शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अखेर वसई - विरार मनपात वकिलांचे नवीन पॅनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:52 IST

११ वकिलांची तीन वर्षांसाठी नियुक्ती; अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा मार्ग होणार मोकळा

नालासोपारा : दोन वर्षांपेक्षा अधिक काळ रखडलेल्या नवीन वकिलांच्या नियुक्तीला अखेर महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ११ सप्टेंबर रोजीच्या सभेमध्ये याला वित्तीय तसेच प्रशासकीय मान्यता मिळाली असून सर्वोच्च न्यायालयासाठी २, उच्च न्यायालय ४, कामगार /औद्योगिक न्यायालय १ आणि वसई न्यायालय ४ अशा एकूण ११ वकिलांची टीम वसई - विरार महानगरपालिकेने तीन वर्षासाठी नियुक्त केली आहे. तसेच अजून गरज पडल्यास अधिक वकिलांची नियुक्ती अथवा त्यात बदल करण्याचा अधिकार आयुक्तांना देण्यात आला आहे. या नियुक्त केलेल्या टीममध्ये वसई न्यायालयासाठी अ‍ॅड. संतोष खळे, अ‍ॅड. स्वप्नील भदाणे, अ‍ॅड. पुष्पक राऊत, अ‍ॅड. योगेश विरारकर, कामगार न्यायालयासाठी अ‍ॅड. सेल्विया डिसोझा, उच्च न्यायालय अ‍ॅड. अतुल दामले, अ‍ॅड. राजेश दातार, अ‍ॅड. अमोल बावरे, अ‍ॅड. स्वाती सागवेकर तर सर्वोच्च न्यायालय अ‍ॅड. बांसुरी स्वराज, अ‍ॅड. सुहास कदम यांचा समावेश आहे.वसई - विरारमधील अनधिकृत बांधकामे, त्याला मिळणारी न्यायालयीन स्थगिती, त्या स्थगितीआडून बांधकामे पूर्ण होऊन त्यातून सामान्य नागरिकांची फसवणूक होत होती. तसेच शहर नियोजनाचाही बोजवारा उडत होता. यामध्ये महापालिका अधिकारी आणि विधी विभागाचा नाकर्तेपणा तसेच जवळपास साडेचार कोटींहून अधिक फी वकिलांना देऊनही ही स्थगिती उठवण्यास वकिलांना आलेले अपयश असा हा सर्व प्रकार आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीमधून उघड केला होता. प्रसिद्धी माध्यमातून झालेली टीका आणि प्रक्षुब्ध जनमत लक्षात घेऊन तात्कालिक आयुक्तांनी जुने पॅनल बरखास्त करून नवीन वकील पॅनल नेमण्याचा निर्णय घेतला.सततच्या पाठपुराव्यानंतर १३ आॅक्टोबर २०१७ च्या महासभेत नवीन वकील पॅनल नेमण्याचा विषय मंजूर झाला. परंतु त्यासंबंधी जाहिरात निघण्यासाठी जानेवारी २०१८ उजाडावे लागले. त्यानंतरच्या पाठपुराव्यानंतर जून २०१९ म्हणजे तब्बल सव्वा वर्षानंतर इच्छुक वकिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आतापर्यंत त्याला अंतिम मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे दोन वर्षांहून अधिक काळ अनधिकृत बांधकामासंदर्भात जवळपास दोन हजारांहून अधिक दावे न्यायालयामध्ये प्रलंबित होते आणि केवळ एकमेव वकील या सर्व दाव्यांवर न्यायालयात युक्तिवाद करत होते.स्थगितीचा आदेश लवकरात लवकर उठवणे, दावे निकाली काढण्यासाठी कार्यक्षम वकिलांचे पॅनल लवकरात लवकर नियुक्त करणे, महापालिकेने अनिधकृत बांधकामावरील सर्व स्थगिती आदेशाविरोधात एकत्रितरित्या वरच्या न्यायालयात याचिका दाखल कारणे, विधी विभाग सक्षम करून नवीन पॅनल नेमणे तसेच अनधिकृत बांधकामांना न्यायालयीन स्थगिती आदेश न मिळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे तसेच प्रशासन पातळीवर एमआरटीपी अ‍ॅक्टच्या तरतुदींचे पालन होणे यावर महापालिकेने तातडीने निर्णय घेण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून नवीन वकील पॅनल नियुक्तीसोबत अनधिकृत बांधकामासंबंधी खटले वरच्या न्यायालयात एकत्रित याचिका करून निकाली काढण्यासंदर्भात विधी विभागाला निर्देश दिल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले आहे.दोन हजारांहून अधिक दावे प्रलंबितजवळपास ५ वर्षांपेक्षा जास्त काळ होऊनही अनेक दाव्यांमध्ये अनधिकृत बांधकामावरील न्यायालयीन स्थगिती उठवण्यात अपयश येत होते. यामुळे अनधिकृत बांधकामावरील कारवाई देखील थांबलेली होती. या सर्वांचा दुष्परिणाम म्हणून आजही महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती आणि बांधकामे बिनदिक्कतपणे उभी रहात असून न्यायालयीन स्थगितीमुळे सदर बांधकामांवर कारवाई करण्यास विलंब होत आहे. याबाबतचे जवळपास दोन हजारांहून अधिक दावे न्यायालयात प्रलंबित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका