शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

‘सूर्या’च्या पाण्याचा लढा राज्यपालांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:13 IST

शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी ठेवलेले पाणी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर प्रकल्पक्षेत्रा बाहेर वळविण्यात आल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने राज्यपाल विद्यासागर राव ह्यांनी मंगळवारी राजभवनात झालेल्या बैठकी निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य पाहता त्यांनी या संदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.

- हितेन नाईकपालघर - शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी ठेवलेले पाणी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर प्रकल्पक्षेत्रा बाहेर वळविण्यात आल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने राज्यपाल विद्यासागर राव ह्यांनी मंगळवारी राजभवनात झालेल्या बैठकी निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य पाहता त्यांनी या संदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्र मगड तालुक्यातील शेतकºयांच्या १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ व्हावा यासाठी उभारलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि मुंबई कडे वळविण्यात आल्याने त्यांच्या जमिनी पाण्याविना ओसाड पडत आहेत. यावेळी राजकीय गणिते खेळत आपल्या पक्षांचे निवडून आणलेल्या खासदार, आमदारांचा बिनशर्त पाठिंबा आणि पाणी वाटप धोरणाचा फायदा उचलीत सूर्या प्रकल्पांतील २२६.९३ दलघमी पाण्या पैकी १८२.८३ दलघमी पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर आदी भागात नेण्यात आले होते.इथले सिंचन क्षेत्र घटवुन, प्रकल्पा खाली गेलेल्या शेतकºयांना तहानलेले ठेवून स्थानिकांच्या हक्काचे पाणी राजकीय वजनाच्या जोरावर नेले जात असल्याच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने पालघर मध्ये १९ मार्च पासून चार दिवस बेमुदत उपोषण सुरू ठेवले होते.सतत चार दिवसाच्या उपोषणा नंतर उपोषण कर्त्यांची तब्येत ढासळत असताना शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र त्याची साधी दखल देखिल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या हजारो शेतकरी, नागरिकांनी पोलिसांचे बॅरिकेटर्स ओलांडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सात तास घेराव घातला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आ. अमित घोडा आणि संघर्ष समितीने २४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.मंगळवारी सुर्या पाणी बचाव संघर्ष समितीचे प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, ब्रायन लोबो, जितू राऊळ यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालां समोर सूर्या पाण्याचा प्रश्न व त्या अनुषंगाने स्थानिकांना उध्वस्त करून हे पाणी कशा प्रकारे वळविण्यात आले आहे याची माहिती त्यांना देण्या आली. यावेळी ज्या प्रकारे वसई-विरार, भार्इंदर ला वेळोवेळी पाणी देण्यात आले आहे, त्या भूमिके बद्दल आश्चर्य व्यक्त केले. ज्या राजकीय संबंधांच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने पाणी देण्यात आल्याचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयां सोबत बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश सचिवांना दिले. यावेळी राज्यपाल यांचे सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी व उपसचिव रणजित कुमार हेही बैठकीस उपस्थित होते. राज्यपाल महोदय यांनी भेटीसाठी दिलेल्या वेळेप्रमाणे ही बैठक पार पडली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी