शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाच नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांचे अभय? केला स्वाक्षरीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 06:02 IST

निवडणुक जिंकल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र दाखल न केल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेच्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात यावा असा प्रस्ताव नगरविकास खात्याने मुख्यमंत्र्यांकडे सादर करून वर्ष उलटले तरी त्यावर मुख्यमंत्र्यांकडून...

- शशी करपेवसई : निवडणुक जिंकल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र दाखल न केल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेच्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात यावा असा प्रस्ताव नगरविकास खात्याने मुख्यमंत्र्यांकडे सादर करून वर्ष उलटले तरी त्यावर मुख्यमंत्र्यांकडून सही झालेली नाही. तर यातील एका नगरसेवकाने हायकोर्टाच्या निर्णयाचा फायदा उचलून मुदतीनंतर जातीचा सुधारीत दाखला सादर केल्यानंतर तो जात पडताळणीसाठी पाठवून महापालिकेने त्यांना पाठीशी घातल्याचे उजेडात आले आहे.राखीव जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी सहा महिन्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा नगरसेवकांना भूतलक्षी प्रभावाने अपात्र ठरवण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र हेमांगी विनोद पाटील, शबनम आरीफ शेख, अतुल रमेश साळुंखे, समीर जिकर डबरे (सर्व सत्ताधारी बहुनज विकास आघाडी) आणि शिवसेनेचे स्वप्नील अविनाश बांदेकर या पाच नगरसेवकांनी मुदतीनंतर प्रमाणपत्र सादर केले होते. यातील बांदेकर यांनी ४ दिवस उशिरा, अतुल साळुंखे यांनी १४ दिवस उशिरा, शबनम शेख यांनी १८ दिवस उशिरा आणि हेमांगी पाटील यांनी १६ दिवस उशिराने प्रमाणपत्र सादर केले. तर समीर डबरे यांचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संशोधन अधिकाºयांनी रद्द केल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या नगरसेवकांनी अपात्र ठरवण्यात यावे यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव जिमी घोन्सालवीस यांनी पाठपुुरावा केल्यानंतर वसई विरार महापालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांनी पाच नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव १७ मे २०१६ रोजी नगरविकास खात्याकडे पाठवून दिला होता. हा प्रस्ताव मान्यतेसाठी नगरविकास खात्याचे अवर सचिव अजित कवडे यांनी १८ आॅगस्ट २०१६ रोजी उपसचिवांकडे पाठवून दिला होता. उपसचिव शिंंदे यांनी त्यावर शिक्कामोर्तब करून प्रस्ताव त्याच दिवशी सचिवांकडे पाठवून दिला होता. मात्र, त्यानंतर सदरचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेल्या वर्षभरापासून सहीसाठी प्रलंबित असल्याने तूर्तास नगरसेवकांना जीवदान मिळाले आहे.दरम्यानच्या काळात यातील समीर डबरे यांनी जात वैधता समितीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. जातीचा दाखला डिफेक्टीव्ह असल्याने त्यात दुरुस्ती करण्याची परवानगी त्यांनी हायकोर्टाकडे मागितली होती. तोपर्यंत अपात्रतेचा निर्णय घेण्यास मनाई हुकुम करण्याची विनंती केली होती.सहा महिन्यांचा होता अवधीवसई विरार महापालिकेची निवडणूक १४ जून २०१५ रोजी झाल्यानंतर मतमोजणी १५ जून २०१५ रोजी झाल्यानंतर १७ जून २०१५ रोजी निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सहा महिन्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे होते. त्यातील ३६ नगरसेवकांनी विहीत मुदतीत प्रमाणपत्र सादर केले होते.हायकोर्टाच्या निर्देशानुसार चार आठवड्याच्या मुदतीत जातीचा दाखला सादर केला आहे. महापालिकेने पडताळणीसाठी पाठवून दिला आहे.- समीर डबरे, नगरसेवकविधी विभागाच्या सल्ल्यानुसार डबरे यांचा जातीचा दाखला वैधता पडताळणीसाठी समितीकडे पाठवण्यात आला आहे.- सुरेंद्र पाटील, सहाय्यक आयुक्त, वसई विरार महापालिकापाचही नगरसेवकांना अपात्र ठरवण्यावर नगरविकास खात्याच्या अधिकाºयांनी शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, बविआच्या तीन आमदारांचा राज्य सरकारला पाठिंबा असल्याने मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी प्रस्तावर सही करीत नाहीत.- अ‍ॅड. जिमी घोन्सालवीस, प्रदेश सचिव, काँग्रेस

टॅग्स :Vasai Virarवसई विरार