शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही परिस्थिती जैसे थे! दोन जागांचे अधिग्रहण रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 00:36 IST

जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाडा येथे आजही जाण्यासाठी रस्ता नसून याबाबत २०१७ साली मुख्यमंत्र्यांकडे तक्र ार करूनही आजही परिस्थिती जैसे थेच आहे.

जव्हार - जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाडा येथे आजही जाण्यासाठी रस्ता नसून याबाबत २०१७ साली मुख्यमंत्र्यांकडे तक्र ार करूनही आजही परिस्थिती जैसे थेच आहे. यामुळे ग्रामस्थनी खूप पाठपुरावा करून पंचायत समितीद्वारे आवश्यक भूखंड अधिग्रहण करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत सादर केला आहे.फक्त पायवाटच असलेल्या रस्त्यामुळे खेडोपाड्यातील लोकांना खूपच त्रास सहन करावा लागत असून याबाबत गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनाकडे तसेच लोकप्रतीनिधीमध्ये जेवढे प्रकार असतील अशा सर्वांकडे तक्र ार करून तसेच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे लेखी निवेदन २०१७ साली दिले होते.गावात जाण्यासाठीचा रस्ता करण्यामध्ये दोन खाजगी जागा येत असल्यामुळे हा प्रस्ताव रेंगळून पडला होता, मात्र आता गटविकास अधिकारी शेखर रौंदळ यांच्या प्रयत्नाने वालवंडा ग्रामपंचायतीने ठराव करुन दि. ०५/०४/२०१९ रोजी तहसीलदार कार्यालयात सार्वजनिक रास्ता तयार करण्यासाठी खाजगी जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरात लवकर त्यास परवानगी मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यामध्ये रास्ता तयार करण्यासाठी परशुराम केवजी भोये यांची ९० मीटर तर शशिकला दत्तात्रेय विश्वासराव यांच्या मालकीची ४१५ मीटर जागा अधिग्रहण करण्यात येणार आहे.खडकीपाडाची लोकसंख्या १७५ असून जव्हार ते ठाणे रोडवर जव्हारहून १० कि.मी. अंतरावर असलेल्या वाळवंडा गावापासून चौक गावाच्या वाढूपाडा पूला पर्यत डांबरी रस्ता आहे, तेथून दिड कि.मी. अंतरावर खडकीपाडा गाव आहे. परंतु गावात जाण्यासाठी स्वातंत्र्यकाळापासून आजतागायत जाण्याचा रस्ताच नाही, पावसाळ्यात तर मोठी तारांबळच उडत असून पावसात या पुलावर पाणी भरून वाहतो, त्यामुळे गावाचा संपर्कही तुटतो, परिणामी शेतातून पायवाट करीत घरापर्यत जावे लागते. रस्ता नसल्यामुळे रूग्णांचे तर खूपच हाल होतात, त्यांना डोली करून दिड कि.मी. अंतरावर पायी चालून रस्त्यावर न्यावे लागते, पावसाळ्यात तर तेही करता येत नाही त्यामुळे कित्येक रूग्णांचे रस्ते अभावी जीव गमवावा लागला आहे.फळ्यांचा पूल लागतो ओलांडावागावाच्या बाजूस नदीच्या पलीकडे इ. १ ली ते ४ थी पर्यतची शाळा असुन त्यामध्ये गावातील ४० ते ४५ विद्यार्थी शिक्षण घेत असून नदीवर दोन लाकडी फळ्या टाकून त्यावरून बालवाडी ते ४ थी पर्यतचे विद्यार्थी मोठी सर्कस करीत जीव धोक्यात टाकून रोज ये जा करतात अशी भयानक परीस्थीत गाव असून कोणी देत का लक्ष रे बाबा आमच्या गावाकडे अशी संतप्त प्रतिक्रि या जनता करीत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार