शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आलोंड्यातील एस्टीम कंपनी बंद, अनेक बेरोजगार

By admin | Updated: September 25, 2016 04:00 IST

विक्र मगड तालुक्यातील एकमेव अशा एस्टीम इंडस्ट्रीयल कंपनीला तिने सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण निर्माण केल्यामुळे तिचे कामकाज बंद करण्याच आदेश वाडा उपविभागीय

- राहुल वाडेकर, विक्रमगड

विक्र मगड तालुक्यातील एकमेव अशा एस्टीम इंडस्ट्रीयल कंपनीला तिने सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण निर्माण केल्यामुळे तिचे कामकाज बंद करण्याच आदेश वाडा उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नंदलकर यांनी दिला आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार होणार आहेत. कंपनीने सोडलेल्या केमिकलयुक्त पाण्यामुळे आलोंडे या गावातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच या केमिकलयुक्त पाण्यामुळे गावातून वाहणाऱ्या ओहळातील पाणी फेसाळ बनल्यामुळे मासे, खेकडे मोठ्या प्रमाणात मृत पावले होते. हे पाणी प्यायल्याने येथील एका शेतकऱ्याच्या दोन गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. या केमिकल मिश्रीत पाण्यामुळे आलोंडे परिसरातील अनेक शेतक-यांच्या भातशेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आलोंडे गावालगत एका नाल्याशेजारी गेल्या दोन वर्षापासून ही केमिकल कंपनी सुरु आहे. तिचे दूषित पाणी शेजारच्याच नाल्यामध्ये सोडले आहे. सध्या हा नाला वहात असून या नाल्याशेजारील भातशेती करपू लागली आहे. अशी तक्रार उपसरपंच प्रमोद पाटील यांनी दोन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. परंतु त्यांनी आजवर दखल घेतली नव्हती असे सांगितले. दरम्यान वाड्याचे उपविभागीय महसुल अधिकारी डॉ. मोहन नलदकर यांनी या कंपनीला भेट देवून कंपनी तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र याशासकीय आदेशामुळे शेकडो स्थानिक तरुणांपुढे बेरोजगारीचे संकट उभे राहिले असून पुन्हा एकदा त्यांच्या उदरिनर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.कंपनीच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता हे कृत्य एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांने जाणून-बुजून केले असून याबबत आम्ही विक्र मगड पोलिस स्टे. येथे गुन्हा नोंदविला आहे. तसेच झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास कंपनी प्रशासन तयार आहे. मात्र पुढील शासकीय आदेश येईपर्यंत आम्ही कंपनीचे उत्पादन थांबवत आहोत, असे म्हटले आहे. मुळात कंपनीने वेळीच जागरुकता दाखवून संबंधितांना भरपाई दिली असती व प्रदूषण थांबविले असते तर ही कारवाई करावीच लागली नसती. आता गळ्यापर्यंत आल्यावर कंपनीला भरपाईची भाषा सुचते आहे, अशी टीका ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना केली.ही कंपनी बंद झाल्यास येथील स्थानिक आदिवासी तसेच इतर समाज्याच्या तरु णांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळून अनेक संसार रस्त्यावर येतील.त्यासाठी कंपनी बंद करणे हा पर्याय नसून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देऊन ही कंपनी चालू ठेवावी. कंपनीने आपली सुरक्षा व्यवस्था वाढवून असे ेप्रकार पुढील काळात घडणार नाही, याची काळजी घ्यावी.- डॉ.सिद्धार्थ सांबरे, सामाजिक कार्यकर्ते.मी विक्र मगड तालुक्यातील बोरसे पाडा येथील तरु ण असून आलोंडा येथील कंपनी चालू झाल्याने मला येथे रोजगार मिळाला.गेली चार वर्ष मी या कंपनीत काम करतो व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. ही कंपनी प्रशासनाने बंद केल्यास मी माझ्या सारख्या अनेक आदिवासी तरु णांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.- बाळू सहारे, आदिवासी स्थानिक कामगार.शासनाने तडकाफडकी निर्णय घेऊन आलोंडा येथील एस्टीम प्रा.ली. कंपनीला सील ठोकले आहे त्यामुळे आमच्यापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने योग्य तो निर्णय घेऊन ही कंपनी त्वरित चालू करावी. नाही तर येथील बेरोजगार झलेल्या तरु णांना पर्यायी नोकऱ्या द्याव्यात नाही तर या कंपनीतील शेकडो बेरोजगार तरु णांना आंदोलन करावे लागेल.- सतेज ठाकरे, स्थानिक कर्मचारी.