शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पाच नद्यांचे वरदान तरी, पाणी टंचाईचा शाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:56 IST

वैतरणा, तानसा, पिंजाळ, दहेर्जे व गारगावी या पाच नद्यांचे वरदान लाभलेल्या वाडा तालुक्याला आजही पाणी टंचाईचा अभिशाप कायम आहे.

- वसंत भोईरवाडा : वैतरणा, तानसा, पिंजाळ, दहेर्जे व गारगावी या पाच नद्यांचे वरदान लाभलेल्या वाडा तालुक्याला आजही पाणी टंचाईचा अभिशाप कायम आहे. बारमाही वाहणाऱ्या या नद्या असताना पाण्याचे नियोजन केले जात नसल्याने नऊ गावांना एप्रिलपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पाण्याचा लाभ तालुक्याला होत नसल्याने गावातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.सागमाळ, दिवेपाडा, टोकडेपाडा, जांभुळपाडा, भोरपाडा, रावतेपाडा, कोमपाडा, वळवीपाडा, वमाळीपाडा या गाव पाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सरकारी पातळीवर कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने नांदणी गावातील नागरिकांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी कुपनलिका खोदण्याचे आश्वासन मोर्चेकºयांना गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी दिले आहे. मात्र, ते पुरेशे नसून वर्तमान स्थितीमध्ये कोणती तरतुद केली असा सवाल आहे. तालुक्यात १६८ गावे आणि २०० हून अधिक पाडे आहेत. तर ८६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांहूनअधिक आहे. वाढत्या औद्योगिककरणामुळे लोकसंख्येत वाढ होत असून त्या प्रमाणात पाण्याच्या समस्येचे निराकरण होत नसल्याने समस्येने उग्र रूप धारण केले आहे.येथील रोलिंग मिल, शीतपेये बनविणाºया कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे पाण्याच्या उपसाही मोठ्या प्रमाणात होत आहे. हेही पाणी कमी पडते म्हणून खासगी कुपनलिकेतून पाण्याचा उपसा केला जातो. एकट्या कोकाकोला कंपनीला दररोज लाखो लीटर पाणी लागते. त्यांना पाणी मिळावे म्हणून वैतरणा नदीवर बंधारा बांधला आहे. मार्च महिन्यानंतर पाण्याची पातळी खाली जाते. त्यानंतर खासगी कूपनलिकेचे पाणी नेले जाते. कोकाकोला कंपनी पाण्यासाठी बंधारा बांधते तर तालुक्यातील नागरिकांच्या पाण्यासाठी बंधारे का बांधले जात नाहीत. असा प्रश्ननागरिकांना पडला आहे.कोको कोला तुपाशी,जनता मात्र तहाणलेलीस्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही नागरिकांना शुध्द पाणी मिळू नये. ही शोकांतिका म्हणावी लागेल. अनेक सरकारे आली आणि गेली. त्यांनी टॅकरमुक्त महाराष्ट्राच्या वल्गना केल्या मात्र पालघर सारख्या आदिवासी जिल्हा अद्यापही टॅकरमुक्त झालेला नाही. कोकोकोला सारख्या कंपनीला रोज हजारो लीटर पाणी उपलब्ध होते मात्र गोरगरीब जनता तहाणेणे व्याकु ळ होते हेच वास्तव आहे.