शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

पालघर जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करा! - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:32 IST

पालघर जिल्हातील अनेक समस्या सोडविण्यासाठी, जिल्हयाच्या विकासासाठी संघर्ष करा, आपआपसातले वाद बाजूला ठेवून शिवसेनेला मजबूत करा कारण शिवसेना

विक्रमगड : पालघर जिल्हातील अनेक समस्या सोडविण्यासाठी, जिल्हयाच्या विकासासाठी संघर्ष करा, आपआपसातले वाद बाजूला ठेवून शिवसेनेला मजबूत करा कारण शिवसेना ही ८० टक्के समाजसेवा व २० टक्के राजकारण करणारी संघटना असल्याचे मार्गदर्शन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विक्र मगड येथे आयोजित केलेल्या शिवसेना पालघर जिल्हा मेळाव्यात केले.ते पुढे म्हणाले की शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षांनी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला समाजात नाव व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले आहे तसेच जे शिवसेनेतून निघाले त्याची अवस्था आज काय आहे ती आपण पाहिलीच असेल.सेनेची बांधिलकी ही जनतेशी असून यामुळेच आणि केवळ शिवसेनेमुळेच शेतकºयांची कर्जमाफी होऊ शकली आणि शिवसेनेवर जनतेचा विश्वास असल्यामुळे शिवसेनेत कार्यकर्त्यांचे इनकमिंग आहे आउटगोइंग नाही. पालघर जिल्हाचे पालकमंत्री हे आदिवासी विकास मंत्री असून सुद्धा येथील विकास अजूनही खुंटला आहे. रस्ते, पाणी, रोजगार, कुपोषण यांसारखे विषय अजूनही जैसे थे स्वरूपाचे असून या समस्या सोडवून विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र राहून आगामी होणाºया नगरपालिका, ग्रामपंचायत व इतर निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याचा विचार करा, शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याबाबत ती कधीही मागे हटत नाही, असे मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांच्या सह पालघर जिल्हा सह संपर्कप्रमुख केतन काका पाटील, पालघर जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख. प्रकाश पाटील, पालघर जिल्हा महिला संघटक. ज्योती ठाकरे, आमदार. रुपेश म्हात्रे, आमदार अमित घोडा, आमदार शांताराम मोरे, पालघर जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष . निलेश गंधे, पालघर जिल्हा परीषदेचे शिवसेना गटनेते. प्रकाश निकम, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या मेळाव्यास शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी जिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख आणि लोकप्रतिनिधी आदी मान्यवर यांच्यासह जिल्हातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.हा जिल्हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पालघर जिल्हा परीषदेचे शिवसेना गटनेते. प्रकाश निकम, विक्रमगडचे तालुका प्रमुख राजा जाधव, शहर प्रमुख सागर आळशी, यांनी मोलाची कामगिरी बजावली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना