शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

"मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करा अन्यथा...", आमदार सरनाईकांचा इशारा

By धीरज परब | Updated: April 27, 2024 19:23 IST

पालिकेने व एमएमआरडीएने अनेक सिमेंट रस्त्यांची कामे चालवली आहेत.

मीरारोड- मीरा भाईंदर पालिकेचे योग्य नियोजन आणि समन्वय नसल्याने शहरात सुरु असणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे संथ गतीने सुरु असून त्यातून वाहतूक कोंडी व रहदारीला त्रास होत आहे. त्यामुळे स्वतः आयुक्तांनी लक्ष घालून मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करावी असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. 

मीरा भाईंदर शहराला खड्डे मुक्त करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीने शहरात एमएमआरडीए आणि पालिकेच्या माध्यमातून काँक्रीट रस्ते बांधण्याचे काम सुरु झाले आहे. काँक्रीट रस्त्याच्या कामांसाठी शासना कडून निधी मंजूर करतानाच पालिकेला कर्ज घेता यावे म्हणून त्याला सुद्धा मंजुरी आणून दिली आहे. 

पालिकेने व एमएमआरडीएने अनेक सिमेंट रस्त्यांची कामे चालवली आहेत. परंतु सिमेंट रस्ते बनवण्यासाठी आधीचे रस्ते खोदकाम करताना आतील जलवाहिन्या, नळ जोडण्या, वीज केबल, गॅस पाईप लाईन, एमटीएनएल सह अन्य फायबर केबल आदी असल्याने त्याची शिफ्टिंग रस्त्याच्या कडेला करणे आवश्यक आहे. 

परंतु सदर कामे करताना पालिकेचे नियोजन नाही आणि संबंधित विविध विभागां मध्ये समन्वय न ठेवल्याने तसेच कामे वेगाने होत नसल्याने सिमेंट रस्त्यांची कामे संथ गतीने सुरु आहेत. अनेक भागात तर रस्ते खोदून ठेवले आहेत व काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकी कोंडी सह रहदारीला अडथळे सहन करावे लागत आहेत. धुळीचे साम्राज्य पसरल्याने लोकांना आरोग्याची समस्या भेडसावत आहे. जनता नाराज असताना व पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपला असतानाही महापालिका प्रशासनाला गांभीर्य दिसत नाही.

एमएमआरडीएच्या रस्त्यांची कामे पालिकेच्या कामांच्या तुलनेत वेगाने होत आहेत . पावसाळ्याच्या आधी कामे पूर्ण करण्याबाबत महापालिकेचे कोणतेही ठोस नियोजन दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांची सध्या सुरु असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील की नाही याबाबत शंका आहे. ‘सखोल स्वछता मोहीम’ राबवून वेळोवेळी रस्त्यावरील धुळीचे साम्राज्य दूर व्हावे, रस्ते स्वच्छ राहावेत म्हणून रस्ते पाण्याने धुण्यात यावेत हे मुख्यमंत्र्यांचे आदेशही महापालिकेने पाळलेले नाहीत.

शहरातील सर्व प्रमुख रस्ते हे दर्जेदार व सिमेंट काँक्रीटचे करण्याचा शब्द  मुख्यमंत्री व स्थानिक आमदार म्हणून मी तसेच राज्यातील शिवसेना -भाजप- राष्ट्रवादी महायुती सरकारने मीरा भाईंदरच्या जनतेला दिला आहे. खड्डेमुक्त शहर करण्याचा शब्द दिला असताना महापालिका प्रशासन सर्व कामात विलंब-दिरंगाई करून त्याला हरताळ फासत आहे.

मुख्यमंत्री यांनी स्वतः रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा असे सूचित करून देखील मुख्यमंत्र्यांच्या आदेशांकडे ही दुर्लक्ष केले जात आहे. संथ गतीने सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे जनतेतील रोष वाढत असून त्याचा आम्हाला लोकसभा , विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

एकूणच महापालिका प्रशासनाचा कासव गतीने सुरु असलेला कारभार पाहता आपण गंभीरपणे पावले टाकली नाहीत तर आपल्या या कारभाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करावी लागेल असा इशारा देखील आ. सरनाईक यांनी आयुक्त संजय काटकर यांना दिला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोडpratap sarnaikप्रताप सरनाईक