शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

४ कोटी २० लाख खर्च करूनही घसा कोरडाच

By admin | Updated: July 28, 2016 03:37 IST

पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त अक्करपट्टी व पोफरण गावातील नागरिक आपल्या मूलभूत मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात झगडत आहेत.

- हितेन नाईक/पंकज राऊत, पालघर/बोईसर

पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त अक्करपट्टी व पोफरण गावातील नागरिक आपल्या मूलभूत मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात झगडत आहेत. अक्करपट्टी व पोफरण या गावांना पिण्याचे पाणी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला गेल्या चार वर्षांत अनेक वेळा दिले होते. परंतु, उच्च न्यायालयालाही न जुमानणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमुळे ४ कोटी २० लाख रुपयांचा खर्च होऊनही प्रकल्पग्रस्तांचे घसे आजही कोरडेच राहिले आहेत.तारापूर अणुऊर्जा प्रकल्प ३ आणि ४ च्या उभारणीदरम्यान पोफरण आणि अक्करपट्टीच्या स्थानिकांनी आपल्या घरादारांवर नांगर फिरवून आपल्या जागा शासनाकडे सुपूर्द केल्या. त्यांचे पुनर्वसन दहिसरजवळ करण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आदेश देत अणुऊर्जा प्रकल्पाने निधीही दिला. मात्र, या पाणीपुरवठा योजनेत अनेक त्रुटी राहिल्याने प्रकल्पग्रस्तांपर्यंत पाणीच पोहोचले नाही. त्यामुळे अनेक त्रुटींनी राहिलेली ही योजना दोन्ही ग्रामपंचायतींनी ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मुंबई उच्च न्यायालयात २५ जुलै २०१६ रोजी झालेल्या यासंदर्भातील सुनावणीदरम्यान पाणीप्रश्नी सरकार व संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.जिल्हाधिकारी पालघर यांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालाप्रमाणे १ जुलै २०१६ रोजी न्यायालयाच्या आदेशाने प्रकल्पग्रस्तांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे बैठक आयोजित केली होती. सदर महत्त्वाच्या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही, यावरून उच्च न्यायालयासह जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून आले. यावर, जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बैठकीत नाराजी व्यक्त करण्यापलीकडे ते काही करू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी न्यायालयात सादर केला आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनदेखील प्रकल्पग्रस्त अद्याप तहानलेलाच राहिला आहे. निकृष्ट दर्जाची कामे केल्यानेच ही योजना अपूर्ण राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी झाली आहे.जिल्हाधिकारी जागेवर जाऊन करणार चौकशी- मागील दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाइपलाइन दुरुस्तीसाठी अणुऊर्जा प्रकल्पाकडे १ लाख ५० हजार रुपयांची मागणी उच्च न्यायालयात केली होती. त्यानुसार, अणुप्रकल्पाने जीवन प्राधिकरणास रक्कमही अदा केली. परंतु, अद्यापदेखील पाणीपुरवठा गावकऱ्यांना होऊ शकलेला नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वेळोवेळी अणुप्रकल्पाकडे पैशांचा तगादा लावते, परंतु प्रत्यक्षात मात्र कामेच करीत नाही. लाखो रुपये प्राधिकरणाकडे पुनर्वसनाचे शिल्लक असतानादेखील त्यांचा कोणताही हिशेब न्यायालयात व अणुप्रकल्पाला सादरच केला जात नाही.चुकीच्या माहितीमुळे झाली दिशाभूल- न्यायालयाने २५ जुलैच्या सुनावणीदरम्यान प्रकल्पग्रस्तांचे वकील राजीव पाटील यांनी आपली बाजू मांडत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चुकीची माहिती न्यायालयात सादर करीत असल्याचे पटवून देत प्रत्यक्ष जागेवर मात्र परिस्थिती वेगळी आहे, असे सांगितले.यावरून न्यायालयाने पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना आदेश देत २९ तारखेला प्रत्यक्ष जागेवर जाऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संपूर्ण यंत्रणेला पाण्याबाबत प्रत्येक घरोघरी जाऊन पाहणी करून त्यांचा तातडीने अहवाल ६ आॅगस्टला न्यायालयात सादर करण्यास सांगितले असून पुढील सुनावनी ८ आॅगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.निकृष्ट दर्जा उघडकीसप्रकल्पग्रस्त अक्करपट्टी व पोफरण या दोन्ही गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जीवन प्राधिकरणाने आतापर्यंत दोन वेळा योजना राबवली होती. परंतु, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे योजना चालू होतानाच बंद पडली. त्यामुळे तब्बल ४ कोटी २० लाख खर्च करूनदेखील प्रकल्पग्रस्तांपर्यंत अजूनही पाणीपुरवठा पोहोचला नसल्याने जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार समोर आला असून अणुऊर्जा प्रकल्पाचे करोडो रुपये वाया गेले आहेत. त्यातच, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी योजना पूर्ण झाल्याचा खोटा अहवाल उच्च न्यायालयात सादर करून उच्च न्यायालयाचीही दिशाभूल करण्याची संधी सोडलेली नाही. यावरून जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी किती निर्ढावलेले आहेत, हे दिसून येत आहे. या प्रकरणी पाणीपुरवठा पाइपलाइनच्या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे ८४ लाख रुपये देयक थांबवले आहे.