शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही परिस्थिती जैसे थे! दोन जागांचे अधिग्रहण रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 00:36 IST

जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाडा येथे आजही जाण्यासाठी रस्ता नसून याबाबत २०१७ साली मुख्यमंत्र्यांकडे तक्र ार करूनही आजही परिस्थिती जैसे थेच आहे.

जव्हार - जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाडा येथे आजही जाण्यासाठी रस्ता नसून याबाबत २०१७ साली मुख्यमंत्र्यांकडे तक्र ार करूनही आजही परिस्थिती जैसे थेच आहे. यामुळे ग्रामस्थनी खूप पाठपुरावा करून पंचायत समितीद्वारे आवश्यक भूखंड अधिग्रहण करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत सादर केला आहे.फक्त पायवाटच असलेल्या रस्त्यामुळे खेडोपाड्यातील लोकांना खूपच त्रास सहन करावा लागत असून याबाबत गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनाकडे तसेच लोकप्रतीनिधीमध्ये जेवढे प्रकार असतील अशा सर्वांकडे तक्र ार करून तसेच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे लेखी निवेदन २०१७ साली दिले होते.गावात जाण्यासाठीचा रस्ता करण्यामध्ये दोन खाजगी जागा येत असल्यामुळे हा प्रस्ताव रेंगळून पडला होता, मात्र आता गटविकास अधिकारी शेखर रौंदळ यांच्या प्रयत्नाने वालवंडा ग्रामपंचायतीने ठराव करुन दि. ०५/०४/२०१९ रोजी तहसीलदार कार्यालयात सार्वजनिक रास्ता तयार करण्यासाठी खाजगी जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरात लवकर त्यास परवानगी मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यामध्ये रास्ता तयार करण्यासाठी परशुराम केवजी भोये यांची ९० मीटर तर शशिकला दत्तात्रेय विश्वासराव यांच्या मालकीची ४१५ मीटर जागा अधिग्रहण करण्यात येणार आहे.खडकीपाडाची लोकसंख्या १७५ असून जव्हार ते ठाणे रोडवर जव्हारहून १० कि.मी. अंतरावर असलेल्या वाळवंडा गावापासून चौक गावाच्या वाढूपाडा पूला पर्यत डांबरी रस्ता आहे, तेथून दिड कि.मी. अंतरावर खडकीपाडा गाव आहे. परंतु गावात जाण्यासाठी स्वातंत्र्यकाळापासून आजतागायत जाण्याचा रस्ताच नाही, पावसाळ्यात तर मोठी तारांबळच उडत असून पावसात या पुलावर पाणी भरून वाहतो, त्यामुळे गावाचा संपर्कही तुटतो, परिणामी शेतातून पायवाट करीत घरापर्यत जावे लागते. रस्ता नसल्यामुळे रूग्णांचे तर खूपच हाल होतात, त्यांना डोली करून दिड कि.मी. अंतरावर पायी चालून रस्त्यावर न्यावे लागते, पावसाळ्यात तर तेही करता येत नाही त्यामुळे कित्येक रूग्णांचे रस्ते अभावी जीव गमवावा लागला आहे.फळ्यांचा पूल लागतो ओलांडावागावाच्या बाजूस नदीच्या पलीकडे इ. १ ली ते ४ थी पर्यतची शाळा असुन त्यामध्ये गावातील ४० ते ४५ विद्यार्थी शिक्षण घेत असून नदीवर दोन लाकडी फळ्या टाकून त्यावरून बालवाडी ते ४ थी पर्यतचे विद्यार्थी मोठी सर्कस करीत जीव धोक्यात टाकून रोज ये जा करतात अशी भयानक परीस्थीत गाव असून कोणी देत का लक्ष रे बाबा आमच्या गावाकडे अशी संतप्त प्रतिक्रि या जनता करीत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार