शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘सूर्या’च्या पाण्याचा लढा राज्यपालांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:13 IST

शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी ठेवलेले पाणी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर प्रकल्पक्षेत्रा बाहेर वळविण्यात आल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने राज्यपाल विद्यासागर राव ह्यांनी मंगळवारी राजभवनात झालेल्या बैठकी निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य पाहता त्यांनी या संदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.

- हितेन नाईकपालघर - शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी ठेवलेले पाणी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर प्रकल्पक्षेत्रा बाहेर वळविण्यात आल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने राज्यपाल विद्यासागर राव ह्यांनी मंगळवारी राजभवनात झालेल्या बैठकी निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य पाहता त्यांनी या संदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्र मगड तालुक्यातील शेतकºयांच्या १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ व्हावा यासाठी उभारलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि मुंबई कडे वळविण्यात आल्याने त्यांच्या जमिनी पाण्याविना ओसाड पडत आहेत. यावेळी राजकीय गणिते खेळत आपल्या पक्षांचे निवडून आणलेल्या खासदार, आमदारांचा बिनशर्त पाठिंबा आणि पाणी वाटप धोरणाचा फायदा उचलीत सूर्या प्रकल्पांतील २२६.९३ दलघमी पाण्या पैकी १८२.८३ दलघमी पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर आदी भागात नेण्यात आले होते.इथले सिंचन क्षेत्र घटवुन, प्रकल्पा खाली गेलेल्या शेतकºयांना तहानलेले ठेवून स्थानिकांच्या हक्काचे पाणी राजकीय वजनाच्या जोरावर नेले जात असल्याच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने पालघर मध्ये १९ मार्च पासून चार दिवस बेमुदत उपोषण सुरू ठेवले होते.सतत चार दिवसाच्या उपोषणा नंतर उपोषण कर्त्यांची तब्येत ढासळत असताना शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र त्याची साधी दखल देखिल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या हजारो शेतकरी, नागरिकांनी पोलिसांचे बॅरिकेटर्स ओलांडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सात तास घेराव घातला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आ. अमित घोडा आणि संघर्ष समितीने २४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.मंगळवारी सुर्या पाणी बचाव संघर्ष समितीचे प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, ब्रायन लोबो, जितू राऊळ यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालां समोर सूर्या पाण्याचा प्रश्न व त्या अनुषंगाने स्थानिकांना उध्वस्त करून हे पाणी कशा प्रकारे वळविण्यात आले आहे याची माहिती त्यांना देण्या आली. यावेळी ज्या प्रकारे वसई-विरार, भार्इंदर ला वेळोवेळी पाणी देण्यात आले आहे, त्या भूमिके बद्दल आश्चर्य व्यक्त केले. ज्या राजकीय संबंधांच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने पाणी देण्यात आल्याचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयां सोबत बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश सचिवांना दिले. यावेळी राज्यपाल यांचे सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी व उपसचिव रणजित कुमार हेही बैठकीस उपस्थित होते. राज्यपाल महोदय यांनी भेटीसाठी दिलेल्या वेळेप्रमाणे ही बैठक पार पडली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी