शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी नवे प्रयोग करावेत - सवरा

By admin | Updated: April 24, 2016 02:04 IST

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्यामुळे त्यांनी चांगल्या उत्पादनासाठी व आपला आर्थिकस्तर उंचावण्यासाठी शेतीमध्ये वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग

वाडा : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्यामुळे त्यांनी चांगल्या उत्पादनासाठी व आपला आर्थिकस्तर उंचावण्यासाठी शेतीमध्ये वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करावेत. असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले. दि. १४ ते २४ एप्रिल २०१६ या कालावधीत ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान जिल्हयामध्ये राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत वाडा तालुक्यातील सांगे या गावात गुरुवारी ग्राम किसान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता बहुपीक घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे तसेच नवे तंत्र आणि मंत्र याचा वापर केला पाहिजे. असे सांगून पालघर जिल्हयाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्ह्यातील रस्ते, पूल,बंधारे, शेततळे यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. वसई - झाई समुद्र किनारा विकसीत करण्याचे नियोजन असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. या कार्यक्रमात कृषीभूषण अनिल पाटील, आशाबाई पाटील, नारायण ठाकरे, प्रीती ठाकर,अजय भदाणे यांना उत्कृष्ट आंबा निर्यातीबद्दल प्रमाणपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच या कार्यक्रमात विष्णू पष्टे, रोहिदास गायकर, कान्हा हरड, अरूण पष्टे, लडकू गायकर, गुलाब भादे, अश्विनी पाटील, बबन शेलार दया कुवरा यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पॉवर टिलर वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किसान ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या सभांमधून गावकऱ्यांना ग्राम आणि कृषी विकासाच्या योजनांची माहिती तर देण्यात येणार आहे. (वार्ताहर) प्रभातफेरी, स्वच्छता मोहिम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी गावांमध्ये वातावरण निर्मिती केली जाईल. ग्रामसभेत राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने उपस्थितांकडून शपथ घेण्यात येईल. २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता पंतप्रधानांचे भाषण दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी वरून प्रसारित केले जाणार आहे. ते ही सर्वांनी ऐकावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी केले आहे. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी वारे, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.