शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

अर्नाळ्यात घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: July 25, 2016 02:47 IST

अर्नाळा समद्रकिनारी कचऱ्यांचे साम्राज्य पसरले असून, किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यावरच असलेल्या डंम्पिंग ग्राऊंडवर प्रचंड प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले

शशी करपे,  वसईअर्नाळा समद्रकिनारी कचऱ्यांचे साम्राज्य पसरले असून, किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यावरच असलेल्या डंम्पिंग ग्राऊंडवर प्रचंड प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून आधी येथे स्वच्छता करा व मगच पर्यटकांकडून कर वसूल करा अशी भूमिका पर्यटक व स्थानिकांनी घेतली आहे. अर्नाळा समुद्र किनारा,या किनाऱ्यावर असलेली सुरुची बाग,चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला ऐतिहासिक अर्नाळा किल्ला पाहण्यासाठी हजारो पर्यटक दररोज अर्नाळ्याला येत असतात. मात्र,निसर्गरम्य किनारा,शीतल वारा देणारी सुरुची बाग पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर किनाऱ्यावरील अस्वच्छता,कुजलेला कचरा यामुळे नाकाला रुमाल लावण्याची पाळी येत आहे.ज्या समुद्रात महात्मा गांधी आणि हिंदु हृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थी विसर्जीत केल्या गेल्या.त्या किनारी गावातील सर्व कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे सर्वत्र घाणीचे सम्राज्य पसरले आहे. समुद्राला लागून असलेल्या स्मशानाच्या समोरच गावचे डंम्पिंग ग्राऊंड आहे. त्याठिकाणी आता कचराचे ढिग जमा झाले आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचातीकडे दुसरी व्यवस्था नसल्याने कुजलेल्या कचऱ्याने किनाऱ्याची पुरती वाट लावली आहे. दुसरीकडे, किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शाळेसमोर असलेल्या कचरा कुंडीची नियमित सफाई होत नसल्याने याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच गटाराच्या अर्धवट कामामुळे भाजी मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे. अनेक पर्यटक याठिकाणी आल्यानंतर गावठी भाजी घेण्यासाठी गर्दी करतात. मात्र, उघड्या गटारामुळे भाजी विक्रेत्यांच्या धंद्यावर परिणाम होऊ लागला आहे. अर्नाळा ग्रामपंचायत पर्यटकांकडून दुचाकी वाहनांसाठी १० रुपये,चारचाकीसाठी २० आणि बसेससाठी ४० रुपये अशी कर वसुली करते. त्यामुळे दररोज हजारो रुपयांचे उत्पन्न या कर रुपाना ग्रामपंचातीला प्राप्त होत आहे. काशी इतकेच महत्व असलेल्या या किनाऱ्यावर अनेक लोक धार्मीक विधीसाठी येत आहेत.त्यांना कचऱ्यांच दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे आधी किनारे स्वच्छ करा मगच कर घ्या अशी भूमिका जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते निनाद पाटील,देवेंद्र वैती,राहुल तांडेल, दिगंबर मेहेर,रुकेश तांडेल, विश्वास किणी,शैलेश म्हात्रे,पराग म्हात्रे यांनी घेतली आहे.डंम्पिंग ग्राऊंड परिसरात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. तसेच सध्याच्या डंम्पिंग ग्राऊंडजवळून दररोज हजारो पर्यटकांना ये-जा करावी लागते. गावात इतर ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक जागा आहेत. त्याठिकाणी डंम्पिंग ग्राऊंड बनवून सर्वांची घाणीच्या साम्राजतून मुक्तता केली पाहिजे. पर्यटकांकडून दररोज हजारो रुपयांचा कर वसूल केला जातो. तो पैसा गावातील स्वच्छतेसाठी वापरण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.