शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करा! - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:32 IST

पालघर जिल्हातील अनेक समस्या सोडविण्यासाठी, जिल्हयाच्या विकासासाठी संघर्ष करा, आपआपसातले वाद बाजूला ठेवून शिवसेनेला मजबूत करा कारण शिवसेना

विक्रमगड : पालघर जिल्हातील अनेक समस्या सोडविण्यासाठी, जिल्हयाच्या विकासासाठी संघर्ष करा, आपआपसातले वाद बाजूला ठेवून शिवसेनेला मजबूत करा कारण शिवसेना ही ८० टक्के समाजसेवा व २० टक्के राजकारण करणारी संघटना असल्याचे मार्गदर्शन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विक्र मगड येथे आयोजित केलेल्या शिवसेना पालघर जिल्हा मेळाव्यात केले.ते पुढे म्हणाले की शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षांनी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला समाजात नाव व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले आहे तसेच जे शिवसेनेतून निघाले त्याची अवस्था आज काय आहे ती आपण पाहिलीच असेल.सेनेची बांधिलकी ही जनतेशी असून यामुळेच आणि केवळ शिवसेनेमुळेच शेतकºयांची कर्जमाफी होऊ शकली आणि शिवसेनेवर जनतेचा विश्वास असल्यामुळे शिवसेनेत कार्यकर्त्यांचे इनकमिंग आहे आउटगोइंग नाही. पालघर जिल्हाचे पालकमंत्री हे आदिवासी विकास मंत्री असून सुद्धा येथील विकास अजूनही खुंटला आहे. रस्ते, पाणी, रोजगार, कुपोषण यांसारखे विषय अजूनही जैसे थे स्वरूपाचे असून या समस्या सोडवून विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र राहून आगामी होणाºया नगरपालिका, ग्रामपंचायत व इतर निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याचा विचार करा, शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याबाबत ती कधीही मागे हटत नाही, असे मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांच्या सह पालघर जिल्हा सह संपर्कप्रमुख केतन काका पाटील, पालघर जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख. प्रकाश पाटील, पालघर जिल्हा महिला संघटक. ज्योती ठाकरे, आमदार. रुपेश म्हात्रे, आमदार अमित घोडा, आमदार शांताराम मोरे, पालघर जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष . निलेश गंधे, पालघर जिल्हा परीषदेचे शिवसेना गटनेते. प्रकाश निकम, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या मेळाव्यास शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी जिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख आणि लोकप्रतिनिधी आदी मान्यवर यांच्यासह जिल्हातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.हा जिल्हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पालघर जिल्हा परीषदेचे शिवसेना गटनेते. प्रकाश निकम, विक्रमगडचे तालुका प्रमुख राजा जाधव, शहर प्रमुख सागर आळशी, यांनी मोलाची कामगिरी बजावली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना