शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीबंदीच्या फतव्याने तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:51 IST

६१ दिवसांच्या कालावधीचे परिपत्रक : यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी, मत्स्यदुष्काळाला जणू आमंत्रणच

- हितेन नाईक

पालघर : १५ मे ते १५ आॅगस्ट अशी ९१ दिवसांची मासेमारी बंदी कालावधीची मच्छिमारांची मागणी धुडकावून लावीत मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा १ जून ते ३१ जुलै अशी केवळ ६१ दिवसाच्या मासेमारी बंदी कालावधीचे परिपत्रक काढल्याने मच्छिमारामधून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील वसई तालुक्यातील वसई, अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव तर पालघर तालुक्यातील सातपाटी, मुरबे, डहाणू तालुक्यातील डहाणू, धाकटी डहाणू, झाई-बोर्डी या भागातील बाराशे ते पंधराशे मच्छिमार बोटीद्वारे पापलेट, दाढा, घोळ, शेवंड, बोंबील आदी माश्यांची मासेमारी केली जात असून दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घट होत आहे. पापलेट, दाढा, घोळ, बोंबील, शेवंड आदी मच्छिमाराना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या मत्स्यसंपदा नामशेष होतात की काय अशी अवस्था निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सहकारी संस्था आणि त्यांच्या संघटनांनी १५ मे ते १५ आॅगस्ट अशी ९१ दिवसाची मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर करण्याची मागणी शासन दरबारी अनेक वर्षापासून केली आहे. समुद्रात माश्यांनी टाकलेल्या अंड्यातून निघालेल्या लहान पिल्लाची होणारी मासेमारी (कत्तल) थांबून मत्स्य उत्पादनात वाढ व्हावी हा त्या मागचा उद्देश होता. मात्र या मागणीचा कुठलाही सकारात्मक विचार न करता शासनाने पुन्हा १ जून ते ३१ जुलै असा अवघ्या ६१ दिवसाची बंदी घोषित करून मत्स्यदुष्काळाला जणू आमंत्रणच दिल्याची भावना मच्छिमारामधून व्यक्त केली जात आहे.

पालघर जिल्ह्यातील हजारो बोटधारक खरेतर १ मेपासूनच मासेमारी बंदी कालावधीची अंमलबजावणी करण्याची तयारी करीत आपल्या बोटी स्वत:हून किनाºयावर नांगरून ठेवण्याचे काम हाती घेतात. सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थानी मागील १२-१५ वर्षापूर्वी १५ मेपासूनच आपल्या सुमारे ४५० बोटींची मासेमारी उत्स्फूर्तपणे बंद करून रत्नागिरी ते गुजरात दरम्यानच्या सहकारी संस्थांना भेट देत मे महिन्यापासून मासेमारी बंदीबाबत जनजागृती सुरू केली होती. त्याची अंमलबजावणी आताही सुरूच असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. मच्छिमाराकडून मत्स्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात असताना काही मत्स्यव्यवसाय अधिकारी शासनाची दिशाभूल करून १ जून ते ३१ जुलै अशी मर्यादित मासेमारी बंदी घोषित करीत असल्याचे काही मच्छिमारांनी सांगितले.१ जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी, डोलारा कोसळतोयमासळीच्या साठ्यांचे जतन तसेच मच्छिमारांच्या जीवित वा वित्त यांचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ च्या अधिकारान्वये १ जून ते ३१ जुलै या कालावधीसाठी समुद्रात यांत्रिक बोटींना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे.जून आणि जुलै महिन्यात सागरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रि येला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. तसेच खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जीवित व वित्त हानी टाळणे शक्य होते. त्यामुळे सागर किनाºयापासून १२ सागरी मैलापर्यंत या राज्याच्या जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.बंदी कालावधीमध्ये मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार गलबत आणि त्यात पकडण्यात आलेली मासळी जप्त करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल. मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून देण्यात येणारी नुकसानभरपाई मिळणार नाही. ज्या मच्छिमार सहकारी संस्थांच्या मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील, अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेच्या लाभासाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.