शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

आर्थिक संकट, १० महिन्यांत ४० टक्केच वसुली

By admin | Updated: February 4, 2016 01:57 IST

पालिकेने २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात नमूद केलेल्या मालमत्ताकर वसुलीच्या उद्दीष्टापैकी गेल्या १० महिन्यांत केवळ ४० टक्केच कर वसुली झाली असून उर्वरीत

भार्इंदर : पालिकेने २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात नमूद केलेल्या मालमत्ताकर वसुलीच्या उद्दीष्टापैकी गेल्या १० महिन्यांत केवळ ४० टक्केच कर वसुली झाली असून उर्वरीत ६० टक्के वसुलीसाठी अवघे दोन महिने शिल्लक असतानाही प्रशासनाने त्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.पालिका हद्दीत एकुण ३ लाख ५० हजार मालमत्ता असून त्यात निवासी २ लाख ९० हजार तर व्यावसायिक ६० हजार मालमत्ताचा समावेश आहे. निवासी मालमत्तांच्या करमुल्य रक्कमेवर सुमारे ४५ ते कमाल ४८ टक्के व व्यावसायिक मालमत्तावर किमान ४८ ते कमाल ५७ टक्के कर सध्या आकारला जात आहे. पालिकेच्या मुख्य उत्पन्न स्त्रोतांपैकी एक असलेला स्थानिक संस्थाकर राज्य शासनाने बंद केल्याने स्थानिक प्रशासनाचा विकास निधी बहुतांशी मालमत्ताकरावर अवलंबून आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरीता प्रशासनाने चालू अंदाजपत्रकात २३० कोटींच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठेवले आहे. या वसुलीवर ठोस कार्यवाही न झाल्याने गेल्या १० महिन्यांत अवघी ९२ कोटी म्हणजेच ४० टक्के एवढीच वसुली झाल्याचे उघडकीस आले आहे. चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सुमारे १ हजार ५०० कोटी इतका असून मूळ उत्पन्न मात्र सुमारे ७०० कोटी इतके दर्शविले आहे. मूळ उत्पन्नाच्या तुलनेत ही वसुली सुमारे १३ टक्के इतकी अल्प असून ती अशीच राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम शहराच्या विकासासह कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे. उर्वरीत ६० टक्के वसुली फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत करायची असली तरी त्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. काही आर्थिक वर्षांतील कर वसुली सुमारे ८० टक्के इतकीच झाल्याचे निदर्शनास आले असून त्याप्रमाणे जरी वसुली गृहित धरल्यास गेल्या १० महिन्यांत झालेली ४० टक्के वसुली अवघ्या दोन महिन्यांतच प्रशासनाला करावी लागणार आहे.