शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

केवडाचोरीचे प्रमाण वाढले, शेतकऱ्याचे शोषण; पैशांकरिीता बनांचे नुकसान, कच्चा गाभा जातोय तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:20 IST

गणेशोत्सवाच्या काळात बाजारात केवड्याला वाढती मागणी असते व दरही चांगला मिळतो. त्यामुळे शिवारातील केवडा चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : गणेशोत्सवाच्या काळात बाजारात केवड्याला वाढती मागणी असते व दरही चांगला मिळतो. त्यामुळे शिवारातील केवडा चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या चोरीला प्रतिकार केल्यास बन जाळणे तसेच बागायतीचे नुकसान करणे असे प्रकार होत असल्याने बळीराजाला ते सहन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.पन्नास रुपयाला घेतलेला केवडा व्यापारी बाजारात ५०० ते ७०० रुपयांना विकतात. व शेतकºयांचे शोषण करतात. समुद्रकिनारी तार व सिमेंट अथवा लोखंडी पोल खाºया हवेमुळे टिकाव धरत नसल्याने दोन-तीन वर्षातच हजारो रुपये वाया जातात. तथापि शिवाराला कुंपण म्हणून शेतकºयांनी ही बनं मोठ्या कष्टाने टिकवली आहेत. वर्षभर या बनाकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. मात्र गणेशोत्सवात केवड्याला असणाºया विक्रमी मागणीमुळे विरार आणि दादरच्या फुल बाजारात तसेच डहाणूच्या बाजारात या केवड्याचा बोलबाला असतो.लोकल ट्रेनच्या माध्यमातून शहरातील गृहसंकुलांमध्ये डोअर-टू-डोअर कडधान्य, फळे व पालेभाज्या इ. विक्री करणाºया महिला उत्सवकाळात केवड्याचीही विक्र ी करतात. व्यापारी त्यांच्याकडून कमी किमतीत खरेदी करून मोठा नफा कमावतात. मागील तीन-चार वर्षांपासून शहरातील भक्त वाट्टेल ती किंमत मोजून केवडा खरेदीला प्राधान्य देऊ लागल्याने हा व्यापारी डहाणू पर्यंत पोहचला असून स्थानिकांना हाताशी धरून न फुललेला केवड्याची (कोवळा गाभा) मागणी करू लागले आहेत. पैशाच्या मोहापाई काहीजण त्यास बळी पडले असून त्यांच्याकडून अक्षरश: या बनाची कत्तल सुरु झाली आहे. रात्री किंवा पहाटे ते तोड करण्यासाठी निघतात. त्यांना अटकाव केलाच, तर जीवाला धोकाही पोहचू शकतो. काही वेळा या माथेफिरूंकडून बनाला आग लावणे, शेतमालाचे नुकसान केले जाते.केवडा काढणी कष्टप्रदगोकुळाष्टमीनंतर केवडा काढण्याला सुरु वात होते. या काटेरी झुडपापर्यंत पोहचून गाभ्यातील केवड्याला नुकसान न पोहचवता धारदार शस्त्राने तो अलगद काढावा लागतो. त्याकरिता श्रम पडतात. मात्र त्या तुलनेत मिळणारा नफा अल्प असल्याने नवी पिढी या कडे लक्ष देत नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार