमच्याकडे अनेक उमेदवारही या लोकसभेसाठी तयार आहेत फक्त उमेदवार निश्चिती बाकी आहे.- केदार काळे,जिल्हाध्यक्ष, काँगेस पालघरअजून आमची याबाबत बैठक झाली नसून काहीही ठरलेले नाही. पण कमी कालावधीसाठीची ही निवडणूक लढवायची किंवा नाही यासाठी सर्व पक्षीय निर्णय सुद्धा घेता येईल तस आम्ही ठरवू. जिल्ह्याच्या विकासासाठी चांगला निर्णय झाला तर तसं अन्यथा लढवायची ठरली तर लढवलीही जाईल.- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष,बहुजन विकास आघाडीअद्याप याबाबत आदेश आलेला नसला तरी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबच याबाबत निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य राहील.- राजेश शहा, जिल्हा प्रमुख, शिवसेना पालघरआमच्या पक्षाची बैठक असून त्यामध्ये याबाबत आमची भूमिका निश्चित होईल. आमची कमिटी जो निर्णय घेइल तो आम्हाला मान्य राहील.- रतन बुधर,राज्य कमिटी सदस्य,माकपाकॉंग्रेस सोबत आमची आघाडी असताना ही जागा कॉंग्रेसकडे होती. तसेच सध्या वरीष्ठ पातळीवरु न आघाडीचे संकेत मिळत असल्याने तसे झाल्यास आम्ही कॉंग्रेस सोबत जावू. मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणुकी बाबत आमचे वरीष्ठच निर्णय घेतील.- सुनील भुसारा,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीही लोकसभेची जागा आमचीच होती. राज्यातील पोटनिवडणुकीचे आजवरचे चित्र पाहता जिथे सेना लढली तिथे आम्ही त्यांना पाठींबा दिला. पालघर विधानसभेतही तेच झाले यामुळे आता लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सेना आमच्या बरोबर राहील असे दिसते.- बाबजी काठोळे, प्रदेश सदस्य, भाजप

टॅग्स :PoliticsराजकारणVasai Virarवसई विरारElectionनिवडणूक