शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘मच्छीमार समाजाने आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारावे’

By admin | Updated: October 6, 2015 23:21 IST

मच्छीमारांनी यापुढे मासेमारीचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे तसेच संचालक मंडळात तरूणांना वाव द्यायला हवा असे उद्गार वसई पाचूबंदर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या

वसई : मच्छीमारांनी यापुढे मासेमारीचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे तसेच संचालक मंडळात तरूणांना वाव द्यायला हवा असे उद्गार वसई पाचूबंदर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सागरी भवनाचे उद्घाटन करताना आ. हितेंद्र ठाकूर यांनी काढले.वसई पाचूबंदर येथे वसई सागरी कोळी मच्छीमार संस्थेतर्फे नवीन कार्यालय उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन आ. हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते झाले. विरोधासाठी विरोध हा प्रगतीला मारक ठरतो. मतभेद, वाद, भांडणे असायला हवी परंतु त्यातून चांगले काही निष्पन्न झाले पाहिजे. अनेकदा मच्छीमारांसाठी असणाऱ्या प्रकल्पांना केवळ अज्ञानातून विरोध होतो. त्यामुळे प्रकल्प आधी समजून घ्या व आपले किती नुकसान होईल याचा विचार करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सहकाराच्या माध्यमातुन समाजाचा उत्कर्ष होऊ शकतो. सहकारामध्ये मोठी ताकद आहे. मासेमारी व्यवसायाला महानगरपालिकेकडून सर्वोतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमामध्ये सहा. मत्स्य व्यवसाय आयुक्त रविंद्र वायडा, स्थायी समिती सभापती नितीन राऊत, मच्छीमार समाजाचे नेते फिलीप मस्तान व दयानंद कोळी यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)