शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
2
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
3
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
4
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
5
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
6
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
7
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
8
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
9
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
10
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
12
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
13
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
14
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
15
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
16
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
17
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
18
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
19
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...

करवसुली उद्दिष्टासाठी वसई पालिकेची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 23:39 IST

वसई-विरार महापालिकेने यंदा करवसुलीचे सुमारे ३०० कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

सुनील घरतपारोळ : वसई-विरार महापालिकेने यंदा करवसुलीचे सुमारे ३०० कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. करवसुलीचे हे उद्दिष्ट साध्य व्हावे यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जात आहे. प्रसंगी मालमत्ता जप्तीचा मार्गही पालिका प्रशासनाने अवलंबला आहे.आर्थिक वर्ष संपायला केवळ एक महिना शिल्लक असून या एका महिन्यात पालिकेला आपले उद्दिष्ट पूर्ण करायला घाम गाळावा लागणार आहे. सध्या महापालिकेने थकलेली कर वसुली महापालिका प्रशासनाकडे भरणा करण्यासाठी पालिका क्षेत्रात ठिकठिकाणी बॅनर झळकवले असून त्यामार्फत नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी कर भरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. वसई-विरार शहर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील सर्व थकबाकीधारकांनी आपली थकबाकी भरावी व महापालिकेला सहकार्य करावे, यासाठी जानेवारी महिन्याआधीपासूनच पालिकेच्या मालमत्ता कर भरणा विभागाने सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत पालिका क्षेत्रात वास्तव्य करणारे मालक/धारक यांनी आपला मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची थकबाकी त्वरित प्रभाग समिती कार्यालयात भरणा करावी, थकबाकी कराचा भरणा न केल्यास सदर मालमत्तेचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येईल व संबंधित नागरिकांच्या मालमत्तेवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची (ड) प्रकरण ८ (कराधान नियम) ४२ व ४३ अन्वये जप्तीसारखी कटू कारवाई करण्यात येईल. अशा आशयाचे बॅनर वसई-विरार शहर महापालिकेने सध्या महापालिका क्षेत्रात झळकवले आहेत.वसई-विरार महानगरपालिकेचा आवाका सध्या वाढत आहे. दरवर्षी करवसुलीचे उद्दिष्ट वाढवण्यात येते. या वर्षी सुमारे ३०० कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. करवसुली करण्यासाठी विविध युक्त्या पालिका प्रशासनाकडून राबवण्यात येतात. यंदा थकबाकीदारांच्या मालमत्तेवर जप्ती आणणे व जोपर्यंत कर भरणा केला जात नाही, तोपर्यंत मालमत्ता संबंधित थकबाकीदाराच्या स्वाधीन करण्यास पालिकेने हरकत घेतली आहे.।ूमहापालिकेचे सहकार्याचे आवाहनवसई-विरार शहर महानगरपालिकेने करवसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. यानुसार पाणी कनेक्शन खंडित करणे, वीज कनेक्शन खंडित करणे असे प्रकार पालिकेने हाती घेतले आहेत. आता कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाकडे केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यानुसार पालिका कर्मचारी कामाला लागले आहेत. वसई-विरार शहर महापालिकेने ठिकठिकाणी नागरिकांना कर भरणा करण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे बॅनर लावण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम जोरदारपणे राबवली जात आहे. पालिकेचे कर्मचारी करवसुलीचे उद्दिष्ट साध्य व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांना उद्दिष्टपूर्ण करायचे आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार