शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर्व्हेमुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांसोबत ग्राहकांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:49 IST

मच्छीचे दर २०० ते ३०० रुपयांनी वाढले : खवय्यांच्या खिशाला कात्री, कोळीही नाराज

विरार : ओ.एन.जी.सी.ने तेल आणि वायूचा साठा शोधण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे दीड महिने मासेमारी बंद असणार आहे. काही विभागात मासेमारी बंद असल्यामुळे मोठ्या माशांचे दर वाढलेले आहेत. मासेमारी नसेल तर त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारांचे हाल होणार आहेतच, पण किंमत वाढल्यामुळे ग्राहकांना देखील आता दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. हिवाळ्यात ज्या माशांची सर्वात जास्त मागणी असते त्याच माशांचे दर वाढल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

दरवर्षी प्रमाणे ओ.एन.जी.सी ने वर्षाच्या सुरु वातीला अचानक मोहीम राबवण्याची सूचना दिल्याने मासेमारांचे धाबे दणाणले आहेत. मासेमारी दीड महिन्यांसाठी ठप्प होणार आहे तर किनाºया जवळच मासेमारी सुरु असल्याने हवे तसे मासे मिळत नाहीत. यामुळे माशांचे दर २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. माशांचे दर वाढल्याने मासे खाणाºयांंचे हाल होणार आहेत. हिवाळ्यामध्ये मासे गरम उब मिळवण्याकरिता समुद्रकिनाºया पासून लांब जातात व ओ.एन.जी.सी आपल्या सर्च आॅपरेशन अंतर्गत पाण्यात स्फोट करीत असल्याने लांब गेलेले मासे या ध्वनी प्रदुषणामुळे आणखी लांब जातात तर काही मासे मारतात. या स्फोटामुळे जल प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे अजून काही महिने मासेमारी करता येणार नसल्याचे ओ.एन.जी.सीने सांगितले आहे.

कोळी लोकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु असतो. मात्र, आता मासेमारी बंद होणार असल्याने घर कसे चालवायचे? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. या मोहिमेमुळे मच्छी विक्र ीचे प्रमाण कमी होते व मासेमारी करणाºयांच्या उत्पन्नावर फरक पडतो. किनाºयाजवळ मच्छी मिळत असली तरी, त्याचा हवा तसा दर मिळत नाही. त्यामुळे मासेमारी करणाºयांना याचा मोठा धक्का बसलेला आहे.

हिवाळ्यात जे मासे खाण्यासारखे असतात ते खाण्यासाठी देखील ग्राहकांना दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. ओ.एन.जी.सी च्या या मोहिमेत अनेकांचे नुकसान झाले आहे. पण आॅगस्ट नंतर मासेमारी खºया अर्थाने सुरु होते त्यामुळे या मोहिमेसाठी हीच योग्य वेळ आहे असे देखील बोलले जात आहे. दरम्यान, या मोहिमेमुळे कोळ्यांचे नुकसान तर खवय्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.मोठे मासे तर मिळतच नाहीत मात्र छोट्या माशांचे दर वाढल्याने ग्राहक देखील मासे खरेदी करतांना खूपच विचार करतात. त्यामुळे आम्हाला रोजगार कमी मिळत आहे. आमचा या मोहिमेला विरोध नसून, स्फोट करण्याला विरोध आहे. विस्फोट न करता जर ही मोहीम राबवली गेली तर जास्त चांगल असेल असे आम्हांला वाटते.- लिओ कोलॅसो, अध्यक्ष (पाचूबंदर मच्छीमार समिती )

टॅग्स :Vasai Virarवसई विरार