शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

३१ मे आधीच मासेमारीवर बंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:37 IST

समस्यांचे घोंगडे भिजत । ओएनजीसीच्या सर्वेक्षणामुळे अनेकांनी बोटी नांगरल्या

- हितेन नाईक 

पालघर : ओएनजीसीच्या सर्वेक्षणाबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री, स्थानिक आमदार आदींनी जिल्ह्यातील मच्छिमारांच्या केलेल्या फसवणुकीचा मोठा फटका मच्छिमाराना बसत असून केळवे ते डहाणूच्या भागात पुन्हा सुरू झालेल्या सर्वेक्षणाचा फटका मासेमारी व्यवसायाला बसत असून समुद्रात मासेमारीला गेलेल्या बोटींना मासेमारी करण्यास प्रतिबंध केला जात असल्याने ३१ मे या मासेमारी बंदीच्या आधीच मच्छीमारांना नाईलाजाने मासेमारी बंद करण्याची पाळी ओढवली आहे.

समुद्रात ओएनजीसीकडून भूगर्भातील तेल आणि वायूंच्या साठ्यांचे शोध घेण्यासाठी १ जानेवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान सेसमिक सर्व्हे सुरू करण्यात आल्याने मासेमारी व्यवसायावर झालेल्या गंभीर परिणामामुळे जिल्ह्यातील सर्व मच्छिीमारांनी १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत आपला रोष व्यक्त केला होता. तसेच समुद्रातील सर्वेक्षणाच्या ठिकाणी जात निषेध मोर्चा काढून सर्वेक्षण बंद न केल्यास रोजी रोटीसाठी वेळ आल्यास कायदा हातात घेण्याची घोषणाही करण्यात आली होती. यावर प्रशासनाने ४ फेब्रुवारी व १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत ठरलेल्याप्रमाणे समुद्री मत्स्यकी संशोधन केंद्र मुंबई कडून जोपर्यंत अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत सर्वेक्षण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मच्छिमारांचा सर्वेक्षणाला असणारा मोठा विरोध पाहता हे बंद करण्यात आलेले सर्वेक्षण पुन्हा सुरु करण्याचे धाडस ओएनजीसी व मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्याना होत नव्हते. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या सर्वेक्षणामुळे भाडेतत्त्वावर परदेशातून आणलेल्या मोठ्या बोटी, अद्ययावत सामग्री, मनुष्यबळ आदींचा कोट्यवधी रुपयांचा तोटा ओएनजीसीला होऊ लागल्याने मच्छिमारांचा होणारा विरोध शमविण्यासाठी अधिकारी वर्गानी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार अमित घोडा यांच्याशी संधान साधले. आ.घोडा यांनी पालघरमधील काही निवडक मच्छिमार प्रतिनिधींना मंत्रालयात तत्काळ बोलावून घेतले. राज्यमंत्री खोतकरांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या दालनात तीन मच्छिमार प्रतिनिधी यांची बैठक पार पडली.

या बैठकीत राज्यमंत्र्यांनी मच्छिमार सर्वेक्षणाला करीत असलेल्या विरोधाबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत हे देशहिताचे काम असल्याचे सांगून मच्छिमाराना त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळेल मात्र त्यांनी विरोध करणे सोडून द्यावे, असे उपस्थित मच्छिमाराना बजावले होते.