शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करा अन्यथा...", आमदार सरनाईकांचा इशारा

By धीरज परब | Updated: April 27, 2024 19:23 IST

पालिकेने व एमएमआरडीएने अनेक सिमेंट रस्त्यांची कामे चालवली आहेत.

मीरारोड- मीरा भाईंदर पालिकेचे योग्य नियोजन आणि समन्वय नसल्याने शहरात सुरु असणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे संथ गतीने सुरु असून त्यातून वाहतूक कोंडी व रहदारीला त्रास होत आहे. त्यामुळे स्वतः आयुक्तांनी लक्ष घालून मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करावी असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. 

मीरा भाईंदर शहराला खड्डे मुक्त करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीने शहरात एमएमआरडीए आणि पालिकेच्या माध्यमातून काँक्रीट रस्ते बांधण्याचे काम सुरु झाले आहे. काँक्रीट रस्त्याच्या कामांसाठी शासना कडून निधी मंजूर करतानाच पालिकेला कर्ज घेता यावे म्हणून त्याला सुद्धा मंजुरी आणून दिली आहे. 

पालिकेने व एमएमआरडीएने अनेक सिमेंट रस्त्यांची कामे चालवली आहेत. परंतु सिमेंट रस्ते बनवण्यासाठी आधीचे रस्ते खोदकाम करताना आतील जलवाहिन्या, नळ जोडण्या, वीज केबल, गॅस पाईप लाईन, एमटीएनएल सह अन्य फायबर केबल आदी असल्याने त्याची शिफ्टिंग रस्त्याच्या कडेला करणे आवश्यक आहे. 

परंतु सदर कामे करताना पालिकेचे नियोजन नाही आणि संबंधित विविध विभागां मध्ये समन्वय न ठेवल्याने तसेच कामे वेगाने होत नसल्याने सिमेंट रस्त्यांची कामे संथ गतीने सुरु आहेत. अनेक भागात तर रस्ते खोदून ठेवले आहेत व काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकी कोंडी सह रहदारीला अडथळे सहन करावे लागत आहेत. धुळीचे साम्राज्य पसरल्याने लोकांना आरोग्याची समस्या भेडसावत आहे. जनता नाराज असताना व पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपला असतानाही महापालिका प्रशासनाला गांभीर्य दिसत नाही.

एमएमआरडीएच्या रस्त्यांची कामे पालिकेच्या कामांच्या तुलनेत वेगाने होत आहेत . पावसाळ्याच्या आधी कामे पूर्ण करण्याबाबत महापालिकेचे कोणतेही ठोस नियोजन दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांची सध्या सुरु असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील की नाही याबाबत शंका आहे. ‘सखोल स्वछता मोहीम’ राबवून वेळोवेळी रस्त्यावरील धुळीचे साम्राज्य दूर व्हावे, रस्ते स्वच्छ राहावेत म्हणून रस्ते पाण्याने धुण्यात यावेत हे मुख्यमंत्र्यांचे आदेशही महापालिकेने पाळलेले नाहीत.

शहरातील सर्व प्रमुख रस्ते हे दर्जेदार व सिमेंट काँक्रीटचे करण्याचा शब्द  मुख्यमंत्री व स्थानिक आमदार म्हणून मी तसेच राज्यातील शिवसेना -भाजप- राष्ट्रवादी महायुती सरकारने मीरा भाईंदरच्या जनतेला दिला आहे. खड्डेमुक्त शहर करण्याचा शब्द दिला असताना महापालिका प्रशासन सर्व कामात विलंब-दिरंगाई करून त्याला हरताळ फासत आहे.

मुख्यमंत्री यांनी स्वतः रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा असे सूचित करून देखील मुख्यमंत्र्यांच्या आदेशांकडे ही दुर्लक्ष केले जात आहे. संथ गतीने सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे जनतेतील रोष वाढत असून त्याचा आम्हाला लोकसभा , विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

एकूणच महापालिका प्रशासनाचा कासव गतीने सुरु असलेला कारभार पाहता आपण गंभीरपणे पावले टाकली नाहीत तर आपल्या या कारभाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करावी लागेल असा इशारा देखील आ. सरनाईक यांनी आयुक्त संजय काटकर यांना दिला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोडpratap sarnaikप्रताप सरनाईक