शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

आलोंड्यातील एस्टीम कंपनी बंद, अनेक बेरोजगार

By admin | Updated: September 25, 2016 04:00 IST

विक्र मगड तालुक्यातील एकमेव अशा एस्टीम इंडस्ट्रीयल कंपनीला तिने सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण निर्माण केल्यामुळे तिचे कामकाज बंद करण्याच आदेश वाडा उपविभागीय

- राहुल वाडेकर, विक्रमगड

विक्र मगड तालुक्यातील एकमेव अशा एस्टीम इंडस्ट्रीयल कंपनीला तिने सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण निर्माण केल्यामुळे तिचे कामकाज बंद करण्याच आदेश वाडा उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नंदलकर यांनी दिला आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार होणार आहेत. कंपनीने सोडलेल्या केमिकलयुक्त पाण्यामुळे आलोंडे या गावातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच या केमिकलयुक्त पाण्यामुळे गावातून वाहणाऱ्या ओहळातील पाणी फेसाळ बनल्यामुळे मासे, खेकडे मोठ्या प्रमाणात मृत पावले होते. हे पाणी प्यायल्याने येथील एका शेतकऱ्याच्या दोन गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. या केमिकल मिश्रीत पाण्यामुळे आलोंडे परिसरातील अनेक शेतक-यांच्या भातशेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आलोंडे गावालगत एका नाल्याशेजारी गेल्या दोन वर्षापासून ही केमिकल कंपनी सुरु आहे. तिचे दूषित पाणी शेजारच्याच नाल्यामध्ये सोडले आहे. सध्या हा नाला वहात असून या नाल्याशेजारील भातशेती करपू लागली आहे. अशी तक्रार उपसरपंच प्रमोद पाटील यांनी दोन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. परंतु त्यांनी आजवर दखल घेतली नव्हती असे सांगितले. दरम्यान वाड्याचे उपविभागीय महसुल अधिकारी डॉ. मोहन नलदकर यांनी या कंपनीला भेट देवून कंपनी तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र याशासकीय आदेशामुळे शेकडो स्थानिक तरुणांपुढे बेरोजगारीचे संकट उभे राहिले असून पुन्हा एकदा त्यांच्या उदरिनर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.कंपनीच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता हे कृत्य एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांने जाणून-बुजून केले असून याबबत आम्ही विक्र मगड पोलिस स्टे. येथे गुन्हा नोंदविला आहे. तसेच झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास कंपनी प्रशासन तयार आहे. मात्र पुढील शासकीय आदेश येईपर्यंत आम्ही कंपनीचे उत्पादन थांबवत आहोत, असे म्हटले आहे. मुळात कंपनीने वेळीच जागरुकता दाखवून संबंधितांना भरपाई दिली असती व प्रदूषण थांबविले असते तर ही कारवाई करावीच लागली नसती. आता गळ्यापर्यंत आल्यावर कंपनीला भरपाईची भाषा सुचते आहे, अशी टीका ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना केली.ही कंपनी बंद झाल्यास येथील स्थानिक आदिवासी तसेच इतर समाज्याच्या तरु णांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळून अनेक संसार रस्त्यावर येतील.त्यासाठी कंपनी बंद करणे हा पर्याय नसून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देऊन ही कंपनी चालू ठेवावी. कंपनीने आपली सुरक्षा व्यवस्था वाढवून असे ेप्रकार पुढील काळात घडणार नाही, याची काळजी घ्यावी.- डॉ.सिद्धार्थ सांबरे, सामाजिक कार्यकर्ते.मी विक्र मगड तालुक्यातील बोरसे पाडा येथील तरु ण असून आलोंडा येथील कंपनी चालू झाल्याने मला येथे रोजगार मिळाला.गेली चार वर्ष मी या कंपनीत काम करतो व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. ही कंपनी प्रशासनाने बंद केल्यास मी माझ्या सारख्या अनेक आदिवासी तरु णांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.- बाळू सहारे, आदिवासी स्थानिक कामगार.शासनाने तडकाफडकी निर्णय घेऊन आलोंडा येथील एस्टीम प्रा.ली. कंपनीला सील ठोकले आहे त्यामुळे आमच्यापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने योग्य तो निर्णय घेऊन ही कंपनी त्वरित चालू करावी. नाही तर येथील बेरोजगार झलेल्या तरु णांना पर्यायी नोकऱ्या द्याव्यात नाही तर या कंपनीतील शेकडो बेरोजगार तरु णांना आंदोलन करावे लागेल.- सतेज ठाकरे, स्थानिक कर्मचारी.