शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा तरफ्यावरून जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 01:04 IST

जीवघेणा प्रवास करून शाळा गाठण्याची कसरत या तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजूबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थ्यांना गेली अनेक वर्षे करावी लागत आहे.

- वसंत भोईर वाडा : शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने जीवघेणा प्रवास करून शाळा गाठण्याची कसरत या तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजूबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थ्यांना गेली अनेक वर्षे करावी लागत आहे. विद्यार्थांना पहिलीपासूनच हा जीवघेणा व धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.तालुक्यांचे ठिकाण असलेल्या वाडा शहराजवळील ऐनशेत गावाजवळून वाहणाऱ्या वैतरणा नदीच्या पलीकडे असलेल्या विलकोस या गावातील ग्रामस्थ या नदीवर पूल व्हावा यासाठी गेली २५ वर्षे संघर्ष करत आहेत. वैतरणा नदीच्या पलिकडे असलेल्या अनेक गावांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी हा एकदम जवळचा मार्ग आहे. उन्हाळयÞात ग्रामस्थ व विद्यार्थी नदीला पाणी कमी असल्याने नदीपलीकडे जाऊ शकतात. या ग्रामस्थांना वाडा शहराची बाजारपेठ जवळ पडत असल्याने दैनंदिन कामकाज, व्यवहार व रोजगारासाठी जाणे-येणे नियमितपणे या नदीपात्रातून सुरु असते. पावसाळ्यÞात मात्र या नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याने नदीपलीकडे जाणे शक्य होत नाही. त्यांना १५ ते २० किलोमीटर अंतर वळसा घालून वाडा येथे जावे लागते.या नदीवर पूल नसल्याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विलकोस गावातील आणि आजूबाजूच्या पाड्यांमधील सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी दररोज वाडा शहरातील शाळा, महाविद्यालयांत शिक्षणासाठी येतात. नदी पार करण्यासाठी पूल नसल्याने बांबू अथवा प्लास्टिक पाईप एकत्रित बांधून तयार केलेल्या ताप्यावरु न जीवघेणा प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर दरवर्षी येते. मात्र नदीची पातळी खोल असल्याने हा प्रवास कधीही जीवावर बेतणारा ठरू शकतो, याची कल्पना असतांना शिक्षणाच्या ओढीने हे विद्यार्थी हा संघर्ष अविरत करत असल्याचे १३ वीत शिकणाऱ्या अक्षय याने सांगितले.विलकोस आणि ऐनशेत गावादरम्यान वैतरणा नादीवरील हा पूल झाला तर तालुक्याच्या पूर्वेकडील अनेक गावे तालुक्याचे ठिकाण असलेल्या वाडा शहराला जोडले जाऊन तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी या गावांतील नागरिक व विद्यार्थ्यांचे १५ ते २० किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. त्याचबरोबर परिसरातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनाही हा पूल फायदेशीर ठरणार आहे. मात्र सध्यातरी शिक्षणासाठी करावा लागणारा रोजचा हा जीवघेणा प्रवास केव्हा थांबणार असा सवाल विद्यार्थी करीत असून वैतरणा नदीवर ऐनशेत येथे पूल बांधा ही मागणी वर्षानुवर्षाची आहे. परंतु अद्याप पुलाला चालना मिळाली नाही.या पूलाच्या बांधकामासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय कामांमध्ये मंजूर झाला आहे. परंतु प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी त्यानंतर निविदा प्रक्रि या यासाठी आणखी किती कालावधी जाईल हे निश्चित नसल्याने व प्रशासकीय कामकाजात होणारी दिरंगाई आणखी किती वर्ष हा जीवधेणा संघर्ष या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतोय हे सांगता येणे कठीण आहे.>आम्ही पहिलीपासून आता दहावीपर्यंत या तरफ्यावर प्रवास करतो आहोत. नदीला पूर आला तर त्या दिवशी आम्ही शाळेत जात नाही. अशा वेळेस आमचे शैक्षणिक नुकसान होते. तरफ्यावरचा हा प्रवास आमच्या पाचवीलाच पुजला आहे.- निर्जला मोरे, विद्यार्थिनी>ऐनशेत-पिंपरोळी या १२० मीटर लांबीच्या पुलाला मंजुरी मिळाली असून प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ते होऊनपावसाळ्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.- प्रकाश पातकर, कनिष्ठ अभियंता,सार्वजनिकबांधकाम विभाग, वाडा