शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

ठेकेदार, शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:22 IST

तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा अंतर्गत समजला जाणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेने आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

वाडा : तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा अंतर्गत समजला जाणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेने आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामुळे बांधकाम प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.कुडूस-चिंचघर-गौरापूर हा १२ किमी अंतराचा रस्ता असून पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी ९ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला असून कुडूस ते चिंचघर हा १३५० किमी पर्यतचा रस्ता क्र ॉकीटीकरण होणार असून चिंचघर ते गौरापूर रस्ता डांबरीकरण होणार आहे. रस्त्याचे काम सांगळे कंट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीने सबठेका ठेकेदार संदीप गणोरे व हर्षद गंधे यांना दिले आहे. रस्त्याचे काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे. दरम्यान, हर्षद गंधे यांना संपर्क साधला असता आम्ही कोणताही अपराध केला नसून गुन्हा कोणत्या आधारे नोंदविणार असा प्रश्न विचारला. शिवाय रस्त्यासाठी जागा उपलब्ध करतांना स्थानिकांनी खूप आडकाठी केली आहे तसेच ती सुरु असल्याने वेळ लागत असल्याचे ते म्हणाले.असे आहेत कुणबी सेनेचे आरोपरस्त्यासाठी वापरले जाणारे साहित्य हे अंदाजपत्रकानुसार वापरले जात नाही. या रस्त्यावर लॅब असणे गरजेचे आहे. मात्र ती कुठेही दिसत नाही. माती मुरूम याच्या चाचण्या घेतल्या जात नाहीत. माºयांसाठी वापरले जाणारे पाईपला दोन्ही बाजूंनी क्र ेसिंग करून पाईप टाकला पाहिजे.परंतु तसे नियमानुसार होत नाही. त्यामुळे रस्त्यावर दाब आल्यास पाईप फुटण्याची शक्यता आहे. विशेषत पाईप टाकण्याआधी त्याखाली काही जाडीचे क्र ॉकीटीकरण करावयास पाहिजे मात्र ते त्या जाडीचे होत नाही.जे खडीकरण केले आहे ते बरोबर दाबले गेले नसल्याने रस्ता उखडला गेला आहे. सिमेंट कामावर पाणीच मारण्यात आले नाही. रेती ऐवजी गिरीट पावडर वापरल्याचा आरोप कुणबी सेनेचे उपतालुकाप्रमुख प्रदीप हरड यांनी केले आहेत.२६ ते ३० मार्च दरम्याना चाचणी : यासंदर्भात पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता रविंद्र दुधे यांच्याशी संपर्क साधला असता कुडूस-चिंचघर-गौरापूर हा १२ किमी अंतराचा या रस्त्याच्या दर्जाबाबत येत्या २६ ते ३० मार्च २०१८ पर्यंत चाचणी करून घेण्यात येईल. त्यानंतर रस्त्याच्या दर्जाबाबत समजू शकेल अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार