शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या अटीवर कोलाला अतिरिक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:13 IST

वाड्यात भीषण पाणीटंचाई असतांना शासनाने वैतरणा धरणातून १.३० दशलक्ष घनमीटरचा अतिरिक्त पाणीसाठा कोकाकोला कंपनीसाठी मंजूर करून हे पाणी तत्काळ सोडले आहे.

- वसंत भोईर वाडा : संपूर्ण राज्यासह वाड्यात भीषण पाणीटंचाई असतांना शासनाने वैतरणा धरणातून १.३० दशलक्ष घनमीटरचा अतिरिक्त पाणीसाठा कोकाकोला कंपनीसाठी मंजूर करून हे पाणी तत्काळ सोडले आहे. हे पाणी वाड्याच्या वैतरणा नदीतील सिद्धेश्वरी बंधाऱ्यावर नगरपंचायतीने अडवल्याने कंपनी प्रशासनाकडून अर्ज विनंत्या करून हे पाणी सोडण्याची मागणी केली. परंतु नगरपंचायतीकडून कंपनीची विनंती अमान्य केल्याने कोकाकोला कंपनीचे उत्पादन गेल्या पाच दिवसांपासून बंद होते. काल अखेर नगरपंचायतीचे पदाधिकारी व कंपनी प्रशासन यांच्यात दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका होऊन त्या दरम्यान कंपनी प्रशासन अखेर नरमले आणि त्यांनी नगरपंचायतीची जलशुद्धीकरण केंद्र बसविण्याची मागणी मान्य करून लेखी आश्वासन दिल्याने वाडा नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गेल्या दोन-तीन दिवसांपासून रंगलेल्या उलट सुलट चर्चेला मंगळवारी अखेर पूर्णविराम मिळाला. पाटबंधारे विभागाने वैतरणा नदीतवर गांधरे येथे बांधलेला बंधारा कोरडा पडल्याने गेल्या पाच दिवसांपासून कोकाकोला कंपनीवर उत्पादन बंद करण्याची नामुश्की ओढवली होती. याची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने अप्पर वैतरणा धरणातून अतिरिक्त पाणीसाठा तत्काळ सोडण्यात आला. परंतु दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने व नदीपात्र कोरडे असल्याने कंपनीच्या पाणीसाठ्यापर्यंत मुबलक पाणी पोहचू शकले नाही. याच नदीच्या मार्गात असलेल्या वाडा शहरासाठीचा सिद्धेश्वरी बंधारा पूर्णपणे भरल्याने कंपनीने नगरपंचायतीकडे पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला होता. परंतु वाडा शहरातील नागरिकांच्या प्रखर विरोधामुळे वाडा नगरपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासन कंपनीस सहकार्य करण्यास तयार नव्हते. गेले दोन ते तीन दिवस कंपनी प्रशासन व पदाधिकारी आणि नागरपंचायात प्रशासन यांच्यात अतिरिक्त पाणीसाठा सोडण्याच्या प्रश्नावर चर्चेचे गुºहाळ रंगले होते.>अखेर पेचप्रसंगावर तोडगा निघालाअखेर सोमवारी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे व कंपनी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, मुख्यधिकारी प्रबोधन मवाडे, पाणी समिती सभापती जागृती काळण, भाजपचे गटनेते मनिष देहेरकर, नगरसेवक संदीप पवार, शिवसेना गटनेते संदीप गणोरे तसेच बहुसंख्य नगरसेवक यांच्यात यशस्वी चर्चा होऊन वाडा शहरासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून देण्याचे कंपनी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर या वादाला पूर्णविराम मिळाला.>कंपनी प्रशासनाकडून नगरपंचायतीकडे अतिरिक्त पाणी देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन कंपनीकडून नागरपंचायतीसाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आज नगरपंचायतीकडून अतिरिक्त असलेले पाणी सोडण्यात आले.- प्रबोधन मवाडे,मुख्याधिकारी-नगरपंचायत वाडा