शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

आधी नुकसानभरपाई, मगच सर्वेक्षण

By admin | Updated: June 30, 2017 02:36 IST

मुंबई वडोदरा व्हाया पनवेल हा महामार्ग पालघर व ठाणे जिल्ह्यातून जात असून या संदर्भात वाडा पंचायत समितीच्या प्रशिक्षण सभागृहात

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : मुंबई वडोदरा व्हाया पनवेल हा महामार्ग पालघर व ठाणे जिल्ह्यातून जात असून या संदर्भात वाडा पंचायत समितीच्या प्रशिक्षण सभागृहात बुधवारी सायंकाळी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी मोहन नळंदकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी कल्याणकारी संघटनेने आधी नुकसानभरपाई निश्चित करा मगच सर्वेक्षण करू देऊ अन्यथा नाही असा इशारा दिला. या मार्गासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. या मार्गात ठाणे व पालघर जिल्हयÞातील अनेक शेतकरी भूमिहीन व बेघर होणार आहेत. त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकरी कल्याणकारी संघटनेची स्थापना करण्यात आली असून तिच्या झेंड्याखाली शेतकरी एकवटले आहेत. बुधवारी वाड्याचे उपविभागीय अधिकारी मोहन नळंदकर यांनी बाधित शेतकऱ््यांची बैठक पंचायत समितीच्या प्रशिक्षण सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. महामार्गामुळे अनेक जण बेघर होणार तर काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. बाजारहाटीचे मार्ग बंद होणार असून शेतकऱ्यांच्या शेतीवर जाण्याचे मार्गही बंद होऊन त्यांना फेरा मारून शेतावर जावे लागणार आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या कूपनलिका , विहीरी उध्वस्त होणार आहेत. अशा अनेक समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या. त्याबाबत शासनाला कळविले जाईल, असे नळंदकर यांनी सांगितले. जोपर्यंत नुकसानभरपाई निश्चित करीत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्वेक्षण करून देणार नाही. शासन जबरदस्ती करीत असेल तर तशा पध्दतीने उत्तर दिले जाईल असा इशारा शेतकरी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा भोईर यांनी बैठकीत दिला. या बैठकीस तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे सह महामार्गाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. आता शासन कोणती भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.