शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

"मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करा अन्यथा...", आमदार सरनाईकांचा इशारा

By धीरज परब | Updated: April 27, 2024 19:23 IST

पालिकेने व एमएमआरडीएने अनेक सिमेंट रस्त्यांची कामे चालवली आहेत.

मीरारोड- मीरा भाईंदर पालिकेचे योग्य नियोजन आणि समन्वय नसल्याने शहरात सुरु असणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे संथ गतीने सुरु असून त्यातून वाहतूक कोंडी व रहदारीला त्रास होत आहे. त्यामुळे स्वतः आयुक्तांनी लक्ष घालून मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करावी असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. 

मीरा भाईंदर शहराला खड्डे मुक्त करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीने शहरात एमएमआरडीए आणि पालिकेच्या माध्यमातून काँक्रीट रस्ते बांधण्याचे काम सुरु झाले आहे. काँक्रीट रस्त्याच्या कामांसाठी शासना कडून निधी मंजूर करतानाच पालिकेला कर्ज घेता यावे म्हणून त्याला सुद्धा मंजुरी आणून दिली आहे. 

पालिकेने व एमएमआरडीएने अनेक सिमेंट रस्त्यांची कामे चालवली आहेत. परंतु सिमेंट रस्ते बनवण्यासाठी आधीचे रस्ते खोदकाम करताना आतील जलवाहिन्या, नळ जोडण्या, वीज केबल, गॅस पाईप लाईन, एमटीएनएल सह अन्य फायबर केबल आदी असल्याने त्याची शिफ्टिंग रस्त्याच्या कडेला करणे आवश्यक आहे. 

परंतु सदर कामे करताना पालिकेचे नियोजन नाही आणि संबंधित विविध विभागां मध्ये समन्वय न ठेवल्याने तसेच कामे वेगाने होत नसल्याने सिमेंट रस्त्यांची कामे संथ गतीने सुरु आहेत. अनेक भागात तर रस्ते खोदून ठेवले आहेत व काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकी कोंडी सह रहदारीला अडथळे सहन करावे लागत आहेत. धुळीचे साम्राज्य पसरल्याने लोकांना आरोग्याची समस्या भेडसावत आहे. जनता नाराज असताना व पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपला असतानाही महापालिका प्रशासनाला गांभीर्य दिसत नाही.

एमएमआरडीएच्या रस्त्यांची कामे पालिकेच्या कामांच्या तुलनेत वेगाने होत आहेत . पावसाळ्याच्या आधी कामे पूर्ण करण्याबाबत महापालिकेचे कोणतेही ठोस नियोजन दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांची सध्या सुरु असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील की नाही याबाबत शंका आहे. ‘सखोल स्वछता मोहीम’ राबवून वेळोवेळी रस्त्यावरील धुळीचे साम्राज्य दूर व्हावे, रस्ते स्वच्छ राहावेत म्हणून रस्ते पाण्याने धुण्यात यावेत हे मुख्यमंत्र्यांचे आदेशही महापालिकेने पाळलेले नाहीत.

शहरातील सर्व प्रमुख रस्ते हे दर्जेदार व सिमेंट काँक्रीटचे करण्याचा शब्द  मुख्यमंत्री व स्थानिक आमदार म्हणून मी तसेच राज्यातील शिवसेना -भाजप- राष्ट्रवादी महायुती सरकारने मीरा भाईंदरच्या जनतेला दिला आहे. खड्डेमुक्त शहर करण्याचा शब्द दिला असताना महापालिका प्रशासन सर्व कामात विलंब-दिरंगाई करून त्याला हरताळ फासत आहे.

मुख्यमंत्री यांनी स्वतः रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा असे सूचित करून देखील मुख्यमंत्र्यांच्या आदेशांकडे ही दुर्लक्ष केले जात आहे. संथ गतीने सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे जनतेतील रोष वाढत असून त्याचा आम्हाला लोकसभा , विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

एकूणच महापालिका प्रशासनाचा कासव गतीने सुरु असलेला कारभार पाहता आपण गंभीरपणे पावले टाकली नाहीत तर आपल्या या कारभाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करावी लागेल असा इशारा देखील आ. सरनाईक यांनी आयुक्त संजय काटकर यांना दिला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोडpratap sarnaikप्रताप सरनाईक