शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

अर्नाळ्यात घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: July 25, 2016 02:47 IST

अर्नाळा समद्रकिनारी कचऱ्यांचे साम्राज्य पसरले असून, किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यावरच असलेल्या डंम्पिंग ग्राऊंडवर प्रचंड प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले

शशी करपे,  वसईअर्नाळा समद्रकिनारी कचऱ्यांचे साम्राज्य पसरले असून, किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यावरच असलेल्या डंम्पिंग ग्राऊंडवर प्रचंड प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून आधी येथे स्वच्छता करा व मगच पर्यटकांकडून कर वसूल करा अशी भूमिका पर्यटक व स्थानिकांनी घेतली आहे. अर्नाळा समुद्र किनारा,या किनाऱ्यावर असलेली सुरुची बाग,चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला ऐतिहासिक अर्नाळा किल्ला पाहण्यासाठी हजारो पर्यटक दररोज अर्नाळ्याला येत असतात. मात्र,निसर्गरम्य किनारा,शीतल वारा देणारी सुरुची बाग पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर किनाऱ्यावरील अस्वच्छता,कुजलेला कचरा यामुळे नाकाला रुमाल लावण्याची पाळी येत आहे.ज्या समुद्रात महात्मा गांधी आणि हिंदु हृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थी विसर्जीत केल्या गेल्या.त्या किनारी गावातील सर्व कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे सर्वत्र घाणीचे सम्राज्य पसरले आहे. समुद्राला लागून असलेल्या स्मशानाच्या समोरच गावचे डंम्पिंग ग्राऊंड आहे. त्याठिकाणी आता कचराचे ढिग जमा झाले आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचातीकडे दुसरी व्यवस्था नसल्याने कुजलेल्या कचऱ्याने किनाऱ्याची पुरती वाट लावली आहे. दुसरीकडे, किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शाळेसमोर असलेल्या कचरा कुंडीची नियमित सफाई होत नसल्याने याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच गटाराच्या अर्धवट कामामुळे भाजी मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे. अनेक पर्यटक याठिकाणी आल्यानंतर गावठी भाजी घेण्यासाठी गर्दी करतात. मात्र, उघड्या गटारामुळे भाजी विक्रेत्यांच्या धंद्यावर परिणाम होऊ लागला आहे. अर्नाळा ग्रामपंचायत पर्यटकांकडून दुचाकी वाहनांसाठी १० रुपये,चारचाकीसाठी २० आणि बसेससाठी ४० रुपये अशी कर वसुली करते. त्यामुळे दररोज हजारो रुपयांचे उत्पन्न या कर रुपाना ग्रामपंचातीला प्राप्त होत आहे. काशी इतकेच महत्व असलेल्या या किनाऱ्यावर अनेक लोक धार्मीक विधीसाठी येत आहेत.त्यांना कचऱ्यांच दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे आधी किनारे स्वच्छ करा मगच कर घ्या अशी भूमिका जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते निनाद पाटील,देवेंद्र वैती,राहुल तांडेल, दिगंबर मेहेर,रुकेश तांडेल, विश्वास किणी,शैलेश म्हात्रे,पराग म्हात्रे यांनी घेतली आहे.डंम्पिंग ग्राऊंड परिसरात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. तसेच सध्याच्या डंम्पिंग ग्राऊंडजवळून दररोज हजारो पर्यटकांना ये-जा करावी लागते. गावात इतर ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक जागा आहेत. त्याठिकाणी डंम्पिंग ग्राऊंड बनवून सर्वांची घाणीच्या साम्राजतून मुक्तता केली पाहिजे. पर्यटकांकडून दररोज हजारो रुपयांचा कर वसूल केला जातो. तो पैसा गावातील स्वच्छतेसाठी वापरण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.