शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

पालघर जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करा! - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:32 IST

पालघर जिल्हातील अनेक समस्या सोडविण्यासाठी, जिल्हयाच्या विकासासाठी संघर्ष करा, आपआपसातले वाद बाजूला ठेवून शिवसेनेला मजबूत करा कारण शिवसेना

विक्रमगड : पालघर जिल्हातील अनेक समस्या सोडविण्यासाठी, जिल्हयाच्या विकासासाठी संघर्ष करा, आपआपसातले वाद बाजूला ठेवून शिवसेनेला मजबूत करा कारण शिवसेना ही ८० टक्के समाजसेवा व २० टक्के राजकारण करणारी संघटना असल्याचे मार्गदर्शन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विक्र मगड येथे आयोजित केलेल्या शिवसेना पालघर जिल्हा मेळाव्यात केले.ते पुढे म्हणाले की शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षांनी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला समाजात नाव व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले आहे तसेच जे शिवसेनेतून निघाले त्याची अवस्था आज काय आहे ती आपण पाहिलीच असेल.सेनेची बांधिलकी ही जनतेशी असून यामुळेच आणि केवळ शिवसेनेमुळेच शेतकºयांची कर्जमाफी होऊ शकली आणि शिवसेनेवर जनतेचा विश्वास असल्यामुळे शिवसेनेत कार्यकर्त्यांचे इनकमिंग आहे आउटगोइंग नाही. पालघर जिल्हाचे पालकमंत्री हे आदिवासी विकास मंत्री असून सुद्धा येथील विकास अजूनही खुंटला आहे. रस्ते, पाणी, रोजगार, कुपोषण यांसारखे विषय अजूनही जैसे थे स्वरूपाचे असून या समस्या सोडवून विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र राहून आगामी होणाºया नगरपालिका, ग्रामपंचायत व इतर निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याचा विचार करा, शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याबाबत ती कधीही मागे हटत नाही, असे मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांच्या सह पालघर जिल्हा सह संपर्कप्रमुख केतन काका पाटील, पालघर जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख. प्रकाश पाटील, पालघर जिल्हा महिला संघटक. ज्योती ठाकरे, आमदार. रुपेश म्हात्रे, आमदार अमित घोडा, आमदार शांताराम मोरे, पालघर जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष . निलेश गंधे, पालघर जिल्हा परीषदेचे शिवसेना गटनेते. प्रकाश निकम, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या मेळाव्यास शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी जिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख आणि लोकप्रतिनिधी आदी मान्यवर यांच्यासह जिल्हातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.हा जिल्हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पालघर जिल्हा परीषदेचे शिवसेना गटनेते. प्रकाश निकम, विक्रमगडचे तालुका प्रमुख राजा जाधव, शहर प्रमुख सागर आळशी, यांनी मोलाची कामगिरी बजावली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना