शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

सूर्या धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क स्थानिकांचा; डहाणूत पाणी परिषद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 03:36 IST

सूर्या प्रकल्पातून तारापूर औद्योगिक क्षेत्राला ५२ दशलक्ष घनमीटर, वसई-विरार महापालिकेसाठी ५०३ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात येत आहे.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : सूर्या धरणाच्या पाण्यावर पहिला अधिकार स्थानिकांचा आहे, असा इशारा सूर्या पाणीबचाव संघर्ष समितीने पाणी परिषदेत दिला आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत ३६ हजार ७४० एकर इतक्या लाभ क्षेत्राकरिता सिंचन सुविधा अबाधित राहण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात यावी, वेगवेगळ्या शहरांना पाणीपुरवठा होताना लगतच्या गावांमध्ये व लाभ क्षेत्रामधील गावांना पिण्याचे पाणी पुरवण्यात यावे तसेच वेती गावातील प्रत्येक घरामध्ये नळपाणी योजना सुरू करावी, या व इतर मागण्यांसाठी पाठपुरावा आदी मुद्दे वाणगाव खंबाळे येथे मंगळवारी झालेल्या परिषदेत ठरवण्यात आले.

या परिषदेत आमदार श्रीनिवास वनगा, विनोद निकोले, सुनील भुसारा, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुशील चुरी, बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, डहाणू पंचायत समिती सभापती व उपसभापती तसेच प्रकल्पबाधित शेतकरी, स्थानिक आदिवासी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सूर्या प्रकल्पातून तारापूर औद्योगिक क्षेत्राला ५२ दशलक्ष घनमीटर, वसई-विरार महापालिकेसाठी ५०३ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात येत आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत साठवण्यात येणाऱ्या पाण्यापैकी ७९ टक्के पाणी बिगर सिंचनासाठी वळवण्यात आले आहे. यासंदर्भात यापूर्वी झालेल्या आंदोलनानंतर राज्यपालांशी झालेल्या चर्चा हाेऊन पाटबंधारे प्रकल्पातील ३६ हजार ७४० एकर लाभक्षेत्रात सिंचन व्यवस्था कायम ठेवण्याबाबत निर्णय घेतला होता. यादृष्टीने पाटबंधारे विभाग, नगरविकास विभाग तसेच आदिवासी विकास विभागाच्या सचिवस्तरीय समितीची स्थापना करून या निर्णयाबाबतची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत.

परिषदेतील महत्त्वपूर्ण ठराव

  • मूळ सूर्या प्रकल्पात ठरल्याप्रमाणे सिंचन क्षेत्रात कपात करण्यात येऊ नये.
  • कालव्यांची तत्काळ दुरुस्ती व वितरण वाहिन्यांची नूतनीकरण कामे सुरू करावी.
  • प्रस्तावित सिंचन क्षेत्रात आवश्यक पाणी उपलब्ध होईपर्यंत पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये.
  • प्रकल्प क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पाणीवापर संस्था स्थापन करण्यात याव्यात.
  • बिगर सिंचन क्षेत्रातील ग्राहकांकडून पाणीपट्टीद्वारे मिळणाऱ्या महसुलातून आदिवासी शेतकऱ्यांची पाणीबिले भरण्याची तरतूद करावी.
  • नागरी-शहरी भागांतील घरगुती व औद्योगिक वापरासाठी पाण्याचा पर्यायी वापरण्यात यावा.
  • पाण्याच्या आरक्षणात नव्याने वाढ करण्यात येऊ नये.
टॅग्स :Vasai Virarवसई विरार