शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर्या’च्या पाण्याचा लढा राज्यपालांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:13 IST

शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी ठेवलेले पाणी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर प्रकल्पक्षेत्रा बाहेर वळविण्यात आल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने राज्यपाल विद्यासागर राव ह्यांनी मंगळवारी राजभवनात झालेल्या बैठकी निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य पाहता त्यांनी या संदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.

- हितेन नाईकपालघर - शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी ठेवलेले पाणी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर प्रकल्पक्षेत्रा बाहेर वळविण्यात आल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने राज्यपाल विद्यासागर राव ह्यांनी मंगळवारी राजभवनात झालेल्या बैठकी निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य पाहता त्यांनी या संदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्र मगड तालुक्यातील शेतकºयांच्या १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ व्हावा यासाठी उभारलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि मुंबई कडे वळविण्यात आल्याने त्यांच्या जमिनी पाण्याविना ओसाड पडत आहेत. यावेळी राजकीय गणिते खेळत आपल्या पक्षांचे निवडून आणलेल्या खासदार, आमदारांचा बिनशर्त पाठिंबा आणि पाणी वाटप धोरणाचा फायदा उचलीत सूर्या प्रकल्पांतील २२६.९३ दलघमी पाण्या पैकी १८२.८३ दलघमी पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर आदी भागात नेण्यात आले होते.इथले सिंचन क्षेत्र घटवुन, प्रकल्पा खाली गेलेल्या शेतकºयांना तहानलेले ठेवून स्थानिकांच्या हक्काचे पाणी राजकीय वजनाच्या जोरावर नेले जात असल्याच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने पालघर मध्ये १९ मार्च पासून चार दिवस बेमुदत उपोषण सुरू ठेवले होते.सतत चार दिवसाच्या उपोषणा नंतर उपोषण कर्त्यांची तब्येत ढासळत असताना शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र त्याची साधी दखल देखिल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या हजारो शेतकरी, नागरिकांनी पोलिसांचे बॅरिकेटर्स ओलांडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सात तास घेराव घातला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आ. अमित घोडा आणि संघर्ष समितीने २४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.मंगळवारी सुर्या पाणी बचाव संघर्ष समितीचे प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, ब्रायन लोबो, जितू राऊळ यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालां समोर सूर्या पाण्याचा प्रश्न व त्या अनुषंगाने स्थानिकांना उध्वस्त करून हे पाणी कशा प्रकारे वळविण्यात आले आहे याची माहिती त्यांना देण्या आली. यावेळी ज्या प्रकारे वसई-विरार, भार्इंदर ला वेळोवेळी पाणी देण्यात आले आहे, त्या भूमिके बद्दल आश्चर्य व्यक्त केले. ज्या राजकीय संबंधांच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने पाणी देण्यात आल्याचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयां सोबत बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश सचिवांना दिले. यावेळी राज्यपाल यांचे सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी व उपसचिव रणजित कुमार हेही बैठकीस उपस्थित होते. राज्यपाल महोदय यांनी भेटीसाठी दिलेल्या वेळेप्रमाणे ही बैठक पार पडली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी