शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार, शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:22 IST

तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा अंतर्गत समजला जाणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेने आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

वाडा : तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा अंतर्गत समजला जाणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेने आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामुळे बांधकाम प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.कुडूस-चिंचघर-गौरापूर हा १२ किमी अंतराचा रस्ता असून पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी ९ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला असून कुडूस ते चिंचघर हा १३५० किमी पर्यतचा रस्ता क्र ॉकीटीकरण होणार असून चिंचघर ते गौरापूर रस्ता डांबरीकरण होणार आहे. रस्त्याचे काम सांगळे कंट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीने सबठेका ठेकेदार संदीप गणोरे व हर्षद गंधे यांना दिले आहे. रस्त्याचे काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे. दरम्यान, हर्षद गंधे यांना संपर्क साधला असता आम्ही कोणताही अपराध केला नसून गुन्हा कोणत्या आधारे नोंदविणार असा प्रश्न विचारला. शिवाय रस्त्यासाठी जागा उपलब्ध करतांना स्थानिकांनी खूप आडकाठी केली आहे तसेच ती सुरु असल्याने वेळ लागत असल्याचे ते म्हणाले.असे आहेत कुणबी सेनेचे आरोपरस्त्यासाठी वापरले जाणारे साहित्य हे अंदाजपत्रकानुसार वापरले जात नाही. या रस्त्यावर लॅब असणे गरजेचे आहे. मात्र ती कुठेही दिसत नाही. माती मुरूम याच्या चाचण्या घेतल्या जात नाहीत. माºयांसाठी वापरले जाणारे पाईपला दोन्ही बाजूंनी क्र ेसिंग करून पाईप टाकला पाहिजे.परंतु तसे नियमानुसार होत नाही. त्यामुळे रस्त्यावर दाब आल्यास पाईप फुटण्याची शक्यता आहे. विशेषत पाईप टाकण्याआधी त्याखाली काही जाडीचे क्र ॉकीटीकरण करावयास पाहिजे मात्र ते त्या जाडीचे होत नाही.जे खडीकरण केले आहे ते बरोबर दाबले गेले नसल्याने रस्ता उखडला गेला आहे. सिमेंट कामावर पाणीच मारण्यात आले नाही. रेती ऐवजी गिरीट पावडर वापरल्याचा आरोप कुणबी सेनेचे उपतालुकाप्रमुख प्रदीप हरड यांनी केले आहेत.२६ ते ३० मार्च दरम्याना चाचणी : यासंदर्भात पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता रविंद्र दुधे यांच्याशी संपर्क साधला असता कुडूस-चिंचघर-गौरापूर हा १२ किमी अंतराचा या रस्त्याच्या दर्जाबाबत येत्या २६ ते ३० मार्च २०१८ पर्यंत चाचणी करून घेण्यात येईल. त्यानंतर रस्त्याच्या दर्जाबाबत समजू शकेल अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार