शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हेमुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांसोबत ग्राहकांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:49 IST

मच्छीचे दर २०० ते ३०० रुपयांनी वाढले : खवय्यांच्या खिशाला कात्री, कोळीही नाराज

विरार : ओ.एन.जी.सी.ने तेल आणि वायूचा साठा शोधण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे दीड महिने मासेमारी बंद असणार आहे. काही विभागात मासेमारी बंद असल्यामुळे मोठ्या माशांचे दर वाढलेले आहेत. मासेमारी नसेल तर त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारांचे हाल होणार आहेतच, पण किंमत वाढल्यामुळे ग्राहकांना देखील आता दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. हिवाळ्यात ज्या माशांची सर्वात जास्त मागणी असते त्याच माशांचे दर वाढल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

दरवर्षी प्रमाणे ओ.एन.जी.सी ने वर्षाच्या सुरु वातीला अचानक मोहीम राबवण्याची सूचना दिल्याने मासेमारांचे धाबे दणाणले आहेत. मासेमारी दीड महिन्यांसाठी ठप्प होणार आहे तर किनाºया जवळच मासेमारी सुरु असल्याने हवे तसे मासे मिळत नाहीत. यामुळे माशांचे दर २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. माशांचे दर वाढल्याने मासे खाणाºयांंचे हाल होणार आहेत. हिवाळ्यामध्ये मासे गरम उब मिळवण्याकरिता समुद्रकिनाºया पासून लांब जातात व ओ.एन.जी.सी आपल्या सर्च आॅपरेशन अंतर्गत पाण्यात स्फोट करीत असल्याने लांब गेलेले मासे या ध्वनी प्रदुषणामुळे आणखी लांब जातात तर काही मासे मारतात. या स्फोटामुळे जल प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे अजून काही महिने मासेमारी करता येणार नसल्याचे ओ.एन.जी.सीने सांगितले आहे.

कोळी लोकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु असतो. मात्र, आता मासेमारी बंद होणार असल्याने घर कसे चालवायचे? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. या मोहिमेमुळे मच्छी विक्र ीचे प्रमाण कमी होते व मासेमारी करणाºयांच्या उत्पन्नावर फरक पडतो. किनाºयाजवळ मच्छी मिळत असली तरी, त्याचा हवा तसा दर मिळत नाही. त्यामुळे मासेमारी करणाºयांना याचा मोठा धक्का बसलेला आहे.

हिवाळ्यात जे मासे खाण्यासारखे असतात ते खाण्यासाठी देखील ग्राहकांना दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. ओ.एन.जी.सी च्या या मोहिमेत अनेकांचे नुकसान झाले आहे. पण आॅगस्ट नंतर मासेमारी खºया अर्थाने सुरु होते त्यामुळे या मोहिमेसाठी हीच योग्य वेळ आहे असे देखील बोलले जात आहे. दरम्यान, या मोहिमेमुळे कोळ्यांचे नुकसान तर खवय्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.मोठे मासे तर मिळतच नाहीत मात्र छोट्या माशांचे दर वाढल्याने ग्राहक देखील मासे खरेदी करतांना खूपच विचार करतात. त्यामुळे आम्हाला रोजगार कमी मिळत आहे. आमचा या मोहिमेला विरोध नसून, स्फोट करण्याला विरोध आहे. विस्फोट न करता जर ही मोहीम राबवली गेली तर जास्त चांगल असेल असे आम्हांला वाटते.- लिओ कोलॅसो, अध्यक्ष (पाचूबंदर मच्छीमार समिती )

टॅग्स :Vasai Virarवसई विरार