शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
4
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
5
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
6
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
7
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
8
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
9
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
10
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
11
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
12
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
13
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
14
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
15
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
16
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
17
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
18
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
19
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
20
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."

आलोंड्यातील एस्टीम कंपनी बंद, अनेक बेरोजगार

By admin | Updated: September 25, 2016 04:00 IST

विक्र मगड तालुक्यातील एकमेव अशा एस्टीम इंडस्ट्रीयल कंपनीला तिने सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण निर्माण केल्यामुळे तिचे कामकाज बंद करण्याच आदेश वाडा उपविभागीय

- राहुल वाडेकर, विक्रमगड

विक्र मगड तालुक्यातील एकमेव अशा एस्टीम इंडस्ट्रीयल कंपनीला तिने सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण निर्माण केल्यामुळे तिचे कामकाज बंद करण्याच आदेश वाडा उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नंदलकर यांनी दिला आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार होणार आहेत. कंपनीने सोडलेल्या केमिकलयुक्त पाण्यामुळे आलोंडे या गावातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच या केमिकलयुक्त पाण्यामुळे गावातून वाहणाऱ्या ओहळातील पाणी फेसाळ बनल्यामुळे मासे, खेकडे मोठ्या प्रमाणात मृत पावले होते. हे पाणी प्यायल्याने येथील एका शेतकऱ्याच्या दोन गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. या केमिकल मिश्रीत पाण्यामुळे आलोंडे परिसरातील अनेक शेतक-यांच्या भातशेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आलोंडे गावालगत एका नाल्याशेजारी गेल्या दोन वर्षापासून ही केमिकल कंपनी सुरु आहे. तिचे दूषित पाणी शेजारच्याच नाल्यामध्ये सोडले आहे. सध्या हा नाला वहात असून या नाल्याशेजारील भातशेती करपू लागली आहे. अशी तक्रार उपसरपंच प्रमोद पाटील यांनी दोन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. परंतु त्यांनी आजवर दखल घेतली नव्हती असे सांगितले. दरम्यान वाड्याचे उपविभागीय महसुल अधिकारी डॉ. मोहन नलदकर यांनी या कंपनीला भेट देवून कंपनी तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र याशासकीय आदेशामुळे शेकडो स्थानिक तरुणांपुढे बेरोजगारीचे संकट उभे राहिले असून पुन्हा एकदा त्यांच्या उदरिनर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.कंपनीच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता हे कृत्य एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांने जाणून-बुजून केले असून याबबत आम्ही विक्र मगड पोलिस स्टे. येथे गुन्हा नोंदविला आहे. तसेच झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास कंपनी प्रशासन तयार आहे. मात्र पुढील शासकीय आदेश येईपर्यंत आम्ही कंपनीचे उत्पादन थांबवत आहोत, असे म्हटले आहे. मुळात कंपनीने वेळीच जागरुकता दाखवून संबंधितांना भरपाई दिली असती व प्रदूषण थांबविले असते तर ही कारवाई करावीच लागली नसती. आता गळ्यापर्यंत आल्यावर कंपनीला भरपाईची भाषा सुचते आहे, अशी टीका ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना केली.ही कंपनी बंद झाल्यास येथील स्थानिक आदिवासी तसेच इतर समाज्याच्या तरु णांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळून अनेक संसार रस्त्यावर येतील.त्यासाठी कंपनी बंद करणे हा पर्याय नसून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देऊन ही कंपनी चालू ठेवावी. कंपनीने आपली सुरक्षा व्यवस्था वाढवून असे ेप्रकार पुढील काळात घडणार नाही, याची काळजी घ्यावी.- डॉ.सिद्धार्थ सांबरे, सामाजिक कार्यकर्ते.मी विक्र मगड तालुक्यातील बोरसे पाडा येथील तरु ण असून आलोंडा येथील कंपनी चालू झाल्याने मला येथे रोजगार मिळाला.गेली चार वर्ष मी या कंपनीत काम करतो व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. ही कंपनी प्रशासनाने बंद केल्यास मी माझ्या सारख्या अनेक आदिवासी तरु णांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.- बाळू सहारे, आदिवासी स्थानिक कामगार.शासनाने तडकाफडकी निर्णय घेऊन आलोंडा येथील एस्टीम प्रा.ली. कंपनीला सील ठोकले आहे त्यामुळे आमच्यापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने योग्य तो निर्णय घेऊन ही कंपनी त्वरित चालू करावी. नाही तर येथील बेरोजगार झलेल्या तरु णांना पर्यायी नोकऱ्या द्याव्यात नाही तर या कंपनीतील शेकडो बेरोजगार तरु णांना आंदोलन करावे लागेल.- सतेज ठाकरे, स्थानिक कर्मचारी.