शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वसई श्वान निर्बीजीकरण केंद्राची अत्यंत दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 05:27 IST

श्वानांचे मृतदेह कचऱ्यात फेकले : केंद्रचालकाची अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्यासदस्यांना दमदाटी

वसई : वसई महानगरपालिकेचे श्वानांचे ए.बी.सी.नसबंदी सेंटर हे मुलुंड येथील उत्कर्ष स्टार मित्र मंडळाकडून चालविले जाते. त्याचे सेक्रेटरी अ‍ॅड. दगडू लोंढे हे आहेत. ते वसई पूर्वमधील स्मशानभूमीजवळील एका शेडमध्ये असलेल्या या केंद्राची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

तेथे १२१ पिंजरे आहेत. दररोज या ठिकाणी साधारण १५ श्वानांची नसबंदी करण्यात येते. मात्र दिवाळीच्या कालावधीत या श्वानांची देखभाल करणारे कर्मचारी केंद्राला लॉक लावून रजेवर गेले होते. त्यामुळे गेल्या पाच दिवसात या श्वानांना अन्न पाणी न मिळाल्यामुळे त्यातील दोघांचा मृत्यू शनिवारी झाला होता. तर ३ श्वानांचा मृत्यू तत्पूर्वी झाला होता. यावेळी या केंद्रात ५० पेक्षा जास्त श्वान भुकेमूळे कासाविस झालेले होते. याबाबत अ‍ॅनीमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाचे सदस्य मितेश जैन यांना माहिती मिळताच त्यांनी सहका-यांमार्फत या केंद्रात धाव घेऊन वस्तुस्थिती पाहिली. यावेळी श्वानांची दयनीय अवस्था पाहून अंगावर अक्षरश: शहारे आल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या वाईट परिस्थीतीत या श्वानांना ठेवण्यात आले होते.नसबंदी केल्यानंतर त्यांची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती. तसेच त्यांना धड अन्न व पाणी ही दिले े नव्हते. अनेकांच्या अंगावर जखमा होत्या. त्यांना मलमपट्टीही केली नव्हती. अधिक चौकशी केली असता चार दिवसाच्या दिवाळी सुटीनंतर रविवारी कर्मचारी कामावर होते.

मितेश जैन यांनी आपले सहकारी बिमलेश नवानी, आरती खुराना, हर्षदा लाड, अमनप्रित वालीया, नंदा महाडीक,बीना सुरज,रवी यांच्यासोबत मृत दोन श्वानांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी परेल येथे पाठविण्याची मागणी केली. मात्र केंद्रचालक अ‍ॅड. दगडू लोंढे याने या कार्यर्क्त्यांना दमदाटी करत मृतदेह घोडबंदर येथील कोरा केंद्रात नेऊन फेकून दिले.याबाबत या कार्यकर्त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवून कोरा केंद्रात जाऊन श्वानांचे मृतदेह ताब्यात घेतले व ते विरारच्या करूणा ट्रस्टच्या रूग्णवाहिकेतून पुन्हा परेल येथे शवविच्छेदनासाठी पाठविले. याबाबत उत्कर्ष ए.बी.सी. केंद्रचालकावर पोलीसांनी व महापालिकेने काय कारवाई करण्यात केली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.‘‘त्या दोन मृत श्वानांवर नसबंदी शस्त्र क्रि या करण्यात आली होती.त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यावर माहिती मिळेल. डॉग स्टीरिलायझेशन व मॉनीटरींग कंपनीमार्फत चौकशी केल्यावर कारवाई करू.- सुखदेव दरवेशी, सहा. आयुक्तमी कोणालाही दमदाटी केलेली नाही.श्वानांचा मृत्यू भुकेमूळे झाला हे खोटे आहे.आंम्ही श्वानांना दररोज चिकन व पेडीग्रीन देत असतो. काही वेळा शस्त्रक्रि येनंतर श्वान मृत होतात.- दगडू लोंढे, केंद्रचालक६ नोव्हेंबर रोजी ३ श्वान व १० नोव्हेंबर रोजी २ श्वानांचा मृत्यू झाला होता.हे प्रकरण दाबण्यासाठी अड. लोंढे यांनी आंम्हाला दमदाटी केली.श्वानांना अन्न पाणी दिले जात नाही हे प्रत्यक्ष आंम्ही पाहिले आहे.-मितेश जैन, अ‍ॅनिमल वे. बोर्ड 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdogकुत्रा