शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पाच नद्यांचे वरदान तरी, पाणी टंचाईचा शाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:56 IST

वैतरणा, तानसा, पिंजाळ, दहेर्जे व गारगावी या पाच नद्यांचे वरदान लाभलेल्या वाडा तालुक्याला आजही पाणी टंचाईचा अभिशाप कायम आहे.

- वसंत भोईरवाडा : वैतरणा, तानसा, पिंजाळ, दहेर्जे व गारगावी या पाच नद्यांचे वरदान लाभलेल्या वाडा तालुक्याला आजही पाणी टंचाईचा अभिशाप कायम आहे. बारमाही वाहणाऱ्या या नद्या असताना पाण्याचे नियोजन केले जात नसल्याने नऊ गावांना एप्रिलपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पाण्याचा लाभ तालुक्याला होत नसल्याने गावातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.सागमाळ, दिवेपाडा, टोकडेपाडा, जांभुळपाडा, भोरपाडा, रावतेपाडा, कोमपाडा, वळवीपाडा, वमाळीपाडा या गाव पाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सरकारी पातळीवर कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने नांदणी गावातील नागरिकांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी कुपनलिका खोदण्याचे आश्वासन मोर्चेकºयांना गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी दिले आहे. मात्र, ते पुरेशे नसून वर्तमान स्थितीमध्ये कोणती तरतुद केली असा सवाल आहे. तालुक्यात १६८ गावे आणि २०० हून अधिक पाडे आहेत. तर ८६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांहूनअधिक आहे. वाढत्या औद्योगिककरणामुळे लोकसंख्येत वाढ होत असून त्या प्रमाणात पाण्याच्या समस्येचे निराकरण होत नसल्याने समस्येने उग्र रूप धारण केले आहे.येथील रोलिंग मिल, शीतपेये बनविणाºया कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे पाण्याच्या उपसाही मोठ्या प्रमाणात होत आहे. हेही पाणी कमी पडते म्हणून खासगी कुपनलिकेतून पाण्याचा उपसा केला जातो. एकट्या कोकाकोला कंपनीला दररोज लाखो लीटर पाणी लागते. त्यांना पाणी मिळावे म्हणून वैतरणा नदीवर बंधारा बांधला आहे. मार्च महिन्यानंतर पाण्याची पातळी खाली जाते. त्यानंतर खासगी कूपनलिकेचे पाणी नेले जाते. कोकाकोला कंपनी पाण्यासाठी बंधारा बांधते तर तालुक्यातील नागरिकांच्या पाण्यासाठी बंधारे का बांधले जात नाहीत. असा प्रश्ननागरिकांना पडला आहे.कोको कोला तुपाशी,जनता मात्र तहाणलेलीस्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही नागरिकांना शुध्द पाणी मिळू नये. ही शोकांतिका म्हणावी लागेल. अनेक सरकारे आली आणि गेली. त्यांनी टॅकरमुक्त महाराष्ट्राच्या वल्गना केल्या मात्र पालघर सारख्या आदिवासी जिल्हा अद्यापही टॅकरमुक्त झालेला नाही. कोकोकोला सारख्या कंपनीला रोज हजारो लीटर पाणी उपलब्ध होते मात्र गोरगरीब जनता तहाणेणे व्याकु ळ होते हेच वास्तव आहे.