शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 23:58 IST

मजूर मिळत नसल्याने वाढली चिंता

ठळक मुद्देसूर्या कालव्याच्या पाण्यामुळे तालुक्यातील कासा, वाणगाव आदी भागातील गावात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते.

शशिकांत ठाकूर

कासा : डहाणू तालुक्यात विविध भागात उन्हाळ्यात भातशेती व भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत आणि बाजारपेठा बंद असल्याने माल विकायचा कुठे? विकलाच तर त्याला चांगला भावही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

सूर्या कालव्याच्या पाण्यामुळे तालुक्यातील कासा, वाणगाव आदी भागातील गावात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. भातशेतीबरोबर शेतकरी भाजीपाला लागवडही करतात, मात्र १६ एप्रिलपासून कडक निर्बंध लावले आहेत. बाजारपेठा बंद असून संचारबंदी आहे. ग्रामीण भागातही रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. येत्या आठवड्याभरात भात कापणीच्या कामाला सुरुवात होणार आहे, मात्र मजूरच नाही. वाणगाव भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड तेथील शेतकरी करतात. तसेच बऱ्याच गावांमध्ये मिरचीसारख्या पिकांची लागवडही केली जाते, मात्र सध्या बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व पिकाची विक्री करायची कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

भाजीपाला खरेदी करणारे दलाल येत नाहीत तसेच काही ठिकाणी सकाळी भाजीपाल्याची दुकाने उघडतात, मात्र भीतीमुळे खरेदीसाठी ग्राहक बाहेर जास्त पडत नाहीत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी भाजीपाला, मिरची यासारखी पिके शेतातच पडून आहेत. या भाजीपाल्यासाठी महागडी बियाणे, खते यांचा वापर करावा लागतो. मात्र, आता हा खर्च कसा काढायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नफा तर नाही, पण केलेला खर्चही निघणार नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे, कासा भागात कालव्याच्या पाण्यावर तर सायवन भागात कालव्याचे पाणी नसल्याने नदी, विहिरी व बोअरच्या पाण्यावर आदिवासी उन्हाळ्यात वांगी, मिरची, टोमॅटो, भोपळा, दुधी, भेंडी, गवार, काकडी यासारख्या भाजीपालाची लागवड करतात व परिसरातील आठवडा बाजारात त्याची विक्री करतात, मात्र कोरोनामुळे आठवडा बाजार बंद आहेत. 

लॉकडाऊनमुळे बाजारपेठा व आठवडा बाजार बंद असल्याने भाजीपाला विकायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला असून केलेला खर्च वाया जाणार आहे. - सुनील मेरे, शेतकरी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार