शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तुंगारेश्वर जंगलात पाचच बिबटे

By admin | Updated: April 26, 2017 23:32 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाइतकेच क्षेत्रफळ असलेल्या तुंगारेश्वर अभयारण्यात फक्त पाचच बिबटे उरले असल्याचे आढळून आले आहे.

शशी करपे / वसईसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाइतकेच क्षेत्रफळ असलेल्या तुंगारेश्वर अभयारण्यात फक्त पाचच बिबटे उरले असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर इतर वन्य प्राण्यांचीही संख्या खूपच कमी झाल्याचे दिसून आले आहे. तर शाकाहारी प्राण्यांची संख्याही कमी झाली आहे. मानवी अतिक्रमण वाढल्याने वन्यजीव प्राण्यांच्या अस्तित्वावर परिणाम झाला आहे. इकॉलॉजी या वाईल्ड लाईफ कॉर्झव्हेशन सोसायटी व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांनी तुंगारेश्वर अभयारण्यात बिबट्यांच्या इकोलॉजीचे विविध पैलू तपासण्यासाठी फेब्रुवारी २०१६ ते जुलै २०१६ दरम्यान २९ कॅमेरे लावले होते. वाईल्ड लाईफ कॉर्झव्हेशन सोसायटीचे सहाय्यक संशोधक निकीत सुर्वे आणि डॉ. विद्या अत्रेय यांच्या देखरेखीखाली हा अभ्यास करण्यात आला. यात तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यातील बिबट्यांच्या संख्येचा अंदाज, भक्ष्यांची संख्या, बिबट्यांच्या समस्येशी संबंधित विविध पर्यावरणीय व सामाजिक घटकांचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी २९ ठिकाणी प्रमाणबद्धरित्या ट्रॅप्स कॅमेरे लावण्यात आले होते. प्रत्येक बिबट्या ओळखता यावा यासाठी त्यांच्या दोन्ही बाजूंची छायाचित्रे घेतली गेली. प्रत्येक चार चौरस किलोमीटरच्या २२२ ग्रीडसमध्ये स्मॉल सेल अ‍ॅक्युपन्सी सर्व्हेचा वापर करून वन्य भक्ष्यांच्या घनतेचा अंदाज घेण्यात आला. या सर्व्हेत अभयारण्यात एकूण पाचच बिबटे आढळून आले असून त्यात दोन नर, दोन मादी आणि एक अज्ञात यांचा समावेश आहे. बिबट्यांचे मुख्य अन्न कुत्री असल्याचेही निष्पन्न झाले आहे. अभयारण्यात वन्य भक्ष्यांची घनता खूपच कमी असल्यामुळे स्मॉल सेल अ‍ॅक्युपन्सी सर्व्हेतूनही त्यांची संख्या शोधता आली नाही. अभयारण्यात रानडुक्कर, भेकर, ससा, आणि लंगूर आढळून आले असले तरी त्यांचीही संख्या खूपच कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वेक्षणात चितळ आणि सांबर असल्याबाबत कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ समान असले तरी तुंगारेश्वर अभयारण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. चांगल्या परिणामासाठी येथील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, येथील लोकांशी संवाद साधून अभयारण्याभोवतीच्या गावकऱ्यांना त्याच्यापासून संरक्षण प्राप्त करुन देणे यातून स्थानिकांच्या मानसिकतेला सकारात्मक वळण दिल्यास या भागातील महत्वाचा नैसर्गिक वारसा भविष्यातील पिढ्यांसाठी जपता येईल, अशी शिफारस संशोधकांनी आपल्या अहवालात केली आहे.