शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

‘मच्छीमार समाजाने आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारावे’

By admin | Updated: October 6, 2015 23:21 IST

मच्छीमारांनी यापुढे मासेमारीचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे तसेच संचालक मंडळात तरूणांना वाव द्यायला हवा असे उद्गार वसई पाचूबंदर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या

वसई : मच्छीमारांनी यापुढे मासेमारीचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे तसेच संचालक मंडळात तरूणांना वाव द्यायला हवा असे उद्गार वसई पाचूबंदर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सागरी भवनाचे उद्घाटन करताना आ. हितेंद्र ठाकूर यांनी काढले.वसई पाचूबंदर येथे वसई सागरी कोळी मच्छीमार संस्थेतर्फे नवीन कार्यालय उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन आ. हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते झाले. विरोधासाठी विरोध हा प्रगतीला मारक ठरतो. मतभेद, वाद, भांडणे असायला हवी परंतु त्यातून चांगले काही निष्पन्न झाले पाहिजे. अनेकदा मच्छीमारांसाठी असणाऱ्या प्रकल्पांना केवळ अज्ञानातून विरोध होतो. त्यामुळे प्रकल्प आधी समजून घ्या व आपले किती नुकसान होईल याचा विचार करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सहकाराच्या माध्यमातुन समाजाचा उत्कर्ष होऊ शकतो. सहकारामध्ये मोठी ताकद आहे. मासेमारी व्यवसायाला महानगरपालिकेकडून सर्वोतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमामध्ये सहा. मत्स्य व्यवसाय आयुक्त रविंद्र वायडा, स्थायी समिती सभापती नितीन राऊत, मच्छीमार समाजाचे नेते फिलीप मस्तान व दयानंद कोळी यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)