शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या अटीवर कोलाला अतिरिक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:13 IST

वाड्यात भीषण पाणीटंचाई असतांना शासनाने वैतरणा धरणातून १.३० दशलक्ष घनमीटरचा अतिरिक्त पाणीसाठा कोकाकोला कंपनीसाठी मंजूर करून हे पाणी तत्काळ सोडले आहे.

- वसंत भोईर वाडा : संपूर्ण राज्यासह वाड्यात भीषण पाणीटंचाई असतांना शासनाने वैतरणा धरणातून १.३० दशलक्ष घनमीटरचा अतिरिक्त पाणीसाठा कोकाकोला कंपनीसाठी मंजूर करून हे पाणी तत्काळ सोडले आहे. हे पाणी वाड्याच्या वैतरणा नदीतील सिद्धेश्वरी बंधाऱ्यावर नगरपंचायतीने अडवल्याने कंपनी प्रशासनाकडून अर्ज विनंत्या करून हे पाणी सोडण्याची मागणी केली. परंतु नगरपंचायतीकडून कंपनीची विनंती अमान्य केल्याने कोकाकोला कंपनीचे उत्पादन गेल्या पाच दिवसांपासून बंद होते. काल अखेर नगरपंचायतीचे पदाधिकारी व कंपनी प्रशासन यांच्यात दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका होऊन त्या दरम्यान कंपनी प्रशासन अखेर नरमले आणि त्यांनी नगरपंचायतीची जलशुद्धीकरण केंद्र बसविण्याची मागणी मान्य करून लेखी आश्वासन दिल्याने वाडा नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गेल्या दोन-तीन दिवसांपासून रंगलेल्या उलट सुलट चर्चेला मंगळवारी अखेर पूर्णविराम मिळाला. पाटबंधारे विभागाने वैतरणा नदीतवर गांधरे येथे बांधलेला बंधारा कोरडा पडल्याने गेल्या पाच दिवसांपासून कोकाकोला कंपनीवर उत्पादन बंद करण्याची नामुश्की ओढवली होती. याची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने अप्पर वैतरणा धरणातून अतिरिक्त पाणीसाठा तत्काळ सोडण्यात आला. परंतु दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने व नदीपात्र कोरडे असल्याने कंपनीच्या पाणीसाठ्यापर्यंत मुबलक पाणी पोहचू शकले नाही. याच नदीच्या मार्गात असलेल्या वाडा शहरासाठीचा सिद्धेश्वरी बंधारा पूर्णपणे भरल्याने कंपनीने नगरपंचायतीकडे पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला होता. परंतु वाडा शहरातील नागरिकांच्या प्रखर विरोधामुळे वाडा नगरपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासन कंपनीस सहकार्य करण्यास तयार नव्हते. गेले दोन ते तीन दिवस कंपनी प्रशासन व पदाधिकारी आणि नागरपंचायात प्रशासन यांच्यात अतिरिक्त पाणीसाठा सोडण्याच्या प्रश्नावर चर्चेचे गुºहाळ रंगले होते.>अखेर पेचप्रसंगावर तोडगा निघालाअखेर सोमवारी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे व कंपनी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, मुख्यधिकारी प्रबोधन मवाडे, पाणी समिती सभापती जागृती काळण, भाजपचे गटनेते मनिष देहेरकर, नगरसेवक संदीप पवार, शिवसेना गटनेते संदीप गणोरे तसेच बहुसंख्य नगरसेवक यांच्यात यशस्वी चर्चा होऊन वाडा शहरासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून देण्याचे कंपनी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर या वादाला पूर्णविराम मिळाला.>कंपनी प्रशासनाकडून नगरपंचायतीकडे अतिरिक्त पाणी देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन कंपनीकडून नागरपंचायतीसाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आज नगरपंचायतीकडून अतिरिक्त असलेले पाणी सोडण्यात आले.- प्रबोधन मवाडे,मुख्याधिकारी-नगरपंचायत वाडा