शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

वसई श्वान निर्बीजीकरण केंद्राची अत्यंत दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 05:27 IST

श्वानांचे मृतदेह कचऱ्यात फेकले : केंद्रचालकाची अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्यासदस्यांना दमदाटी

वसई : वसई महानगरपालिकेचे श्वानांचे ए.बी.सी.नसबंदी सेंटर हे मुलुंड येथील उत्कर्ष स्टार मित्र मंडळाकडून चालविले जाते. त्याचे सेक्रेटरी अ‍ॅड. दगडू लोंढे हे आहेत. ते वसई पूर्वमधील स्मशानभूमीजवळील एका शेडमध्ये असलेल्या या केंद्राची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

तेथे १२१ पिंजरे आहेत. दररोज या ठिकाणी साधारण १५ श्वानांची नसबंदी करण्यात येते. मात्र दिवाळीच्या कालावधीत या श्वानांची देखभाल करणारे कर्मचारी केंद्राला लॉक लावून रजेवर गेले होते. त्यामुळे गेल्या पाच दिवसात या श्वानांना अन्न पाणी न मिळाल्यामुळे त्यातील दोघांचा मृत्यू शनिवारी झाला होता. तर ३ श्वानांचा मृत्यू तत्पूर्वी झाला होता. यावेळी या केंद्रात ५० पेक्षा जास्त श्वान भुकेमूळे कासाविस झालेले होते. याबाबत अ‍ॅनीमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाचे सदस्य मितेश जैन यांना माहिती मिळताच त्यांनी सहका-यांमार्फत या केंद्रात धाव घेऊन वस्तुस्थिती पाहिली. यावेळी श्वानांची दयनीय अवस्था पाहून अंगावर अक्षरश: शहारे आल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या वाईट परिस्थीतीत या श्वानांना ठेवण्यात आले होते.नसबंदी केल्यानंतर त्यांची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती. तसेच त्यांना धड अन्न व पाणी ही दिले े नव्हते. अनेकांच्या अंगावर जखमा होत्या. त्यांना मलमपट्टीही केली नव्हती. अधिक चौकशी केली असता चार दिवसाच्या दिवाळी सुटीनंतर रविवारी कर्मचारी कामावर होते.

मितेश जैन यांनी आपले सहकारी बिमलेश नवानी, आरती खुराना, हर्षदा लाड, अमनप्रित वालीया, नंदा महाडीक,बीना सुरज,रवी यांच्यासोबत मृत दोन श्वानांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी परेल येथे पाठविण्याची मागणी केली. मात्र केंद्रचालक अ‍ॅड. दगडू लोंढे याने या कार्यर्क्त्यांना दमदाटी करत मृतदेह घोडबंदर येथील कोरा केंद्रात नेऊन फेकून दिले.याबाबत या कार्यकर्त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवून कोरा केंद्रात जाऊन श्वानांचे मृतदेह ताब्यात घेतले व ते विरारच्या करूणा ट्रस्टच्या रूग्णवाहिकेतून पुन्हा परेल येथे शवविच्छेदनासाठी पाठविले. याबाबत उत्कर्ष ए.बी.सी. केंद्रचालकावर पोलीसांनी व महापालिकेने काय कारवाई करण्यात केली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.‘‘त्या दोन मृत श्वानांवर नसबंदी शस्त्र क्रि या करण्यात आली होती.त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यावर माहिती मिळेल. डॉग स्टीरिलायझेशन व मॉनीटरींग कंपनीमार्फत चौकशी केल्यावर कारवाई करू.- सुखदेव दरवेशी, सहा. आयुक्तमी कोणालाही दमदाटी केलेली नाही.श्वानांचा मृत्यू भुकेमूळे झाला हे खोटे आहे.आंम्ही श्वानांना दररोज चिकन व पेडीग्रीन देत असतो. काही वेळा शस्त्रक्रि येनंतर श्वान मृत होतात.- दगडू लोंढे, केंद्रचालक६ नोव्हेंबर रोजी ३ श्वान व १० नोव्हेंबर रोजी २ श्वानांचा मृत्यू झाला होता.हे प्रकरण दाबण्यासाठी अड. लोंढे यांनी आंम्हाला दमदाटी केली.श्वानांना अन्न पाणी दिले जात नाही हे प्रत्यक्ष आंम्ही पाहिले आहे.-मितेश जैन, अ‍ॅनिमल वे. बोर्ड 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdogकुत्रा