शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकऱ्यांनी भूमातेची विक्री करू नये’

By admin | Updated: February 2, 2016 01:45 IST

भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे़ शेती हेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे साधन आहे़ भविष्यात शेतीला चांगले दिवस येतीलच, त्यामुळे परवडत नाही

तलवाडा : भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे़ शेती हेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे साधन आहे़ भविष्यात शेतीला चांगले दिवस येतीलच, त्यामुळे परवडत नाही, या नावाखाली सुरू असलेली शेतीची विक्री शेतकऱ्यांनी थांबवावी, असे आवाहन कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांशी हितगुज साधताना विक्रमगड येथे केले़ गेल्या दोनचार वर्षांपासून वारंवार भातशेतीत शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हताश झाला आहे़ पण, याचा सामना करावयास हवा़ शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक पद्धतीत बदल करून नवनवीन शेती उत्पादनाचे प्रयोग शेतीतून शेतकऱ्यांनी करावेत, असे नमूद करत वडिलोपार्जित शेती म्हणजे कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आहे़ क्षणिक पैशांच्या मोहाला बळी पडून आपल्या हक्काच्या शेतीचा सातबारा दुसऱ्यांच्या नावावर करणे, हे चुकीचे आहे़ शेतकऱ्यांनी फलोद्यान तसेच फुलशेतीच्या पिकांचे उत्पन्न काढून नगदी पिके, बागायती उत्पन्न घेऊन आपल्या कृषी व्यवसायाला नवी संजीवनी देण्याची गरज आहे़ शेतीची विक्री म्हणजे शेती व्यवसायाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे़ शासनाच्या नवनवीन योजनांचा फायदा घेऊन हंगामी पीक वारंवार घेणे व उत्पन्न वाढविणे, ही काळाची गरज असल्याचे विश्वनाथ पाटील यांनी या वेळी सांगितले़