शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क स्थानिकांचा; डहाणूत पाणी परिषद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 03:36 IST

सूर्या प्रकल्पातून तारापूर औद्योगिक क्षेत्राला ५२ दशलक्ष घनमीटर, वसई-विरार महापालिकेसाठी ५०३ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात येत आहे.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : सूर्या धरणाच्या पाण्यावर पहिला अधिकार स्थानिकांचा आहे, असा इशारा सूर्या पाणीबचाव संघर्ष समितीने पाणी परिषदेत दिला आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत ३६ हजार ७४० एकर इतक्या लाभ क्षेत्राकरिता सिंचन सुविधा अबाधित राहण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात यावी, वेगवेगळ्या शहरांना पाणीपुरवठा होताना लगतच्या गावांमध्ये व लाभ क्षेत्रामधील गावांना पिण्याचे पाणी पुरवण्यात यावे तसेच वेती गावातील प्रत्येक घरामध्ये नळपाणी योजना सुरू करावी, या व इतर मागण्यांसाठी पाठपुरावा आदी मुद्दे वाणगाव खंबाळे येथे मंगळवारी झालेल्या परिषदेत ठरवण्यात आले.

या परिषदेत आमदार श्रीनिवास वनगा, विनोद निकोले, सुनील भुसारा, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुशील चुरी, बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, डहाणू पंचायत समिती सभापती व उपसभापती तसेच प्रकल्पबाधित शेतकरी, स्थानिक आदिवासी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सूर्या प्रकल्पातून तारापूर औद्योगिक क्षेत्राला ५२ दशलक्ष घनमीटर, वसई-विरार महापालिकेसाठी ५०३ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात येत आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत साठवण्यात येणाऱ्या पाण्यापैकी ७९ टक्के पाणी बिगर सिंचनासाठी वळवण्यात आले आहे. यासंदर्भात यापूर्वी झालेल्या आंदोलनानंतर राज्यपालांशी झालेल्या चर्चा हाेऊन पाटबंधारे प्रकल्पातील ३६ हजार ७४० एकर लाभक्षेत्रात सिंचन व्यवस्था कायम ठेवण्याबाबत निर्णय घेतला होता. यादृष्टीने पाटबंधारे विभाग, नगरविकास विभाग तसेच आदिवासी विकास विभागाच्या सचिवस्तरीय समितीची स्थापना करून या निर्णयाबाबतची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत.

परिषदेतील महत्त्वपूर्ण ठराव

  • मूळ सूर्या प्रकल्पात ठरल्याप्रमाणे सिंचन क्षेत्रात कपात करण्यात येऊ नये.
  • कालव्यांची तत्काळ दुरुस्ती व वितरण वाहिन्यांची नूतनीकरण कामे सुरू करावी.
  • प्रस्तावित सिंचन क्षेत्रात आवश्यक पाणी उपलब्ध होईपर्यंत पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये.
  • प्रकल्प क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पाणीवापर संस्था स्थापन करण्यात याव्यात.
  • बिगर सिंचन क्षेत्रातील ग्राहकांकडून पाणीपट्टीद्वारे मिळणाऱ्या महसुलातून आदिवासी शेतकऱ्यांची पाणीबिले भरण्याची तरतूद करावी.
  • नागरी-शहरी भागांतील घरगुती व औद्योगिक वापरासाठी पाण्याचा पर्यायी वापरण्यात यावा.
  • पाण्याच्या आरक्षणात नव्याने वाढ करण्यात येऊ नये.
टॅग्स :Vasai Virarवसई विरार